शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

ऊस उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:09 IST

(रविकिरण सासवडे) बारामती : कोरोना महासाथीमुळे कृषी क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. अशातच सात महिने उलटले तरी केंद्र सरकारने ...

(रविकिरण सासवडे)

बारामती : कोरोना महासाथीमुळे कृषी क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. अशातच सात महिने उलटले तरी केंद्र सरकारने आगामी ऊस हंगामाची एफआरपी अद्याप जाहीर केली नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. वास्तविक पाहता १ ऑक्टोबर रोजी एफआरपी जाहीर होणे गरजेचे होते. वेळेत एफआरपी जाहीर न झाल्याने ऊस उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.

कोरोना महासाथीच्या काळात रासायनिक खते, कीटकनाशक, तणनाशक, इंधन, वीजबिल आदी निविष्ठाच्या दारात वाढ झाली आहे. त्यामुळे उसाचा उत्पादन खर्च वाढला आहे. परिणामी एफआरपीमध्ये वाढ करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. कोरोना महासाथीपूर्वी १ ऑक्टोबर २०१९ रोजी एफआरपी जाहीर झाली होती. त्यानुसार आगामी २०२१-२२ च्या गाळप हंगामाची एफआरपी २ ऑक्टोबर २०२० रोजी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र केंद्र सरकार अद्याप या मुद्द्यावर मौन धरून आहे. मागील काही वर्षात काॅंग्रेस व राष्ट्रवादी काॅंग्रेसप्रमाणेच भाजपच्या देखील ताब्यात सहकारी साखर कारखाने आले आहेत. त्यामुळे सत्ताधारीसोबतच विरोधी पक्षांचे देखील हितसंबंध साखर कारखानदारीत गुंतले आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर कोणताही राजकीय पक्ष बोलत नाही. इतरवेळी एकमेकांचे वाभाडे काढणारे सत्ताधारी व विरोधक एफआरपीच्या मुद्द्यावर मात्र एकमेकांना सांभाळून घेत आहेत, असा आरोप शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला. निविष्ठामध्ये वाढ झाल्याने मागील एफआरपीपेक्षा यंदाच्या एफआरपीमध्ये वाढ करणे गरजेचे आहे. तरच ऊस उत्पादक शेतकरी टिकणार आहे. अन्यथा त्याचा परिणाम ऊस उत्पादना बरोबरच साखर निर्मितीवर होणार आहे. ज्यावेळी केंद्र सरकारने एफआरपी कमी काढला त्या वेळी ऊस उत्पादन घटले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकाला उसाची रास्त किंमत मिळणे गरजेचे आहे.

----------------------------------------

तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल...

वेळेत एफआरपी जाहीर करणे गरजेचे आहे. ऑक्टोबरमध्ये एफआरपी जाहीर न करून केंद्र सरकारने परंपरा मोडली आहे. आपल्या जाणाऱ्या उसाची किमान आधारभूत किंमत आधी माहिती असणे हा ऊस उत्पादकाचा अधिकार आहे. जर केंद्र सरकार वेळेत एफआरपी जाहीर करत नसेल तर आम्हला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल.

-पांडुरंग रायते (जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना, पुणे)