शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

अकरावी प्रवेशप्रक्रिया आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 02:07 IST

अकरावीच्या केंद्रीय समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविल्या जाणाऱ्या प्रवेशप्रक्रियेला आजपासून (दि. १०) सुरुवात होत आहे. एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत जाऊन आॅनलाइन अर्जाचा भाग १ भरायचा आहे.

पुणे - अकरावीच्या केंद्रीय समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविल्या जाणाऱ्या प्रवेशप्रक्रियेला आजपासून (दि. १०) सुरुवात होत आहे. एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत जाऊन आॅनलाइन अर्जाचा भाग १ भरायचा आहे. इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर नेमून दिलेल्या केंद्रावर जाऊन अर्ज भरावयाचा आहे.अकरावीच्या शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या माहितीपुस्तिकांचे सर्व माध्यमिक शाळांमध्ये वितरण करण्यात आले आहे. या माहितीपुस्तिकेमधील युजर आयडी व पासवर्डचा वापर करून विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे. या ...... संकेतस्थळावर प्रवेश अर्जातील भाग १ आॅनलाइन भरण्यासाठी लिंक गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभागाच्या सहायक संचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे.पुणे व पिंपरी-चिंचवडमधील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एसएससी बोर्ड) शाळांमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्येच आॅनलाइन अर्ज भरून तो मुख्याध्यापकांकडून अ‍ॅप्रुव्ह करून घ्यावा लागेल. मुख्याध्यापकांनी शाळास्तरावर विद्यार्थ्यांच्या अकरावी आॅनलाइन अर्ज भरण्याचे नियोजन करायचे आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून घेऊन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पाडायची आहे. १० मेपासून एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल लागेपर्यंत मुख्याध्यापकांनी शाळास्तरावर आॅनलाइन अर्जाचा भाग १ भरण्याची प्रक्रिया पार पाडायची आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांना दहावीत मिळालेले गुण व टक्केवारी आणि त्यांना हवे असलेले महाविद्यालय आदी माहितीचा भाग २ भरावा लागणार आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड शहराबाहेरील राज्यातील इतर शहर व गावांमधील एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना पुण्यातील महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी प्रवेश घ्यावयाचा असल्यास त्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील १० दिवसांच्या आत आॅनलाइन अर्जाचा भाग १ व भाग २ भरता येणार आहे. त्यासाठी त्यांना माहितीपुस्तिकेमध्ये दिलेल्या मार्गदर्शन केंद्रावर जाऊन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देता येणार आहे. त्या वेळी त्यांनी आॅनलाइन अर्जाचा भाग १ व भाग २ भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, वैधानिक व विशेष आरक्षणाबाबत आवश्यक कागदपत्रे आदी सोबत घेऊन मार्गदर्शन केंद्रावर जायचे आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडून महाविद्यालयांमधील रिक्त जागांची माहिती जाहीर केली जाणार आहे.निकालानंतर भाग २ भरावा लागणारपुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमधील विद्यार्थ्यांनी आता त्यांच्या शाळेत जाऊन आॅनलाइन भाग १ भरायचा आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांना दहावीत मिळालेले गुण व टक्केवारी आणि त्यांना हवे असलेले महाविद्यालय आदी माहितीचा भाग २ भरावा लागणार आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड बाहेरील गावांमध्ये शिकणाºया एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतरच पुढील १० दिवसांत माहितीपुस्तिकेमध्ये दिलेल्या मार्गदर्शन केंद्रावर जाऊन भाग १ व भाग २ एकाच वेळी भरायचा आहे.एसएससी बोर्डाव्यतिरिक्त अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठीएसएससी बोर्डा व्यतिरिक्त सीबीएसई, आयसीएसई आदी इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांना त्यांचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह माहिती पुस्तिकेत दिलेल्या अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या मार्गदर्शन केंद्रांवर जाऊन प्रवेश अर्ज भरण्याची व अ‍ॅप्रूव्ह करण्याची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयnewsबातम्या