शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

दौंडचा पूर्व भाग ऐन दिवाळीत अंधारात

By admin | Updated: November 8, 2015 02:59 IST

दौंड तालुक्यातील पूर्व भागातील गावांना वीजपुरवठा करणाऱ्या भिगवण उपकेंद्रातील ३३/२२ केव्हीच्या, १0 एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र जळाल्याने, या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या खडकी

राजेगाव : दौंड तालुक्यातील पूर्व भागातील गावांना वीजपुरवठा करणाऱ्या भिगवण उपकेंद्रातील ३३/२२ केव्हीच्या, १0 एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र जळाल्याने, या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या खडकी, स्वामी चिंचोली, नंदादेवी, रावणगाव, राजेगाव व खानवटे या गावांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे बुधवारपासून ही गावे अंधारात आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत ग्रामस्थांची धांदल उडाली आहे. विजेअभावी पाणी योजना बंद पडल्याने, या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तसेच, येथील व्यवसायही ठप्प झाले आहेत. तात्पुरत्या स्वरूपात ५ एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र बसविण्याचे काम शुक्रवारी रात्री सुरू झाले होते. परंतु, १0 एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र बसविण्यास किमान १0 - १२ दिवस तरी लागणार असल्याने, पूर्ण दाबाने वीजपुरवठा होणार नसल्याने पूर्ण दिवाळी सणात विजेचा तुटवडा जाणवणार असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांकडून मिळाली. याबाबत दौंड महावितरणचे उपअभियंता अतुल चव्हाण म्हणाले की, रावणगाव सबस्टेशनची चाचणी शुक्रवारी (दि. ६) घेतली आहे. बुधवार-गुरुवारपर्यंत रावणगावचे सबस्टेशन चालू होईल. तसेच, भिगवण सबस्टेशन येथील ५ एमव्हीएचा (मेगा व्होल्ट अ‍ॅम्पिअर) शनिवारी रात्रीपर्यंत बसून टेस्टिंग केली जाईल. रविवारी दुपारी वीजपुरवठा सुरू होईल. १0 एमव्हीएचा ट्रान्सफार्मर बसायला ८ ते ९ दिवस लागतील. नंतर पूर्ण दाबाने वीजपुरवठा करता येईल. खडकीचे सरपंच किरण काळे म्हणाले की, रावणगाव येथील सबस्टेशन लवकरात लवकर सुरू करून, या भागातील नागरिकांना न्याय द्यावा. या भागातील गावांना दोन विभागांच्या घोळामुळे भिगवण येथील महावितरणच्या सबस्टेशनला फोन केल्यास, ‘तुमच्या विभागाला (केडगाव) विचारा’ अशी उडवा-उडवीची उत्तरे मिळतात. हद्दीच्या वादात ग्रामस्थांचे हाल दौंड तालुक्यातील खडकी, रावणगाव, नंदादेवी, स्वामी-चिंचोली, राजेगाव व खानवटे ही गावे भिगवण सबस्टेशनंतर्गत बारामती विभागाच्या अधिपत्याखाली येतात, तर प्रत्यक्षात या गावांची बिलिंग केडगाव विभागांतर्गत केले जाते. त्यामुळे भिगवण सबस्टेशन येथे दाद मागितले असता, ‘तुमच्या तालुक्यात चौकशी करा’ असे उत्तर मिळते, तर केडगाव विभागाला माहिती मागितली, तर ‘भिगवणला फोन करा’ असे सांगितले जाते. त्यामुळे या भागातील नागरिकांना कोणाकडे दाद मागावी, हा प्रश्न नेहमीच पडतो.