शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अठराविश्वे दारिद्य्रात जगतोय डवर

By admin | Updated: February 11, 2017 02:36 IST

भटक्या समाजापैकी एक दुर्लक्षित होत चाललेला समाज म्हणून डवरगोसावी समाजाकडे पाहिले जाते. आजही हा समाज म्हटलं

वालचंदनगर : भटक्या समाजापैकी एक दुर्लक्षित होत चाललेला समाज म्हणून डवरगोसावी समाजाकडे पाहिले जाते. आजही हा समाज म्हटलं, की गावकुसाबाहेर पालं ठोकून तात्पुरते वास्तव्य करणारा समाज डोळ्यांसमोर उभा राहतो. अठराविश्वे दारिद्य्रात आजही हा समाज आपले जीवन जगत आहे. बहुरुपी बनून महाराष्ट्रातील संपूर्ण ग्रामीण भाग पिंजून काढला. त्यावर घरातील आठ माणसांचा सांभाळ करण्यात आला. परंतु, सध्या दान करीत नसल्यामुळे उपासमारीची वेळ सर्वच भटक्या समाजातील माणसांवर येऊन ठेपली आहे. या समाजातील कुटुंबातील माणसाला शासनाच्या योजना दिल्यास हा समाज समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही. असे बहुरुपी प्रकाश साळुंके यांनी सांगितले. नाथपंथीय डवरगोसावी हा समाज महाराष्ट्रात बोटावर मोजण्याइतकाच शिल्लक आहे. आजही अठराविश्वे दारिद्य्रातच जीवन कंठित करताना दिसत आहे. वडिलोपार्जित व्यवसाय प्रकाशने वयाच्या १० व्या वर्षातच स्वीकारला. आज जवळजवळ ३४ वर्षे बहुरुपी बनून महाराष्ट्रातील माणसाची करमणूक केली. शाळेत कसलेच पाऊल न टाकलेल्या पाच मुली रेश्मा, अनिता, काजल, मंगल, रेखा यांपैकी रेखाचे लग्न अवघ्या ३ हजार ५०० रुपयांत करण्यात यश आले. मुलगा सागर हुशार असल्याने १० वीपर्यंत शिक्षण घेण्यात आले. धाकटा महेश रोजंदारी करून उपजीविका भागविण्यासाठी बाहेरगावी आहे. या समाजाला आजही गावाच्या बाहेरच वास्तव्य करून उपजीविका भागविण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. (वार्ताहर)