शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
Daily Top 2Weekly Top 5

एल्गार प्रकरण एनआयएच्या कोर्टातच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 06:53 IST

विशेष न्यायालयाचा आदेश; केंद्र आणि राज्याच्या वादावर पडदा

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : एल्गार व माओवादी संबंध प्रकरणाची कागदपत्रे आणि सुनावणी एनआयएच्या मुंबईतील न्यायालयात वर्ग करण्यास पुणे न्यायालयाने शुक्रवारी परवानगी दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता पूर्णपणे एनआयएकडे गेले आहे.

‘एल्गार’च्या तपासाची कागदपत्रे ‘एनआयए’कडे देण्याची सूचना केंद्राने राज्य सरकारला केली होती. राज्य सरकारने त्याची लगेच अंमलबजावणी न केल्याने केंद्र विरुद्ध राज्य असा वाद निर्माण होण्याची शक्यता दिसू लागली. आरोपी व सरकारी वकिलांनी सुनावणी वर्ग करण्यास विरोध केला होता. न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळत एनआयएने केलेला अर्ज मंजूर केला आहे.

आरोपी व जप्त मुद्देमाल २८ फेब्रुवारीला एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तपास एनआयएकडे देण्यास राज्य सरकारने गुरुवारी मान्यता दिल्याने पुणे शहर पोलिसांनी तपास व मुद्देमालाची कागदपत्रे एनआयए विशेष न्यायालयात पाठविण्यासाठी न्यायालयात ना हरकत पत्र दिले होते.

हा तपास आता एनआयएकडे गेल्याने व सुनावणी मुंबईत होणार असल्याने आरोपींना जामीन मिळण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जाते.

तपासाबाबत संभ्रमपुणे पोलिसांनी केलेल्या तपासावर व जप्त केलेल्या मुद्देमालावरच एनआयए पुढील तपास करू शकते, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले. याबाबत एनआयएचे तपास अधिकारी विक्रम खलाटे यांना विचारले असता त्यांनी काही दिवसांत भूमिका स्पष्ट करू असे सांगितले.उद्धव ठाकरेंचा निर्णय अयोग्य - शरद पवारकोल्हापूर : एल्गार परिषद प्रकरणाचा तपास ‘एनआयए’कडे देण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय अयोग्य आहे, या शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, एल्गार परिषदेच्या तपासाबाबत मागील सरकारच्या अधिकाऱ्यांची बाजू चुकीची असल्याच्या तक्रारी होत्या. ज्यांची वागणूक आक्षेपार्ह आहे, त्यांची चौकशी झाली पाहिजे. शिवाय कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा अधिकार असून तो काढून घेणे योग्य नाही.

टॅग्स :Courtन्यायालय