शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

थकीत बिलांमुळे वीज कनेक्शन तोडलं, संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 20:31 IST

मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची मागणी, यापुढे वीजजोड तोडल्यास आंदोलनाचा इशारा 

सांगवी : कृषी पंपासह सर्वच वर्गवारीतील थकबाकी असणाऱ्या ग्राहकांच्या वीजजोड तोडण्याच्या आदेशानंतर सांगवी,शिरवली,खांडज,कांबळेश्वर येथील विद्युत वीजजोड तोडण्याच्या कारवाई विरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत महावितरण कर्मचारी व अधिकारी यांच्यात शाब्दिक चकमक होऊन अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात आला.

गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने बारामती परिसरात पाठ फिरवली आहे.परिणामी खरीप पिकावर मोठ्या प्रमाणात फटका बसला. शेतकऱ्यांनी घेतलेले सोयाबीनचे पीक पाण्या अभावी जळून चालले आहे. उसाची पिके देखील आता जळण्याच्या मार्गावर आहेत. सुदैवाने धरण परिसरात झालेल्या पावसामुळे नदीला चांगल्या प्रकारे पाणीसाठा आहे. परंतु, शेतकऱ्यांची थकबाकी असल्याने ट्रान्स्फॉर्मर सोडवल्यामुळे पाणी असून ही शेतकरी हतबल झाले आहेत.अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सांगवी येथील महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत वाद घातला.सरकारने जाहिर केलेली कृषी संजीवनी योजनेत शेतकरी सहभागी होण्यास तयार आहेत. या योजनेत सहभागी होण्याची मुदत  मार्च २०२२ आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाची गंभीर परिस्थीती असल्यामुळे विद्युत अधिकारी यांना अपेक्षित असलेली थकीत रक्कम देण्यासाठी शेतकरी असमर्थ आहेत. यामुळे उसाची तोडणी होईपर्यंत,किंवा सोयाबीनचे पीक निघेपर्यंत महावितरणने मुदतवाढ द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती. परंतू, वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आल्यामुळे आम्ही मुदतवाढ देण्यासाठी असमर्थ असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यातून शेतकरी आणि महावितरण अधिकाऱ्यांच्या शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क करून वाद मिटविण्याचा प्रयत्न झाला. शेतकरी ऐकण्यास तयार नव्हते. जर यापुढे देखील विद्युत वीज तोडची भूमिका अशीच राहिली तर उग्र आंदोलन,रास्ता रोको व उपोषण या मार्गाचा अवलंब करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.

टॅग्स :BaramatiबारामतीmahavitaranमहावितरणFarmerशेतकरी