शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

रानभाज्या लोकचळवळ व्हावी : प्र.के घाणेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 17:34 IST

रानभाज्या कधी खाव्यात, कशा कराव्यात ,कशाबरोबर खाव्यात याचे पारंपरिक ज्ञान वनवासी -गिरीवासी लोकांना आहे.

ठळक मुद्देतीन लाख वनस्पती जगात आहेत. त्यातील ३० हजार वनस्पती माणूस वापरतोखाद्यवारसा जपायला हवा. या खाद्यवारशाचे दस्ताऐवजीकरण झाले पाहिजे

पुणे : पर्यावरण स्नेही आणि सेंद्रिय असलेल्या रानभाज्या मोठ्या प्रमाणात उपटल्या गेल्या तर हे पौष्टिक वाण अस्तंगत होण्याचा धोका आहे. त्यामुळे शास्त्रीय मार्गाने संशोधन करून रानभाज्यांचे चांगले वाण जतन करण्याची लोकचळवळ व्हायला हवी. हे ज्ञान आणि हा खाद्यवारसा जपायला हवा. या खाद्यवारशाचे दस्ताऐवजीकरण झाले पाहिजे, अशी अपेक्षा प्रा . प्र . के . घाणेकर यांनी गुरुवारी सायंकाळी व्यक्त केली .  'जीविधा 'संस्थेच्या हिरवाई महोत्सवास प्रारंभ करताना पहिल्या दिवशी 'रानभाज्या : रानातून पानात ' या विषयावर ते बोलत होते. हा महोत्सव इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर येथे सुरु झाला. यंदाचे या महोत्सवाचे आठवे वर्ष आहे . प्रा . घाणेकर म्हणाले , तीन लाख वनस्पती जगात आहेत. त्यातील ३० हजार वनस्पती माणूस वापरतो. यापैकी ३०० वनस्पती खाद्य म्हणून वापरता येतात . आणि तीसच वनस्पतींची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. हल्ली रानभाज्यांकडे सर्वांचे लक्ष जाऊ लागले आहे. पूर्वी रानभाज्या गाव वस्तीच्या जवळ आढळत असत. आता त्या शोधायला, मिळविण्यासाठी लांब डोंगरात जावे लागते. रानभाज्या या अधिक पर्यावरणस्नेही आहेत , अधिक सेंद्रिय आहेत. त्यामुळे शहरवासियांचे त्याकडे लक्ष गेले आहे. या रानभाज्या शहरात मिळाव्यात यासाठी त्यांचे काही वाण परसबाग, शेतात लावता येतील का हे पहिले पाहिजे . एकीकडे आपण लागवड करीत असलेल्या गोष्टींचे पोषण मूल्य कमी होत चालले आहे. दुसरीकडे रानभाज्या खाण्याची उत्सुकता वाढली आहे. रानभाज्या कधी खाव्यात, कशा कराव्यात ,कशाबरोबर खाव्यात याचे पारंपरिक ज्ञान वनवासी -गिरीवासी लोकांना आहे. विवेक वेलणकर यांनी प्रास्ताविक केले. राजीव पंडित यांनी महोत्सवाची माहिती दिली. यावेळी डॉ . वृंदा कार्येकर यांनी रानभाज्या व्हाट्स अप ग्रुपची माहिती दिली .

टॅग्स :Puneपुणेagricultureशेतीenvironmentवातावरण