शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

प्रशस्त इमारतीमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता

By admin | Updated: February 28, 2015 02:19 IST

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयात अपुरे कर्मचारी आहेत. येथील ८४ जागा रिक्त आहेत. अधिकारी, कर्मचा-यांची कमतरता

मंगेश पांडे, पिंपरीपिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयात अपुरे कर्मचारी आहेत. येथील ८४ जागा रिक्त आहेत. अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने काही पदांवर निवृत्त कर्मचाऱ्यांची मानधनावर नेमणूक करण्यात आली आहे. यासह कंत्राटी कर्मचाऱ्यांचीही नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्या जीवावरच प्राधिकरणाचा गाडा सुरू आहे. इमारत प्रशस्त, पण कर्मचाऱ्यांची कमतरता अशी अवस्था प्राधिकरण कार्यालयाची झाली आहे.आकुर्डी रेल्वेस्थानकाजवळ ४२ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या पर्यावरणपूरक सात मजली इमारतीचे उद्घाटन ८ फेबु्रवारी २०१३ ला झाले. या इमारतीतून प्राधिकरणाचा कारभार चालत असला, तरीही पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. प्राधिकरणात सुरुवातीला मोठी कर्मचारीभरती झाली. त्यानंतर अद्याप मोठ्या प्रमाणात भरती झालेली नाही. दरम्यानच्या काळात बहुतांश कर्मचारी, अधिकारी निवृत्त झाले. मात्र, त्यांच्या जागी पुन्हा नव्याने भरती करण्यात आली नाही.सध्या प्राधिकरणात भांडार विभाग, माहिती व जनसंपर्क, भू-विभाग, प्रशासन व अतिक्रमण निर्मूलन, अभियांत्रिकी, नियोजन विभाग, लेखा व वित्त, विद्युत आदी विभाग आहेत. मंजूर कर्मचाऱ्यांची संख्या १९५ आहे. त्यातील ८४ जागा रिक्त आहेत. यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कनिष्ठ लिपिक, कनिष्ठ अभियंता या पदांचा समावेश आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, अशी तक्रार येथील कर्मचाऱ्यांची आहे. सध्या प्राधिकरणातील १२ अधिकाऱ्यांवर त्यांच्या विभागासह इतर महत्त्वाच्या विभागांचीही जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे मूळ जबाबदारी असलेल्या विभागाचेही कामकाज व्यवस्थितरीत्या पाहणे शक्य होत नाही. तसेच भरती होत नसली, तरी कामकाज व्यवस्थित सुरू राहावे, यासाठी २० लिपिक कंत्राटी पद्धतीने नेमण्यात आले आहेत, तर प्राधिकरणातीलच निवृत्त कर्मचाऱ्यांनाही मानधन तत्त्वावर पुन्हा कामावर घेण्यात आले आहे. यामध्ये ५८ ते ६५ वयोगटातील २० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.