शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
3
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
4
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
5
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
6
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
7
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
8
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
9
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
10
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
11
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
12
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
13
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
14
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
15
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
16
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
17
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
18
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
19
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
20
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्यांच्या निवडणुका ३१ मार्चपूर्वी, मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू - सुभाष देशमुख  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 02:27 IST

राज्यातील मुदत संपलेल्या सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका येत्या ३१ मार्चपूर्वी घेण्यात येणार आहे. राज्यात पहिल्यादाच नवीन सहकार कायद्यानुसार या निवडणुका होणार असून, यासाठी आवश्यक असलेली निवडणूक नियमावली तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच बोगस मतदान टाळण्यासाठी या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनद्वारे व मतदार आधार लिंक करून घेण्यात येणार असल्याचे राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे सांगितले.

पुणे : राज्यातील मुदत संपलेल्या सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका येत्या ३१ मार्चपूर्वी घेण्यात येणार आहे. राज्यात पहिल्यादाच नवीन सहकार कायद्यानुसार या निवडणुका होणार असून, यासाठी आवश्यक असलेली निवडणूक नियमावली तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच बोगस मतदान टाळण्यासाठी या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनद्वारे व मतदार आधार लिंक करून घेण्यात येणार असल्याचे राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे सांगितले.राज्यातील अनेक बाजार समित्यांच्या निवडणुका दहा- बारा वर्षांपासून रखडल्या आहेत. सर्वाच्च न्यायालयाने देखील निवडणुकीची सर्व प्रक्रिया त्वरीत पूर्ण करून निवडणुका घेण्याचे आदेश शासनाला दिले आहेत.याबाबत देशमुख यांना विचारले असता देशमुख यांनी सांगितले की, सहकार विभागाने केलेल्या तापसणीमध्ये राज्यात तब्बल ११ हजार सहकारी संथ्या केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे निदर्शनास आले आहे. या सहकारी संस्थांचा उपयोग केवळ निवडणुकीत बोगस मतदानासाठी केला जात असल्याची शंका आहे. यात अनेक संस्था या काही विशिष्ट कुटुंबीयांच्या घरातील सदस्यांच्या ‘पिशव्यातल्या’ संस्था होत्या. त्यामुळे शासनाने सहकारी संस्था व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकासाठी अत्यंत कडक व बोगसगिरी टाळण्यासाठी सुक्ष्म नियोजन करत आहेत. यासाठी प्रथमच या सर्व निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मिशिन (ईव्हीम) द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदार आधार लिंक करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहकार नवीन कायद्यानुसार थेट शेतकºयांमधून संचालक मंडळावर प्रतिनिधीची निवड करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक शेतक-याला मतदानाचा अधिकार देण्यात येणार आहे.या वेळी ज्या शेतकºयांच्या नावावर किमान दहा गुंठे जमीन आहे, त्यांना मतदानचा अधिकार मिळणार आहे. तसेच पुढील निवडणुकीत यामध्ये बदल करून किमान तीन वर्षे बाजार समितीत शेतमाल विक्री व्यवहार केलेल्या शेतकºयांना मतदानासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. या निवडणुकांची अंतिम नियमावली तयार झाली आहे.सहकारी संस्थाचे खाजगीकरण करणारे विरोध करणारच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचा कृषी बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याला विरोध आहे. याबाबत सुभाष देशमुख म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांमध्ये सहकारी कारखाने, दूधसंघ, सूतगिरण्या, खरेदी-विक्री संघाची दुरवस्था कोणी केली, खासगी कारखाने, दूधसंघ कोणत्यापक्षाच्या नेत्यांचे आहेत, असा सवाल उपस्थित करीत. ज्या शेतक-यांसाठी या संस्था काढल्या, त्या शेतक-यांना आमच्या सरकारने थेट मतदानाचा अधिकार दिल्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार विरोध का करतात, त्यांना नेमकी कशाची भीती आहे, असा प्रश्न उपस्थित करत सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका होणारच, याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखGovernmentसरकारPuneपुणे