शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दौंडचा पूर्व भाग ऐन दिवाळीत अंधारात

By admin | Updated: November 8, 2015 02:59 IST

दौंड तालुक्यातील पूर्व भागातील गावांना वीजपुरवठा करणाऱ्या भिगवण उपकेंद्रातील ३३/२२ केव्हीच्या, १0 एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र जळाल्याने, या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या खडकी

राजेगाव : दौंड तालुक्यातील पूर्व भागातील गावांना वीजपुरवठा करणाऱ्या भिगवण उपकेंद्रातील ३३/२२ केव्हीच्या, १0 एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र जळाल्याने, या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या खडकी, स्वामी चिंचोली, नंदादेवी, रावणगाव, राजेगाव व खानवटे या गावांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. यामुळे बुधवारपासून ही गावे अंधारात आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीत ग्रामस्थांची धांदल उडाली आहे. विजेअभावी पाणी योजना बंद पडल्याने, या गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. तसेच, येथील व्यवसायही ठप्प झाले आहेत. तात्पुरत्या स्वरूपात ५ एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र बसविण्याचे काम शुक्रवारी रात्री सुरू झाले होते. परंतु, १0 एमव्हीए क्षमतेचे विद्युत रोहित्र बसविण्यास किमान १0 - १२ दिवस तरी लागणार असल्याने, पूर्ण दाबाने वीजपुरवठा होणार नसल्याने पूर्ण दिवाळी सणात विजेचा तुटवडा जाणवणार असल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांकडून मिळाली. याबाबत दौंड महावितरणचे उपअभियंता अतुल चव्हाण म्हणाले की, रावणगाव सबस्टेशनची चाचणी शुक्रवारी (दि. ६) घेतली आहे. बुधवार-गुरुवारपर्यंत रावणगावचे सबस्टेशन चालू होईल. तसेच, भिगवण सबस्टेशन येथील ५ एमव्हीएचा (मेगा व्होल्ट अ‍ॅम्पिअर) शनिवारी रात्रीपर्यंत बसून टेस्टिंग केली जाईल. रविवारी दुपारी वीजपुरवठा सुरू होईल. १0 एमव्हीएचा ट्रान्सफार्मर बसायला ८ ते ९ दिवस लागतील. नंतर पूर्ण दाबाने वीजपुरवठा करता येईल. खडकीचे सरपंच किरण काळे म्हणाले की, रावणगाव येथील सबस्टेशन लवकरात लवकर सुरू करून, या भागातील नागरिकांना न्याय द्यावा. या भागातील गावांना दोन विभागांच्या घोळामुळे भिगवण येथील महावितरणच्या सबस्टेशनला फोन केल्यास, ‘तुमच्या विभागाला (केडगाव) विचारा’ अशी उडवा-उडवीची उत्तरे मिळतात. हद्दीच्या वादात ग्रामस्थांचे हाल दौंड तालुक्यातील खडकी, रावणगाव, नंदादेवी, स्वामी-चिंचोली, राजेगाव व खानवटे ही गावे भिगवण सबस्टेशनंतर्गत बारामती विभागाच्या अधिपत्याखाली येतात, तर प्रत्यक्षात या गावांची बिलिंग केडगाव विभागांतर्गत केले जाते. त्यामुळे भिगवण सबस्टेशन येथे दाद मागितले असता, ‘तुमच्या तालुक्यात चौकशी करा’ असे उत्तर मिळते, तर केडगाव विभागाला माहिती मागितली, तर ‘भिगवणला फोन करा’ असे सांगितले जाते. त्यामुळे या भागातील नागरिकांना कोणाकडे दाद मागावी, हा प्रश्न नेहमीच पडतो.