शहरं
Join us  
Trending Stories
1
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
2
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
3
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
4
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
5
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
6
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
7
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
8
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
9
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
10
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
11
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
12
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
13
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
14
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
15
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
16
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
17
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
18
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
19
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
20
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?

‘यशवंत’च्या भांडवलावरच होणार निवडणूक

By admin | Updated: January 28, 2017 00:15 IST

आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत. सर्वच राजकीय पक्षांना इतर कोणतेही ठोस मुद्दे

लोणी काळभोर : आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत आहेत. सर्वच राजकीय पक्षांना इतर कोणतेही ठोस मुद्दे नसल्याने लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या थेऊर येथील बंद पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची आठवण येऊ लागली आहे. या निवडणुकीतही हवेलीत यशवंत बंद या प्रश्नाच्या भांडवलावरच लढवली जाणार हे नक्की झाले आहे.निवडणूक आल्यावरच राजकीय पुढाऱ्यांना केवळ एकगठ्ठा मतांसाठी यशवंत कारखान्याची आठवण होते. विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आपल्या सोयीनुसार यशवंत बंद पडला, या विषयाचा वापर करून केवळ आश्वासनांचे गाजर दाखवून शेतकरी सभासदांच्या भावनांशी खेळ करून निवडणुकीपुरता हा विषय भिजत ठेवूत मते मिळवतात. इतरवेळी मात्र त्यांना त्याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. कारण या विषयांवर राजकारण करून निवडून येऊन सत्तेत मश्गूल झालेले विद्यमान खासदार व आमदारही अद्यापही याविषयी मौन बाळगून आहेत. या परिसरातील ऊस नेण्यास कुट्टीच व गुऱ्हाळचालक टाळाटाळ करीत असल्याने शेतकऱ्यांना त्यांचे उंबरे झिजवावे लागत आहेत. बाजारभाव व ऊसबिलाची खात्री नसतानाही केवळ नाइलाज म्हणून शेतकऱ्यांना कुट्टी व गुऱ्हाळमालकांची मनधरणी करावी लागत आहे. या कारणामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी हतबल झाला आहे. यशवंत सुरू करण्याचे श्रेय कोणत्याही राजकीय पक्षाने घ्या, परंतु कारखाना सुरू करून येथील शेतकऱ्यांचे संसार वाचवा, अशी भावना व्यक्त होत आहे. यशवंतची चाके आर्थिक गर्तेत खोल अडकल्याने संबंधित सहकारी संस्थांवरही त्याचा प्रभाव दिसून येत आहे.हवेली तालुक्यातील यशवंत कारखाना व हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या सहकारी संस्था तालुक्याच्या मुख्य रक्तवाहिन्या मानल्या जात होत्या व येथूनच सहकाराच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबातील काही जण आमदार, खासदार, विविध बॅँकेचे संचालक व तालुक्यातील महत्त्वाच्या पदी निवडले गेले. त्यामुळे एकेकाळी यशवंत व हवेलीचा जिल्ह्यातील राजकारणात दबदबा होता. परंतु काही संचालकांच्या गलथान व भ्रष्ट कारभारामुळे यशवंतला घरघर लागल्याने तालुक्याच्या शेतकरी सभासदांचे अर्थकारण मंदावले आहे. या भागातील ऊसपिकाचे क्षेत्र कमी होऊ लागले आहे. (वार्ताहर)