शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणातही ‘नगररचना’ दुर्लक्षित, देशभरात केवळ ५०० विद्यार्थ्यांची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 02:53 IST

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ‘भुक्कड’ अशा शेलक्या शब्दात राज्याच्या नगररचना विभागावर टीका केली होती. मात्र, सुरुवातीपासूनच शासनाने नगररचना या विषयाच्या तंत्रशुद्ध शिक्षणाकडेच दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे.

- राजानंद मोरे ।पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ‘भुक्कड’ अशा शेलक्या शब्दात राज्याच्या नगररचना विभागावर टीका केली होती. मात्र, सुरुवातीपासूनच शासनाने नगररचना या विषयाच्या तंत्रशुद्ध शिक्षणाकडेच दुर्लक्ष केल्याचे वास्तव आहे. सद्य:स्थितीत देशात २०च्या जवळपास तर महाराष्ट्रात केवळ एकाच संस्थेमध्ये नगर रचनेचा अभ्यासक्रम चालविला जात आहे. कुशल नगररचनाकार तयार करणा-या संस्थांची संख्याच तोकडी दिसत आहे.खेड्यापासून शहरांपर्यंतच्या नियोजनासाठी नगररचना विभागाला खूप महत्त्व आहे. अलीकडच्या काळात हा विभाग नेहमीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडेच राहिला आहे. असे असतानाही देशात नगररचनाकार तयार करणाºया शैक्षणिक संस्थांची संख्या बोटावर मोजण्याइतपतच आहे. राज्यात केवळ पुण्यात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एम. टेक. (टाऊन अ‍ॅन्ड कंट्री प्लॅनिंग) आणि बी. टेक. (प्लॅनिंग) हे दोनच अभ्यासक्रम सुरू आहेत. या अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता केवळ ९० एवढीच आहे. देशभरातून एका वर्षात केवळ४०० ते ५०० विद्यार्थी हे शिक्षणघेऊन बाहेर पडत आहेत. त्यापैकी अनेक जण मुख्य प्रवाहात येतनाहीत.एका अहवालानुसार २०३० पर्यंत देशात सुमारे ३ लाख नगररचनाकारांची आवश्यकता भासणार आहे. देशात काही हजारच तज्ज्ञ आहेत. शैक्षणिक संस्था कमी असल्याने हा आकडा पार करणेही अशक्यप्राय आहे. महाराष्ट्रातही २०१० मध्ये सुमारे ५ हजार रचनाकार आवश्यक होते. आता हा आकडा आणखी वाढला आहे.त्या तुलनेत शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन बाहेर पडणाºया विद्यार्थ्यांची संख्या नगण्य आहे. त्यासाठी शासनाने नगररचनेविषयी शिक्षण देणाºया संस्थांमध्ये वाढ करणे अत्यंत आवश्यक असल्याचे इन्स्टिट्यूटआॅफ टाऊन प्लॅनर्सचे सदस्य व प्राध्यापक डॉ. प्रताप रावळ यांनी सांगितले.कला, क्रीडासाठी अंशकालीन शिक्षक नेमणार; १८३५ शाळांना फायदाकला, क्रीडा व कार्यानुभव या तीन विषयांसाठी अंशकालीन शिक्षकांची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामुळे १०० हून अधिक पटसंख्या असलेल्या १,८३५ शाळांमध्ये ५ हजार ५०५ शिक्षकांची नियुक्ती होणार आहे.राज्यातील इयत्ता सहावी ते आठवीच्या शाळांमध्ये कला, क्रीडा, कार्यानुभव या विषयांसाठी अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. या विषयांच्या शिक्षकांनी शासनाच्या या निर्णयाला जोरदार विरोध केला होता. संबंधित शाळेच्या परिसरातील कलाकार आणि खेळाडूंनाच मानधन देऊन अतिथी शिक्षक म्हणून दर्जा देण्याचा आदेश शासनाने काढला होता. मात्र, त्यानंतर अनेक शाळांना अतिथी शिक्षकच मिळाले नाहीत. नियमित शिक्षकांच्या नियुक्त्याच रद्द झाल्याने हा निर्णय म्हणजे शिक्षण हक्क कायद्याचा भंग असल्याचे सांगत शिक्षकांनी याचिकाही दाखल केली होती.दोन वर्षांपासून हा मुद्दा ऐरणीवर आला होता. याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने नियमित शिक्षकांच्या नियुक्ती गरजेचे असल्याचे आदेश दोन महिन्यांपूर्वी दिले होते. त्यानुसार अतिथी शिक्षकांच्या नियुक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला आहे. याबाबत शुक्रवारी काढलेल्या सुधारित आदेशामध्ये शासनाने अंशकालीन शिक्षकांची नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत चालविण्यात येणाºया १०० हून अधिक पटसंख्या असलेल्या उच्च प्राथमिकच्या १,८३५ शाळांना हे शिक्षक मिळणार आहेत. या नियुक्तीनंतर आवश्यकता भासल्यास अतिथी शिक्षकही तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त करण्यास मान्यता देण्यात येते़राज्यात केवळ एकच संस्थादेशात ७३ व्या, ७४व्या घटनादुरुस्तीत स्थानिक स्वराज्य संस्थांकडे नियोजन, व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ग्रामीण भागातून शहरांकडे स्थलांतरण वाढले आहे. स्मार्ट सिटीसाठीही खेडी व शहरांचे नियोजन गरजेचे आहे.- रामचंद्र गोहाड,ज्येष्ठ नगररचना तज्ज्ञ