शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

रानभाज्या लोकचळवळ व्हावी : प्र.के घाणेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 17:34 IST

रानभाज्या कधी खाव्यात, कशा कराव्यात ,कशाबरोबर खाव्यात याचे पारंपरिक ज्ञान वनवासी -गिरीवासी लोकांना आहे.

ठळक मुद्देतीन लाख वनस्पती जगात आहेत. त्यातील ३० हजार वनस्पती माणूस वापरतोखाद्यवारसा जपायला हवा. या खाद्यवारशाचे दस्ताऐवजीकरण झाले पाहिजे

पुणे : पर्यावरण स्नेही आणि सेंद्रिय असलेल्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात उपटल्या गेल्या तर हे पौष्टिक वाण अस्तंगत होण्याचा धोका आहे. त्यामुळे शास्त्रीय मार्गाने संशोधन करून रानभाज्यांचे चांगले वाण जतन करण्याची लोकचळवळ व्हायला हवी. हे ज्ञान आणि हा खाद्यवारसा जपायला हवा. या खाद्यवारशाचे दस्ताऐवजीकरण झाले पाहिजे, अशी अपेक्षा प्रा . प्र . के . घाणेकर यांनी गुरुवारी सायंकाळी व्यक्त केली .  'जीविधा 'संस्थेच्या हिरवाई महोत्सवास प्रारंभ करताना पहिल्या दिवशी 'रानभाज्या : रानातून पानात ' या विषयावर ते बोलत होते. हा महोत्सव इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर येथे सुरु झाला. यंदाचे या महोत्सवाचे आठवे वर्ष आहे . प्रा . घाणेकर म्हणाले , तीन लाख वनस्पती जगात आहेत. त्यातील ३० हजार वनस्पती माणूस वापरतो. यापैकी ३०० वनस्पती खाद्य म्हणून वापरता येतात . आणि तीसच वनस्पतींची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. हल्ली रानभाज्यांकडे सर्वांचे लक्ष जाऊ लागले आहे. पूर्वी रानभाज्या गाव वस्तीच्या जवळ आढळत असत. आता त्या शोधायला, मिळविण्यासाठी लांब डोंगरात जावे लागते. रानभाज्या या अधिक पर्यावरणस्नेही आहेत , अधिक सेंद्रिय आहेत. त्यामुळे शहरवासियांचे त्याकडे लक्ष गेले आहे. या रानभाज्या शहरात मिळाव्यात यासाठी त्यांचे काही वाण परसबाग, शेतात लावता येतील का हे पहिले पाहिजे . एकीकडे आपण लागवड करीत असलेल्या गोष्टींचे पोषण मूल्य कमी होत चालले आहे. दुसरीकडे रानभाज्या खाण्याची उत्सुकता वाढली आहे. रानभाज्या कधी खाव्यात, कशा कराव्यात ,कशाबरोबर खाव्यात याचे पारंपरिक ज्ञान वनवासी -गिरीवासी लोकांना आहे. विवेक वेलणकर यांनी प्रास्ताविक केले. राजीव पंडित यांनी महोत्सवाची माहिती दिली. यावेळी डॉ . वृंदा कार्येकर यांनी रानभाज्या व्हाट्स अप ग्रुपची माहिती दिली .

टॅग्स :Puneपुणेagricultureशेतीenvironmentवातावरण