शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

थोरला भाऊ धाकट्याच्या डोळ्यादेखत होरपळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:12 IST

नम्रता फडणीस लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीत आम्ही आठ जण कामासाठी गेलो होतो. पाच जण आतल्या ...

नम्रता फडणीस

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : “सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीत आम्ही आठ जण कामासाठी गेलो होतो. पाच जण आतल्या बाजूला होते. आम्ही काही अंतरावर काम करीत होतो. आग लागल्याचे कळताच मी वरच्या मजल्यावरून खाली उडी मारली. पण धूर खूप झाल्याने भाऊ बाहेर पडू शकला नाही. आग मोठी असल्याने इच्छा असूनही भावाला वाचवू शकलो नाही. माझ्या डोळ्यादेखत तो गेला,” हे सांगताना अविनाश सरोजचे अश्रू थांबत नव्हते.

सिरम इन्स्टिट्यूटच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर गुरूवारी (दि. २१) लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला. यातील रमा शंकर हरीजन आणि बिपीन सरोज हे दोघे उत्तरप्रदेशचे तर सुशीलकुमार पांडे हा बिहारचा आहे. आगीत जळून भस्मसात झालेल्या महाराष्ट्राबाहेरील तिघांचे पार्थिव ससूनच्या शवागरात ठेवण्यात आले होते. त्यांचे कुटुंबीय आल्यानंतर शुक्रवारी (दि. २२) सायंकाळी पाचच्या सुमारास ही पार्थिवे त्यांच्या ताब्यात देण्यात आली. ही तिन्ही पार्थिवे रूग्णवाहिकेतून त्यांच्या मूळ गावी नेण्याचा निर्णय या कुटुंबीयांनी घेतला.

आगीतून बचावलेल्या अविनाशने ‘आंखो देखा हाल’ ‘लोकमत’ला सांगितला. तो म्हणाला, “आम्ही चार भावंड. बिपीन हा माझा मोठा भाऊ. रमा हरीजन हा देखील आमच्या घरापासून काही अंतरावर राहणारा. काही वर्षांपूर्वी आम्ही पुण्यात कामानिमित्त आलो. गुरूवारी इमारतीमध्ये एसी बसविण्यासाठी आम्ही गेलो होतो. आग लागल्यावर आम्ही तिघांनी खालच्या मजल्यावर उडी मारली. आगीमुळे सगळीकडे धुर पसरला होता. पुढचे काहीही दिसत नव्हते. आम्ही फक्त मदतीसाठी हाका मारत राहिलो.”

“भाऊ डोळ्यादेखत होरपळला पण काही करु शकलो नाही. हा दिवस कधीच विसरू शकत नाही,” हे सांगताना अविनाशने हंबरडा फोडला. ससूनच्या शवागराबाहेर तिघांचा मित्र परिवार हजर होता. सर्वांच्याच डोळ्यातून अश्रू वाहात होते. कुणीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. असा दिवस उगवेल असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते, अशीच सगळ्यांची भावना होती.