शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

ऊस उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:09 IST

(रविकिरण सासवडे) बारामती : कोरोना महासाथीमुळे कृषी क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. अशातच सात महिने उलटले तरी केंद्र सरकारने ...

(रविकिरण सासवडे)

बारामती : कोरोना महासाथीमुळे कृषी क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. अशातच सात महिने उलटले तरी केंद्र सरकारने आगामी ऊस हंगामाची एफआरपी अद्याप जाहीर केली नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. वास्तविक पाहता १ ऑक्टोबर रोजी एफआरपी जाहीर होणे गरजेचे होते. वेळेत एफआरपी जाहीर न झाल्याने ऊस उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.

कोरोना महासाथीच्या काळात रासायनिक खते, कीटकनाशक, तणनाशक, इंधन, वीजबिल आदी निविष्ठाच्या दारात वाढ झाली आहे. त्यामुळे उसाचा उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी एफआरपीमध्ये वाढ करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. कोरोना महासाथीपूर्वी १ ऑक्टोबर २०१९ रोजी एफआरपी जाहीर झाली होती. त्यानुसार आगामी २०२१-२२ च्या गाळप हंगामाची एफआरपी २ ऑक्टोबर २०२० रोजी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र केंद्र सरकार अद्याप या मुद्द्यावर मौन धरून आहे. मागील काही वर्षात काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसप्रमाणेच भाजपच्या देखील ताब्यात सहकारी साखर कारखाने आले आहेत. त्यामुळे सत्ताधारीसोबतच विरोधी पक्षांचे देखील हितसंबंध साखर कारखानदारीत गुंतले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर कोणताही राजकीय पक्ष बोलत नाही. इतरवेळी एकमेकांचे वाभाडे काढणारे सत्ताधारी व विरोधक एफआरपीच्या मुद्द्यावर मात्र एकमेकांना सांभाळून घेत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला. निविष्ठामध्ये वाढ झाल्याने मागील एफआरपीपेक्षा यंदाच्या एफआरपीमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. तरच ऊस उत्पादक शेतकरी टिकणार आहे. अन्यथा त्याचा परिणाम ऊस उत्पादना बरोबरच साखर निर्मितीवर होणार आहे. ज्यावेळी केंद्र सरकारने एफआरपी कमी काढला त्या वेळी ऊस उत्पादन घटले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकाला उसाची रास्त किंमत मिळणे गरजेचे आहे.

----------------------------------------

तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल...

वेळेत एफआरपी जाहीर करणे गरजेचे आहे. ऑक्टोबरमध्ये एफआरपी जाहीर न करून केंद्र सरकारने परंपरा मोडली आहे. आपल्या जाणाऱ्या उसाची किमान आधारभूत किंमत आधी माहिती असणे हा ऊस उत्पादकाचा अधिकार आहे. जर केंद्र सरकार वेळेत एफआरपी जाहीर करत नसेल तर आम्हला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.

-पांडुरंग रायते (जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, पुणे)