शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

अभियांत्रिकी महाविद्यालयांचे अर्थचक्र बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना आणि लांबलेली अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया त्यामुळे जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालेय अद्याप सुरू झाले नाहीत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोना आणि लांबलेली अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया त्यामुळे जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालेय अद्याप सुरू झाले नाहीत. परिणामी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांकडे शुल्क जमा केले नाही. मात्र, त्यामुळे शैक्षणिक संस्थांचे अर्थचक्र पूर्णपणे बिघडले आहे. काही प्राध्यापकांना वेतनाविना काम करत आहेत तर काहींना पन्नास टक्के वेतनावर समाधान मानावे लागत आहे. त्यामुळे शासनाने अभियांत्रीकी महाविद्यालेय सुरू करावे, अशी मागणी केली जात आहे.

कोरोनाच्या पर्श्वभूमीवर राज्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. मात्र, इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. मात्र,अद्याप अभियांत्रिकी महाविद्यालये बंद आहेत. कोरोना व मराठा आरक्षणामुळे अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया लांबली. मात्र, त्यामुळे प्रथम वर्ष अभियांत्रिकी व थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्ण झाले नाही. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी न दिल्याने तिस-या व चौथ्या वर्षाचे विद्यार्थी सुध्दा महाविद्यालयात येत नाहीत. त्यामुळे एकाही विद्यार्थ्याने शुल्क जमा केले नाही.

चौकट

कर्मचाऱ्यांनी जगावे कसे ?

पुणे जिल्ह्यात दोन महाविद्यालये वगळता उर्ववित ७२ अभियांत्रिकी महाविद्यालये विना अनुदानित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून जमा होणाऱ्या शुल्कातूनच प्राध्यापकांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन केले जाते. शुल्क जमा होत नसल्याने शिक्षण संस्था आर्थिक अडचणीत आहेत. त्यातच समाज कल्याण विभागाने शिक्षण संस्थांना शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम दिलेली नाही. परिणामी संस्थांकडे असणारा इतर निधीही संपत आला आहे. त्यामुळे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चौकट

जिल्ह्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये : २

खासगी अभियांत्रिकी महाविद्यालये : ७२

विद्यार्थी क्षमता : ३५,५४९

प्राध्यापक संख्या : सुमारे एक हजार

शिक्षकेतर कर्मचारी संख्या : सुमारे ७००

---------------------------

ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे प्रत्यक्ष महाविद्यालये सुरू झाली पाहिजेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाल्यानंतरच महाविद्यालयाकडे शुल्क जमा होईल. तसेच समाज कल्याण विभागाकडे शिष्यवृत्तीची रक्कमही प्रलंबित आहेत. त्यामुळे सध्या प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

- व्ही. एन. चंद्रात्रे, प्राचार्य, व्ही. एन. नाईक कॉलेज