शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

पर्यावरणप्रेमी विद्यार्थ्यांनी केली दिवे घाटात स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:27 IST

सहाशे विद्यार्थी सहभागी : चार गाड्यांद्वारे आठ टन कचरा गोळा

सासवड : दिवे घाटाचे सौंदर्य जपावे, घाटातून दिसणारा आजूबाजूचा निसर्ग सर्वांना बघता यावा, घाटात असणाऱ्या वनस्पतींचे व पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय, सासवड येथील वाघिरे महाविद्यालय आणि महाराष्ट्र अ‍ॅकॅडमी अशा ६०० विद्यार्थ्यांनी दिवे घाटाची स्वच्छता केली.

पुण्याला इतर ठिकाणांशी जोडणाºया अनेक घाटांपैकी दिवेघाट महत्त्वाचा आहे. पर्यावरणीयदृष्ट्या, जैवविविधता असणारा, निसर्गसौंदर्य लाभलेला असा हा घाट आहे. मात्र अलीकडील काळात वाढती रहदारी, लोकसंख्या, कचरा आणि प्लॅस्टिकचे ढीग यामुळे घाटातील पर्यावरण आणि जैवविविधतेला धोका पोहोचत आहे. त्यामुळे ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून घाटाची स्वच्छता केली. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वडकीपासून सुरुवात केली, तर वाघिरे महाविद्यालय एनसीसीचे विद्यार्थी मध्यभागी, तर वरच्या बाजूने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेला सुरुवात केली.

घाटाच्या सुरुवातीला लावलेल्या फलकाचे अनावरण बंडू जगताप, डॉ. नितीन घोरपडे, डॉ. शर्मिला चौधरी, अमित झेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. घाटाच्यावर लावलेल्या फलकाचे अनावरण कल्पना साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छताजागृतीसाठी फलकावर पर्यावरणवारी असे लिहिले असून येथे कचरा टाकू नये, अशी सूचनाही केली आहे. घाटामध्ये घरगुती कचरा, पाण्याच्या बाटल्या, जुने कपडे, सडलेल्या भाज्या, हॉटेलचा कचरा, टाकाऊ पदार्थ, वैद्यकीय असा विविध प्रकारचा कचरा विद्यार्थ्यांनी गोळा केला. आदर पूनावाला यांच्या मदतीने हा कचरा उचलला. यावेळी आदर पूनावाला यांच्या ४ गाड्यांद्वारे ८ टन कचरा विद्यार्थ्यांनी गोळा केला. परिसरातील नागरिकांकडून कामाबाबत समाधान व्यक्त होत आहे. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. सुभाष वाव्हळ, प्रा. दीपक जांभळे, डॉ. सतीश बोंगाणे यांनी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.पाणी वाचविण्याचे आवाहन :पाणी पंचायतीच्या कल्पना साळुंके यांनी आपल्या संस्थेमार्फत असे अनेक उपक्रम घेतले जात असल्याचे सांगितले. पाण्यासाठी आम्ही काम करीत असून आपले पाण्याचे गणित कुठे तरी चुकत असून पाणी उपलब्धता आणि पाण्याचा वापर याचा नीट विचार करावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.महत्त्वपूर्ण घाटपुण्याला इतर ठिकाणांशी जोडणाºया अनेक घाटांपैकी दिवे घाट महत्त्वाचा आहे. पर्यावरणीयदृष्ट्या, जैवविविधता असणारा, निसर्गसौंदर्य लाभलेला असा हा घाट आहे. मात्र, अलीकडील काळात वाढती रहदारी, लोकसंख्या, कचरा आणि प्लॅस्टिकचे ढीग यामुळे घाटातील पर्यावरण आणि जैवविविधतेला धोका पोहोचत आहे.

टॅग्स :Puneपुणे