शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा ऑगस्ट अखेरपर्यंत स्थगिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 21:37 IST

सहकारी संस्थाच्या निवडणुका तब्बल पाचवेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

- सतिश सांगळेकळस : कर्जमाफी व त्यानंतर कोरोना लॉकडाऊन यामुळे लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका सतत पुढे ढकलण्यात येत आहेत. चार वेळा मुदतवाढ होवुनही ३१ मार्च पर्यं त या निवडणुकिला स्थगिती  देण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा नव्याने ३१ आँगस्ट पर्यंत स्थगीती देण्यात आली आहे. त्यामुळे विध्यमान संचालक मंडळाला बोनस मिळाला आहे.

सहकारी संस्थाच्या निवडणुका तब्बल पाचवेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेसाठी जानेवारीमध्ये २०२० मध्ये  या निवडणुका ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने १७ मार्चला पुन्हा ३ महिन्यांचा कालावधी वाढवण्यात आला. पुढे अजून दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. अखेर डिसेंबरला २०२० मुदत संपल्याने   १६ जानेवारीला आदेश काढुन पुन्हा तिन महिने मुदतवाढ दिली होती. मात्र, राज्यात १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या असून करोनाकाळातच विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. अन्य राज्यांतही सर्व निवडणुका सुरू आहेत. अशा वेळी केवळ सहकारी संस्थांच्या निवडणुका वारंवार लांबणीवर टाकणे चुकीचे असल्याने पुन्हा नव्याने २ फेब्रुवारीला आदेश काढुन निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले. मात्र आता पुन्हा निवडणुका आहे. त्या स्थितीत सहकार अधिनियमातील १९६० च्या कलम ७३ क मधील तरतुदीनुसार सहकारी संस्थांच्या निवडणुका एका वर्षापेक्षा जास्त कालावधीपर्यंत पुढे ढकलण्याची तरतूद नसल्याने कोरोना चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत सरकारला निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. त्यामुळे सरकारला असलेल्या नैसर्गिक अंतर्भूत सार्वभौम अधिकाराचा वापर करत १९६० च्या कलम १५७ मधील तसेच कलम ७३ क क मधील तरतुदीला वगळून उच्च न्यायालयाने ज्यांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या संस्था वगळून, राज्यातील इतर सर्व सहकारी संस्था आता ३१ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

सहकार विभागाचे कक्ष अधिकारी अनिल चौधरी यांन या संदर्भात आदेश जारी केला आहे. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकललेल्या नाहीत, त्यांच्या निवडणुका घेण्यासंदर्भात कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून त्या निवडणुका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यात एकूण सुमारे ६५ हजार  सहकारी संस्थांची निवडणूक बाकी आहे. राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या, दूध संघ, शिखर संस्था अशा ‘अ’ वर्गातील ११६ मोठय़ा सहकारी संस्था, सहकारी नागरी बँका, क्रेडिट सोसायटी, कर्मचाऱ्यांच्या क्रेडिट सोसायटी अशा ‘ब’ वर्गातील मध्यम स्वरूपाच्या १६ हजार  छोटय़ा क्रेडिट सोसायटी, गृहनिर्माण संस्था, छोटे दूध संघ अशा ‘क’ वर्गातील १९ हजार  आणि ग्राहक संस्था, कामगार संस्था अशा ‘ड’ वर्गातील २९ हजार संस्था अशा एकूण ६५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या आहेत.

टॅग्स :BaramatiबारामतीElectionनिवडणूकState Governmentराज्य सरकारcorona virusकोरोना वायरस बातम्या