शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

भारनियमनाविरोधात संताप!, विद्युतपंपांची सलग १६ तास वीज गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 06:41 IST

ऐन दिवाळीच्या तोंडावर भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आॅक्टोबर हीटमध्ये सुरू असलेल्या भारनियमनामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये विजेचा प्रश्न अतिशय गंभीर बनत चालला असून, विद्युतपंपाच्या विजेचे सलग १६ तासांहून अधिक काळ भारनियमन केले जात आहे. तसेच, भारनियमनाव्यतिरिक्त उपलब्ध असलेली वीजही वारंवार खंडित होत असल्याने विजेचा विषय शेतकºयांच्या दृष्टीने डोकेदुखीचा बनू लागला आहे. याविरोधात संतप्त झालेल्या शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकºयांनी भोसे येथील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकले.खेड तालुक्याच्या पूर्व भागातील बहूळ, कोयाळी भानोबाची, मोहितेवाडी, शेलपिंपळगाव, दौंडकरवाडी, शेलगाव, साबळेवाडी, चिंचोशी, सिद्धेगव्हाण, गोलेगाव, वडगाव घेनंद, भोसे, नवीनगाव आदी गावांमध्ये मागील सात-आठ महिन्यांपासून विद्युत पंपाच्या विजेचे दिवसा १६ तास भारनियमन सुरू आहे. भारनियमन तसेच विजेच्या लपंडावाला बळी पडणारी ही गावे बारमाही पिकांच्या उत्पादनात अग्रेसर असून सलग होणाºया भारनियमनामुळे या गावांमधील रब्बी हंगामातील कांद्याच्या लागवडी तसेच अन्य पिकांच्या सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.भोसे येथे शुक्रवारी (दि. ७) शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच शेतकरी विजेच्या समस्या निवेदनाद्वारे मांडण्यासाठी गेले असता, कार्यालयातील अधिकाºयांनी पळ काढला. निवेदन स्वीकारण्याचे धाडस केले नाही. अखेर शेतकºयांनी आक्रमक भूमिका घेऊन कार्यालयाला टाळे ठोकून तीव्र भावना व्यक्त केल्या.या प्रसंगी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब दौंडकर, रोहिदास दौंडकर, सुभाष पवळे, उपसरपंच एकनाथ आवटे, रवींद्र आवटे, संदीप पोटवडे, वस्ताज दौंडकर, कांताराम लोणारी, बबनराव दौंडकर, दत्ता सोनवणे, कैलास आरगडे, रामदास आवटे आदींसह अन्य आंदोलक शेतकरी उपस्थित होते.अठरा तासांचे भारनियमन कमी करण्यासंदर्भात महावितरण कंपनीकडे शेतकरी वारंवार विनवणी करीत आहेत. मात्र, कंपनीकडून पूर्ण क्षमतेने वीज देण्यासंदर्भात कोणत्याही ठोस उपाययोजना आखल्या जात नसल्याने शेतकºयांच्या पदरी निराशा येत आहे. त्यामुळे ऐन रब्बी हंगामातील कांदालागवडीचे आव्हान शेतकºयांसमोर उभे राहिले आहे.

भारनियमनाविरोधात संताप!बारामती : ऐन दिवाळीच्या तोंडावर भारनियमन सुरू झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यातच आॅक्टोबर हीटमध्ये सुरू असलेल्या भारनियमनामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.बारामती शहरात किरकोळ भारनियमन सुरू आहे. बारामती शहर व एमआयडीसी परिसरात एकूण ८ वीजवाहिन्या आहेत. त्यांपैकी ७ वाहिन्या ए गटात व अवघी एक वाहिनी सी गटात आहे. त्यामुळे शहराला भारनियमनाचे जास्त चटके बसले नाहीत. शहरातील सी वाहिनीवरील केवळ थोड्या भागात सकाळी व दुपारी या दोन टप्प्यांत ४.४५ तास भारनियमन झाले. तर, उर्वरित शहर ए गटात असल्याने सकाळी ६ ते ७.३० या वेळेत केवळ दीड तास भारनियमन करावे लागले, अशी माहिती महावितरणच्या अधिकाºयांनी दिली.बारामती मंडलातील वाणिज्यिक व वितरण हानी जास्त असलेल्या वाहिन्यांवरील वीजग्राहकांना जास्त भारनियमनाचा फटका बसला. मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर या ६ तालुक्यांत ११२ वीजवाहिन्या आहेत. यात ए गटात ११, बी गटात ४, सी गटात १७, डी गटात १८, ई गटात २०, एफ गटात ८, जी-१ गटात ७, जी-२ गटात ६ व जी-३ गटात २१ वीजवाहिन्यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या टप्प्यात ए गटात ३.१५ तास, बी- ४ तास, सी-४.४५ तास, डी-५.३० तास, ई-६.१५ तास, एफ-७ तास, जी-१ मध्ये ७.४५ तास, जी-२ मध्ये ८.३० तर जी-३ या गटात ९.१५ तास भारनियमन होते.वीज नसल्याने दुर्गम भाग चाचपडतोयभोर : शहरात व ग्रामीण भागात दररोज सकाळी २ तर सायंकाळी २ असे ४ तासांचे भारनियमन करण्यात येणार आहे. शिवाय दर तासाला अधुनमधुन वारंवार वीज गायब होत आहे. वीजपुरवठा कोणतीही पूर्वसूचना न देताच वारंवार खंडित होत होता.भोर शहरात सकाळी ९.३० ते ११.४५ व दुपारी ३.३० ते ६ वाजेपर्यंत भारनियमन तर ग्रामीण भागात सोमवार ते गुरुवार सकाळी ७ ते ९.३० तर दुपारी २.४५ ते ५, शुक्रवार ते रविवार सकाळी ९.३० ते ११.४५ व दुपारी ३.३० ते ६ या वेळात भारनियमन करण्यात येणार आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावे भोरपासून ६० ते ७० किमी अंतरावर असून सध्या पावसाचे दिवस आहेत. वादळी वाºयासह पावसामुळे झाडांची पडझड होऊन वीजवाहक तारा तुटतात. अनेक खांब वाकतात आणी वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. १० गावांना मिळून एकवायरमन आहे. अनेक गावांत पावसाळ्यात महिनामहिना वीजपुरवठा नसतो. तुटलेल्या तारा जोडणे, खांब उभे करणे, ही कामे तर कधीच वेळेवर होत नाहीत. त्यामुळे दुर्गम डोंगरी गावातील लोकांना रात्ररात्र अंधारातच काढावी लागते.

टॅग्स :Puneपुणे