शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

पुरातत्त्व खात्याच्या आदेशाविरोधात ‘एल्गार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 06:02 IST

एकूणच गडकोटांवर सुरू असलेले गैरप्रकार व दुर्दैवी परिस्थितीवर पुरातत्व खात्याकडून ठोस उपाययोजना करावी

वसई : राज्यातील गडकोटांची दुरावस्था, किल्ल्यातील गैरप्रकार रोखण्यासाठी दुर्गमित्रांनी विभागवार निवेदने व विनंती पत्रे देऊनही केंद्रीय पुरातत्व विभागाने अजून कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. याउलट ऐतिहासिक वसई किल्ल्यात विविध सण-उत्सव साजरे करण्यास पुरातत्त्व विभागाने सक्त मनाई केली आहे.

दरम्यान, वसई विजयोत्सव, दीपोत्सव अशा प्रकारचे कार्यक्रमही यापुढे किल्ल्यात साजरे करता येणार नाही असे पुरातत्त्व खात्याने जाहीर आदेशच मधल्या काळात पारित केले होते. यामुळे महाराष्ट्रातील समस्त दुर्गमित्र संतप्त झाले असून शनिवार पासून दुर्गप्रेमी पुरातत्त्व खात्याचा निषेध म्हणून वसईच्या चिमाजी अप्पा किल्यात एल्गार आंदोलनासाठी ठाण मांडून बसले आहेत.

एकूणच गडकोटांवर सुरू असलेले गैरप्रकार व दुर्दैवी परिस्थितीवर पुरातत्व खात्याकडून ठोस उपाययोजना करावी, या एकमेव मागणीसाठी समस्त दुर्गमित्र महाराष्ट्र भर एकित्रतपणे येऊन वसई किल्ला येथे दि.१५ व १६ डिसेंबर रोजी एल्गार आंदोलन करण्याचा इशारा आधीच दुर्गप्रेमींकडून देण्यात आला होता. त्यातच पुरातत्व खात्याने दुर्गप्रेमीं व त्यांच्या धार्मिक कार्यक्र मासाठी मनाईचा आदेश ही काढला. त्या अनुषंगाने हे एल्गार आंदोलन वसई किल्ल्यात किल्ले अभ्यासक श्रीदत्त राऊत यांच्या नेतृत्वाखाली शनिवार पासून सुरु झाले आहे. किंबहुना वसई सहित राज्यातील गडकिल्यांवरच्या वाढत्या समस्या व त्यांच्या प्रश्नांवर दुर्गमित्रांनी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी उचलेले हे आंदोलन स्वरूपी पाऊल अत्यंत महत्वाचे ठरेल असा आशावाद दुर्गप्रेमींनी व्यक्त केला आहे.विक्रमी सहभागशनिवार -रविवार या दोन्ही दिवशी सकाळी ९ ते सायं. ७.०० या वेळेत समस्त दुर्गमित्र, अभ्यासक केंद्रीय पुरातत्व विभागाच्या वसई किल्ल्यातील कार्यालयासमोर बसून आपल्या मागण्या, निवेदने, प्रतिक्रि या, विनंती पत्रके इत्यादी बाबी समोर ठेवल्या. यासाठी नाशिक, मुंबई, भाईदर, शिरगाव, माहीम, पुणे येथून अनेकांनी विक्र मी सहभाग नोंदवला आहे.पुरातत्व खाते जबाबदारी नाकारतेराज्यातील गडकोटांवर वाढती अश्लीलता, विनापरवाना छायाचित्रणे, प्रेमीयुगलांचे थैमान, पुरातत्व विभागाची अनास्था, कार्यपद्धती इत्यादी बाबत ठोस उपाययोजना करण्यासाठी समस्त दुर्गमित्र सामाजिक संघटने मार्फत लढत आहेत तर आता धार्मिक कार्यक्र मास ही बंदी घालून पुरात्तव खात्याने एकप्रकारे आपले अंग झटकू पाहत आहे .पुरातत्त्वची मनाई; दुर्गमित्रांकडून निषेधऐतिहासिक वसई किल्ल्यात विविध सण-उत्सव साजरे करण्यास पुरातत्त्व विभागाने मनाई केली आहे. वसई विजयोत्सव, दीपोत्सव अशा प्रकारचे कार्यक्र मही किल्ल्यात साजरे करता येणार नाही, असे पुरातत्त्व खात्याने जाहीर केल्याने दुर्गमित्र संतप्त झाले असून या आंदोलनाने त्यांनी पुरातत्व खात्याचा निषेध नोंदल आहे. मात्र, परिस्थिती जैसे थे आहे.काय आहे उल्लंघन आदेशकिल्यात धार्मिक कार्यक्र म करणे म्हणजे पुरातत्त्व खात्याच्या स्थळ अवशेष अधिनियम १९५८ च्या कलम १९ आणि ८ चे उल्लंघन असून हा दंडनीय अपराध असल्याचे पुरातत्त्व खात्याने म्हटले आहे. हा आदेश म्हणजे कणा नसलेला आदेश असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPuneपुणे