शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रानभाज्या लोकचळवळ व्हावी : प्र.के घाणेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 17:34 IST

रानभाज्या कधी खाव्यात, कशा कराव्यात ,कशाबरोबर खाव्यात याचे पारंपरिक ज्ञान वनवासी -गिरीवासी लोकांना आहे.

ठळक मुद्देतीन लाख वनस्पती जगात आहेत. त्यातील ३० हजार वनस्पती माणूस वापरतोखाद्यवारसा जपायला हवा. या खाद्यवारशाचे दस्ताऐवजीकरण झाले पाहिजे

पुणे : पर्यावरण स्नेही आणि सेंद्रिय असलेल्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात उपटल्या गेल्या तर हे पौष्टिक वाण अस्तंगत होण्याचा धोका आहे. त्यामुळे शास्त्रीय मार्गाने संशोधन करून रानभाज्यांचे चांगले वाण जतन करण्याची लोकचळवळ व्हायला हवी. हे ज्ञान आणि हा खाद्यवारसा जपायला हवा. या खाद्यवारशाचे दस्ताऐवजीकरण झाले पाहिजे, अशी अपेक्षा प्रा . प्र . के . घाणेकर यांनी गुरुवारी सायंकाळी व्यक्त केली .  'जीविधा 'संस्थेच्या हिरवाई महोत्सवास प्रारंभ करताना पहिल्या दिवशी 'रानभाज्या : रानातून पानात ' या विषयावर ते बोलत होते. हा महोत्सव इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर येथे सुरु झाला. यंदाचे या महोत्सवाचे आठवे वर्ष आहे . प्रा . घाणेकर म्हणाले , तीन लाख वनस्पती जगात आहेत. त्यातील ३० हजार वनस्पती माणूस वापरतो. यापैकी ३०० वनस्पती खाद्य म्हणून वापरता येतात . आणि तीसच वनस्पतींची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. हल्ली रानभाज्यांकडे सर्वांचे लक्ष जाऊ लागले आहे. पूर्वी रानभाज्या गाव वस्तीच्या जवळ आढळत असत. आता त्या शोधायला, मिळविण्यासाठी लांब डोंगरात जावे लागते. रानभाज्या या अधिक पर्यावरणस्नेही आहेत , अधिक सेंद्रिय आहेत. त्यामुळे शहरवासियांचे त्याकडे लक्ष गेले आहे. या रानभाज्या शहरात मिळाव्यात यासाठी त्यांचे काही वाण परसबाग, शेतात लावता येतील का हे पहिले पाहिजे . एकीकडे आपण लागवड करीत असलेल्या गोष्टींचे पोषण मूल्य कमी होत चालले आहे. दुसरीकडे रानभाज्या खाण्याची उत्सुकता वाढली आहे. रानभाज्या कधी खाव्यात, कशा कराव्यात ,कशाबरोबर खाव्यात याचे पारंपरिक ज्ञान वनवासी -गिरीवासी लोकांना आहे. विवेक वेलणकर यांनी प्रास्ताविक केले. राजीव पंडित यांनी महोत्सवाची माहिती दिली. यावेळी डॉ . वृंदा कार्येकर यांनी रानभाज्या व्हाट्स अप ग्रुपची माहिती दिली .

टॅग्स :Puneपुणेagricultureशेतीenvironmentवातावरण