शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

अकरावी प्रवेशप्रक्रिया आजपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 02:07 IST

अकरावीच्या केंद्रीय समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविल्या जाणाऱ्या प्रवेशप्रक्रियेला आजपासून (दि. १०) सुरुवात होत आहे. एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत जाऊन आॅनलाइन अर्जाचा भाग १ भरायचा आहे.

पुणे - अकरावीच्या केंद्रीय समितीमार्फत पुणे व पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राबविल्या जाणाऱ्या प्रवेशप्रक्रियेला आजपासून (दि. १०) सुरुवात होत आहे. एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेत जाऊन आॅनलाइन अर्जाचा भाग १ भरायचा आहे. इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल जाहीर झाल्यानंतर नेमून दिलेल्या केंद्रावर जाऊन अर्ज भरावयाचा आहे.अकरावीच्या शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मधील आॅनलाइन प्रवेशप्रक्रियेच्या माहितीपुस्तिकांचे सर्व माध्यमिक शाळांमध्ये वितरण करण्यात आले आहे. या माहितीपुस्तिकेमधील युजर आयडी व पासवर्डचा वापर करून विद्यार्थ्यांना आॅनलाइन अर्ज भरता येणार आहे. या ...... संकेतस्थळावर प्रवेश अर्जातील भाग १ आॅनलाइन भरण्यासाठी लिंक गुरुवारी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभागाच्या सहायक संचालक मीनाक्षी राऊत यांनी दिली आहे.पुणे व पिंपरी-चिंचवडमधील राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (एसएससी बोर्ड) शाळांमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्येच आॅनलाइन अर्ज भरून तो मुख्याध्यापकांकडून अ‍ॅप्रुव्ह करून घ्यावा लागेल. मुख्याध्यापकांनी शाळास्तरावर विद्यार्थ्यांच्या अकरावी आॅनलाइन अर्ज भरण्याचे नियोजन करायचे आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून घेऊन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पाडायची आहे. १० मेपासून एसएससी बोर्डाचा दहावीचा निकाल लागेपर्यंत मुख्याध्यापकांनी शाळास्तरावर आॅनलाइन अर्जाचा भाग १ भरण्याची प्रक्रिया पार पाडायची आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांना दहावीत मिळालेले गुण व टक्केवारी आणि त्यांना हवे असलेले महाविद्यालय आदी माहितीचा भाग २ भरावा लागणार आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड शहराबाहेरील राज्यातील इतर शहर व गावांमधील एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना पुण्यातील महाविद्यालयांमध्ये अकरावीसाठी प्रवेश घ्यावयाचा असल्यास त्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील १० दिवसांच्या आत आॅनलाइन अर्जाचा भाग १ व भाग २ भरता येणार आहे. त्यासाठी त्यांना माहितीपुस्तिकेमध्ये दिलेल्या मार्गदर्शन केंद्रावर जाऊन प्रवेश अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देता येणार आहे. त्या वेळी त्यांनी आॅनलाइन अर्जाचा भाग १ व भाग २ भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला, वैधानिक व विशेष आरक्षणाबाबत आवश्यक कागदपत्रे आदी सोबत घेऊन मार्गदर्शन केंद्रावर जायचे आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी केंद्रीय प्रवेश समितीकडून महाविद्यालयांमधील रिक्त जागांची माहिती जाहीर केली जाणार आहे.निकालानंतर भाग २ भरावा लागणारपुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमधील विद्यार्थ्यांनी आता त्यांच्या शाळेत जाऊन आॅनलाइन भाग १ भरायचा आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा त्यांना दहावीत मिळालेले गुण व टक्केवारी आणि त्यांना हवे असलेले महाविद्यालय आदी माहितीचा भाग २ भरावा लागणार आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड बाहेरील गावांमध्ये शिकणाºया एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतरच पुढील १० दिवसांत माहितीपुस्तिकेमध्ये दिलेल्या मार्गदर्शन केंद्रावर जाऊन भाग १ व भाग २ एकाच वेळी भरायचा आहे.एसएससी बोर्डाव्यतिरिक्त अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठीएसएससी बोर्डा व्यतिरिक्त सीबीएसई, आयसीएसई आदी इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांना त्यांचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह माहिती पुस्तिकेत दिलेल्या अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांकरिता असलेल्या मार्गदर्शन केंद्रांवर जाऊन प्रवेश अर्ज भरण्याची व अ‍ॅप्रूव्ह करण्याची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयnewsबातम्या