शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Chandrakant Patil | शनिवारवाडा परिसरातील बांधकामबंदी उठविण्यासाठी प्रयत्न : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 10:20 IST

या परिसरातील बांधकामांवरील बंदी उठविण्यासाठी लवकरच केंद्र सरकारला राज्याकडून प्रस्ताव पाठविण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली...

पुणे : शनिवारवाड्याच्या शंभर मीटर परिघातील जुन्या वाड्यांचा पुनर्विकास व नवीन बांधकामांना परवानगी याबाबत राज्य सरकार गांभीर्याने विचार करीत असून, या परिसरातील बांधकामांवरील बंदी उठविण्यासाठी लवकरच केंद्र सरकारला राज्याकडून प्रस्ताव पाठविण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पुणे महापालिका अधिकारी व शहरातील आमदार यांच्या बैठकीनंतर पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, या भागातील बांधकामावरील असलेली बंदी हटविण्यासाठी काय करता येईल? यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे गांभीर्याने या विषयाकडे पाहत आहे. केंद्र सरकारचा हा कायदा असल्याने त्याचा फेरविचार करण्याबाबत राज्याकडून शिफारस करण्यात येणार आहे.

कसब्यासह शहरातील अन्य पेठांमधील जुन्या वाड्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारच्या स्तरावर चर्चा सुरू असून, लवकरच याबाबतही निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान येरवडा येथील महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड व नागपूर चाळीचे पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी वायुदल आणि महापालिकेच्या अधिकारी यांची एकत्रित बैठक बोलावून या बैठकीमध्ये निर्णय घेण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या नदीकाठ सुधार व सुशोभीकरण प्रकल्पात काही वृक्ष व बहुतांशी झुडपं काढावी लागणार आहे. तरीही त्याच्या जागी अधिकचे झाडे लावून ती वाढवली जाणार आहेत. या प्रकल्पाच्या कंत्राटमध्ये नमूद आहे, त्यामुळे विरोधकांनी चिंता करू नये, असे पाटील यांनी यावेळी सांगितले. तर जायका प्रकल्पाचा संपूर्ण खर्च केंद्र सरकारच करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मेट्रो प्रकल्पाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होणार असून, त्याचे काम अंतिम टप्प्यात. तर मेट्रोचा ३३ किमीचा पहिला संपूर्ण टप्पा साधारण मार्च २०२४ अखेरपर्यंत पूर्ण होईल असेही पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलshanivar wadaशनिवारवाडा