शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
3
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
4
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
5
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
6
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
7
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
8
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
9
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
10
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
11
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
12
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
13
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
14
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
15
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
16
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
17
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
18
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
19
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 

पर्यावरणप्रेमी विद्यार्थ्यांनी केली दिवे घाटात स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:27 IST

सहाशे विद्यार्थी सहभागी : चार गाड्यांद्वारे आठ टन कचरा गोळा

सासवड : दिवे घाटाचे सौंदर्य जपावे, घाटातून दिसणारा आजूबाजूचा निसर्ग सर्वांना बघता यावा, घाटात असणाऱ्या वनस्पतींचे व पर्यावरणाचे रक्षण व्हावे, यासाठी हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालय, सासवड येथील वाघिरे महाविद्यालय आणि महाराष्ट्र अ‍ॅकॅडमी अशा ६०० विद्यार्थ्यांनी दिवे घाटाची स्वच्छता केली.

पुण्याला इतर ठिकाणांशी जोडणाºया अनेक घाटांपैकी दिवेघाट महत्त्वाचा आहे. पर्यावरणीयदृष्ट्या, जैवविविधता असणारा, निसर्गसौंदर्य लाभलेला असा हा घाट आहे. मात्र अलीकडील काळात वाढती रहदारी, लोकसंख्या, कचरा आणि प्लॅस्टिकचे ढीग यामुळे घाटातील पर्यावरण आणि जैवविविधतेला धोका पोहोचत आहे. त्यामुळे ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनी मानवी साखळी करून घाटाची स्वच्छता केली. अण्णासाहेब मगर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वडकीपासून सुरुवात केली, तर वाघिरे महाविद्यालय एनसीसीचे विद्यार्थी मध्यभागी, तर वरच्या बाजूने राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छतेला सुरुवात केली.

घाटाच्या सुरुवातीला लावलेल्या फलकाचे अनावरण बंडू जगताप, डॉ. नितीन घोरपडे, डॉ. शर्मिला चौधरी, अमित झेंडे यांच्या हस्ते करण्यात आले. घाटाच्यावर लावलेल्या फलकाचे अनावरण कल्पना साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. स्वच्छताजागृतीसाठी फलकावर पर्यावरणवारी असे लिहिले असून येथे कचरा टाकू नये, अशी सूचनाही केली आहे. घाटामध्ये घरगुती कचरा, पाण्याच्या बाटल्या, जुने कपडे, सडलेल्या भाज्या, हॉटेलचा कचरा, टाकाऊ पदार्थ, वैद्यकीय असा विविध प्रकारचा कचरा विद्यार्थ्यांनी गोळा केला. आदर पूनावाला यांच्या मदतीने हा कचरा उचलला. यावेळी आदर पूनावाला यांच्या ४ गाड्यांद्वारे ८ टन कचरा विद्यार्थ्यांनी गोळा केला. परिसरातील नागरिकांकडून कामाबाबत समाधान व्यक्त होत आहे. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. सुभाष वाव्हळ, प्रा. दीपक जांभळे, डॉ. सतीश बोंगाणे यांनी प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली केले.पाणी वाचविण्याचे आवाहन :पाणी पंचायतीच्या कल्पना साळुंके यांनी आपल्या संस्थेमार्फत असे अनेक उपक्रम घेतले जात असल्याचे सांगितले. पाण्यासाठी आम्ही काम करीत असून आपले पाण्याचे गणित कुठे तरी चुकत असून पाणी उपलब्धता आणि पाण्याचा वापर याचा नीट विचार करावा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.महत्त्वपूर्ण घाटपुण्याला इतर ठिकाणांशी जोडणाºया अनेक घाटांपैकी दिवे घाट महत्त्वाचा आहे. पर्यावरणीयदृष्ट्या, जैवविविधता असणारा, निसर्गसौंदर्य लाभलेला असा हा घाट आहे. मात्र, अलीकडील काळात वाढती रहदारी, लोकसंख्या, कचरा आणि प्लॅस्टिकचे ढीग यामुळे घाटातील पर्यावरण आणि जैवविविधतेला धोका पोहोचत आहे.

टॅग्स :Puneपुणे