शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
3
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
4
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
5
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
6
जातगणना : मॅजिक की मंडल?
7
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
8
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
9
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
10
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
11
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
12
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
13
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
14
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
15
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
16
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
17
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
18
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
19
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
20
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा

ऊस उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:09 IST

(रविकिरण सासवडे) बारामती : कोरोना महासाथीमुळे कृषी क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. अशातच सात महिने उलटले तरी केंद्र सरकारने ...

(रविकिरण सासवडे)

बारामती : कोरोना महासाथीमुळे कृषी क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. अशातच सात महिने उलटले तरी केंद्र सरकारने आगामी ऊस हंगामाची एफआरपी अद्याप जाहीर केली नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. वास्तविक पाहता १ ऑक्टोबर रोजी एफआरपी जाहीर होणे गरजेचे होते. वेळेत एफआरपी जाहीर न झाल्याने ऊस उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.

कोरोना महासाथीच्या काळात रासायनिक खते, कीटकनाशक, तणनाशक, इंधन, वीजबिल आदी निविष्ठाच्या दारात वाढ झाली आहे. त्यामुळे उसाचा उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी एफआरपीमध्ये वाढ करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. कोरोना महासाथीपूर्वी १ ऑक्टोबर २०१९ रोजी एफआरपी जाहीर झाली होती. त्यानुसार आगामी २०२१-२२ च्या गाळप हंगामाची एफआरपी २ ऑक्टोबर २०२० रोजी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र केंद्र सरकार अद्याप या मुद्द्यावर मौन धरून आहे. मागील काही वर्षात काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसप्रमाणेच भाजपच्या देखील ताब्यात सहकारी साखर कारखाने आले आहेत. त्यामुळे सत्ताधारीसोबतच विरोधी पक्षांचे देखील हितसंबंध साखर कारखानदारीत गुंतले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर कोणताही राजकीय पक्ष बोलत नाही. इतरवेळी एकमेकांचे वाभाडे काढणारे सत्ताधारी व विरोधक एफआरपीच्या मुद्द्यावर मात्र एकमेकांना सांभाळून घेत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला. निविष्ठामध्ये वाढ झाल्याने मागील एफआरपीपेक्षा यंदाच्या एफआरपीमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. तरच ऊस उत्पादक शेतकरी टिकणार आहे. अन्यथा त्याचा परिणाम ऊस उत्पादना बरोबरच साखर निर्मितीवर होणार आहे. ज्यावेळी केंद्र सरकारने एफआरपी कमी काढला त्या वेळी ऊस उत्पादन घटले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकाला उसाची रास्त किंमत मिळणे गरजेचे आहे.

----------------------------------------

तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल...

वेळेत एफआरपी जाहीर करणे गरजेचे आहे. ऑक्टोबरमध्ये एफआरपी जाहीर न करून केंद्र सरकारने परंपरा मोडली आहे. आपल्या जाणाऱ्या उसाची किमान आधारभूत किंमत आधी माहिती असणे हा ऊस उत्पादकाचा अधिकार आहे. जर केंद्र सरकार वेळेत एफआरपी जाहीर करत नसेल तर आम्हला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.

-पांडुरंग रायते (जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, पुणे)