शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

महाविद्यालयांमध्ये ‘इलेट्रोरल लिटरसी क्लब’ - सौरभ राव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 21:58 IST

निवडणूक प्रक्रिया समजावून घेणे, लोकशाहीला बळकटी देणे आणि तरुणांमध्ये याविषयी जागृती निर्माण करणे यासाठी महाविद्यालय स्तरावर  ‘इलेक्टोरल लिटरसी क्लब’ची स्थापना करण्यात आली आहे.

पुणे : निवडणूक प्रक्रिया समजावून घेणे, लोकशाहीला बळकटी देणे आणि तरुणांमध्ये याविषयी जागृती निर्माण करणे यासाठी महाविद्यालय स्तरावर  ‘इलेक्टोरल लिटरसी क्लब’ची स्थापना करण्यात आली आहे. आतापर्यंत ७४ महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम सुरु करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. केंद्रिय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतदार पुनरिक्षण मोहिम हाती घेण्यात आली आहे. मतदार नोंदणीसाठी ४९ हजार अर्ज आले असून यातील ३७ हजार ३७७ मतदारांची डेटा एंट्री पूर्ण झाली आहे. तर १२ हजार मतदारांची माहिती भरण्याचे काम सुरु आहे. यामध्ये आॅनलाईन २५ हजार ८०१ अर्ज आलेले आहेत. तर २६ हजार ८६० अर्ज आॅफलाईन आलेले आहेत. या अर्जांची १०० टक्के माहिती भरुन ३१ डिसेंबरपर्यंत त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. त्यानंतर १० जानेवारीला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे राव यांनी सांगितले. या कामासाठी जिल्ह्यामध्ये २१ निवडणूक अधिकारी आणि ३८ सहायक निवडणूक अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. वेळ कमी असल्याने तीन पाळींमध्ये काम करण्यात येत आहे. जनजागृती करण्याबरोबरच विद्यापीठ, महाविद्यालयीन स्तरावर युवा मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. यासोबतच केंद्रिय निवडणूक आयोगाने एक जानेवारी २०१८ पर्यंत वयाची १८ वर्षे पूर्ण करणा-या मतदारांसह १ जानेवारी २००० या दिवशी जन्म झालेल्या ‘सहस्त्रक मतदारां’ची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मतदारांना  ‘युथ आयकॉन’ म्हणून निवडण्यात येणार आहे. राष्ट्रीय मतदार दिवस या दिवशी त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. जिल्हा व शहर मिळून २१ मतदार संघांमध्ये राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जाणार आहे. यासोबतच दिव्यांग मतदारांमध्ये निवडणूक प्रक्रियेविषयी आस्था निर्माण करण्यासाठी विशेष कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, विविध सामाजिक संस्था सहभागी होणार असून त्यांच्या समन्वयातून मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे. तरुण आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी निवडणूक प्रक्रियेविषयी संवाद होत राहीला तर लोकशाहीला बळ मिळेल या उद्देशाने महाविद्यालय स्तरावर स्थापन करण्यात येत असलेल्या  ‘इलेक्टोरल लिटरसी क्लब’ची संख्या २०० नेणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.