शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बाजार समित्यांच्या निवडणुका ३१ मार्चपूर्वी, मतदारयादी तयार करण्याचे काम सुरू - सुभाष देशमुख  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 02:27 IST

राज्यातील मुदत संपलेल्या सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका येत्या ३१ मार्चपूर्वी घेण्यात येणार आहे. राज्यात पहिल्यादाच नवीन सहकार कायद्यानुसार या निवडणुका होणार असून, यासाठी आवश्यक असलेली निवडणूक नियमावली तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच बोगस मतदान टाळण्यासाठी या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनद्वारे व मतदार आधार लिंक करून घेण्यात येणार असल्याचे राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे सांगितले.

पुणे : राज्यातील मुदत संपलेल्या सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका येत्या ३१ मार्चपूर्वी घेण्यात येणार आहे. राज्यात पहिल्यादाच नवीन सहकार कायद्यानुसार या निवडणुका होणार असून, यासाठी आवश्यक असलेली निवडणूक नियमावली तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच बोगस मतदान टाळण्यासाठी या निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनद्वारे व मतदार आधार लिंक करून घेण्यात येणार असल्याचे राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी येथे सांगितले.राज्यातील अनेक बाजार समित्यांच्या निवडणुका दहा- बारा वर्षांपासून रखडल्या आहेत. सर्वाच्च न्यायालयाने देखील निवडणुकीची सर्व प्रक्रिया त्वरीत पूर्ण करून निवडणुका घेण्याचे आदेश शासनाला दिले आहेत.याबाबत देशमुख यांना विचारले असता देशमुख यांनी सांगितले की, सहकार विभागाने केलेल्या तापसणीमध्ये राज्यात तब्बल ११ हजार सहकारी संथ्या केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे निदर्शनास आले आहे. या सहकारी संस्थांचा उपयोग केवळ निवडणुकीत बोगस मतदानासाठी केला जात असल्याची शंका आहे. यात अनेक संस्था या काही विशिष्ट कुटुंबीयांच्या घरातील सदस्यांच्या ‘पिशव्यातल्या’ संस्था होत्या. त्यामुळे शासनाने सहकारी संस्था व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकासाठी अत्यंत कडक व बोगसगिरी टाळण्यासाठी सुक्ष्म नियोजन करत आहेत. यासाठी प्रथमच या सर्व निवडणुका इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मिशिन (ईव्हीम) द्वारे घेण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदार आधार लिंक करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहकार नवीन कायद्यानुसार थेट शेतकºयांमधून संचालक मंडळावर प्रतिनिधीची निवड करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक शेतक-याला मतदानाचा अधिकार देण्यात येणार आहे.या वेळी ज्या शेतकºयांच्या नावावर किमान दहा गुंठे जमीन आहे, त्यांना मतदानचा अधिकार मिळणार आहे. तसेच पुढील निवडणुकीत यामध्ये बदल करून किमान तीन वर्षे बाजार समितीत शेतमाल विक्री व्यवहार केलेल्या शेतकºयांना मतदानासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे. या निवडणुकांची अंतिम नियमावली तयार झाली आहे.सहकारी संस्थाचे खाजगीकरण करणारे विरोध करणारच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचा कृषी बाजार समित्यांच्या निवडणुकांमध्ये शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्याला विरोध आहे. याबाबत सुभाष देशमुख म्हणाले, गेल्या पंधरा वर्षांमध्ये सहकारी कारखाने, दूधसंघ, सूतगिरण्या, खरेदी-विक्री संघाची दुरवस्था कोणी केली, खासगी कारखाने, दूधसंघ कोणत्यापक्षाच्या नेत्यांचे आहेत, असा सवाल उपस्थित करीत. ज्या शेतक-यांसाठी या संस्था काढल्या, त्या शेतक-यांना आमच्या सरकारने थेट मतदानाचा अधिकार दिल्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार विरोध का करतात, त्यांना नेमकी कशाची भीती आहे, असा प्रश्न उपस्थित करत सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका होणारच, याचा पुनरूच्चार त्यांनी केला.

टॅग्स :Subhash Deshmukhसुभाष देशमुखGovernmentसरकारPuneपुणे