शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
3
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
4
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
5
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
6
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
7
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
8
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
9
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
10
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
11
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
12
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
13
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
14
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
15
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
16
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
17
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
18
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
19
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
20
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

निवडणूक खर्च २२ कोटी, मतदानकेंद्र कर्मचारी उपाशी

By admin | Updated: February 21, 2017 03:34 IST

महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ४१ प्रभागांमध्ये तब्बल २० हजार कर्मचारी तैनात करण्यात आले

पुणे : महापालिका निवडणुकीत मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी ४१ प्रभागांमध्ये तब्बल २० हजार कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. मतदान केंद्रातील त्यांच्या एक रात्र व एक दिवसाच्या जेवणाची सोय त्यांनी स्वत:च करायची आहे. त्यांना तसाच सल्ला देण्यात आला आहे. निवडणुकीवर २२ कोटी रुपयांचा खर्च होत असून, अधिकाऱ्यांचा थाटमाट तर प्रत्यक्ष काम करणाऱ्यांची मात्र गैरसोय असा प्रकार यात होत आहे.मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांंना सोमवारी (दि. २०) रात्रीपासूनच केंद्रात मुक्कामी येण्यास सांगण्यात आले आहे. मंगळवारी (दि. २१) सकाळी साडेसातपासून मतदान प्रक्रियेस सुरूवात होईल. ती सायंकाळी साडेपाचपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतरही केंद्राच्या आवारात असतील त्या सर्व मतदारांना आत बोलावून त्यांचे मतदान करून घ्यावे लागणार आहे. केंद्राधिकाऱ्यांसह त्यांच्या सहायकांनाही या काळात केंद्र सोडून कुठेही जाता येणार नाही. त्यामुळेच एका प्रशिक्षण सत्रात काही कर्मचाऱ्यांनी जेवणाचा विषय उपस्थित केला होता. मात्र, ते तुमचे तुम्हीच पहायचे, असे त्यांना वरिष्ठांकडून सांगण्यात आले. त्यामुळे बहुतेक कर्मचारी आपला सोमवारी रात्रीचा व मंगळवारचा दिवसभराचा डबा घेऊनच केंद्रात मुक्कामी गेले आहेत. कामासाठी नियुक्त करून घेतलेल्या कर्मचाऱ्यांना फूड पॅकेटस् पुरवणे सहज शक्य असतानाही ते टाळण्यात आले आहे, अशी यातून कर्मचाऱ्यांची भावना झाली आहे. नियुक्त कर्मचाऱ्यांमध्ये काहीजण निवृत्तीच्या उंबरठ्यावर असून, त्यांच्या जेवणाच्या, औषध घेण्याच्या वेळा ठरलेल्या आहेत. त्यांनाही दुर्लक्षित करण्यात आले आहे.महापालिका निवडणुकीचा एकूण खर्च २२ कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आला आहे. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहने, कर्मचारी असा बराच खर्च आहे. त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही भारी हॉटेलमधून खाद्यपदार्थ आणून गेले अनेक दिवस करण्यात येत आहे. त्या तुलनेत या कर्मचाऱ्यांचे मानधनही फार नाही. साधारण ५०० ते ७०० रुपये त्यांना देण्यात येतात. तेही या वेळी धनादेशाने थेट प्रत्येकाच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मंगळवारचा खर्च स्वत:च्या खिशातूनच करावा लागणार आहे. 1बहुसंख्य निवडणूक केंद्र शाळांमध्ये आहेत. तिथे कर्मचाऱ्यांसाठी आंघोळीची, पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची कसलीही व्यवस्था अनेक शाळांमध्ये नाही. सोमवारी रात्री या शाळांमध्ये झोपायचे कसे, असा प्रश्न अनेक कर्मचाऱ्यांना पडला होता. घरूनच अंथरूण, पांघरून आणून काहींनी हा प्रश्न सोडविला. तसे न केलेल्यांची मात्र अडचण झाली.2मतदान प्रक्रियेत सुमारे १० हजार पोलीस ही बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था मात्र पोलीस खात्याकडून करण्यात आली आहे. पोलिसांना त्यांच्या जागेवर फूड पॅकेट्स् पुरवणारी यंत्रणा पोलिसांनी विकसित केली आहे.