शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
7
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
8
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
9
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
10
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
11
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
12
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
13
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
14
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
15
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
16
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
17
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
18
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
19
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
20
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप

कामातून नाव कमवा आणि मग निवडणूक लढवा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2019 21:23 IST

“तरुणांना राजकारणाकडे वळावेसे वाटणे ही खरोखर आनंदाची बाब आहे. परंतु राजकारणात येणे म्हणजे निवडणूक लढविणे एवढेच लक्ष्य ठेवू नये. उलट आपले आवडीचे क्षेत्र निवडून त्यात अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून काम करायला हवे''.

पुणे : “तरुणांना राजकारणाकडे वळावेसे वाटणे ही खरोखर आनंदाची बाब आहे. परंतु राजकारणात येणे म्हणजे निवडणूक लढविणे एवढेच लक्ष्य ठेवू नये. उलट आपले आवडीचे क्षेत्र निवडून त्यात अगदी तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून काम करायला हवे. आपले मतदार फार सुज्ञ आहेत. ते आपल्या पाठीशी असलेल्या नावापेक्षा कामाला अधिक महत्व देतात. त्यामुळे आपल्या कामातून नाव कमवा आणि मग निवडणूक लढवा.” असे मार्गदर्शन शिवसेनेच्या युवसेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी तरुणांना केले.‘आंत्रप्रिनीयर्स ऑर्गनायझेशन’ (ईओ) च्या ‘ईओ पुणे’ शाखेने पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावरील हाॅटेल जे डब्लू मॅरिएट या ठिकाणी मागील आठवड्यात आदित्य ठाकरे यांच्या विशेष मुलाखतीचे आयोजन केले होते त्यावेळेला ठाकरे बोलत होते. या मुलाखतीत पुणे शाखेचे बोर्ड सदस्य अक्षय आढळराव पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी ‘ईओ पुणे’ शाखेचे अध्यक्ष मानव घुवालेवाला, संवाद विभागाचे प्रमुख विशाल वोहरा, बोर्ड सदस्य अक्षय आढळराव पाटील, तेजपाल रांका व आदित्य पिट्टी याबरोबरच उद्योग, आयटी अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ठाकरे यांनी राजकारणातील प्रत्यक्ष सहभाग ते आंतरराष्ट्रीय राजकारण, भविष्यातील योजना अशा विविध विषयांवर या वेळी दिलखुलास चर्चा केली.या वेळी युवकांना प्रोत्साहन देत ठाकरे म्हणाले, “कोणत्याही क्षेत्रात तुम्ही वारशाच्या भरवशावर फार काळ टिकू शकत नाहीत. तुमचे कामच ग्राह्य धरले जाते. त्यामुळे आवडीचे क्षेत्र निवडा म्हणजे त्यात तुम्ही जास्त काळ काम करू शकाल. राजकारणात घराणेशाही चालते असे जरी म्हणत असले तरी तुमच्या कामाशिवाय जनताही तुम्हाला निवडून देत नाही. मतदार फार सुजाण असतात. त्यांचा प्रतिसाद लगेच मिळतो. काम नसेल तर लोक लगेच नाकारतात. जेंव्हा आपण लोकांपर्यंत पोहोचतो तेंव्हा कामाचे खरे स्वरूप व आवाका आपल्याला समजतो. नाहीतर बऱ्याच योजना फक्त कागदावर असतात प्रत्यक्षात नाही.”पक्षाचे काम व आव्हानांविषयी बोलताना ते म्हणाले, “स्वसंरक्षण, पर्यावरण सुरक्षा, २४/७ चालणारे रेस्टॉरंटस् हे सगळे नवे मुद्दे आमच्या पक्षाने हाती घेतले आहेत, ते एक आव्हान आहे. कारण वरकर्णी हे मुद्दे फक्त शहरी दिसत असले तरी यासोबत अनेक गरीब, ग्रामीण लोकांची पोटे आणि कुटुंब यांना जोडली गेलेली आहेत. जर शहराला जागतिक दर्जा मिळवून द्यायचा असेल तर आपल्या विचारांच्या आणि नियम-कायद्यांच्या कक्षा रुंदावणे गरजेचे आहे. ज्यावेळी १९९७ मध्ये मुंबई महापालिका शिवसेनेकडे आली तेंव्हा महापालिका आधीच ५०० कोटींच्या तोट्यात होती. आज मात्र महापालिका ‘सरप्लस’ आहे. मुंबई कोस्टल भागात ९ हजार कोटीचा निधी खर्चून महापालिका स्वबळावर रस्ता बनवत आहे. जिथे राज्याकडे पैसा नाही त्याच राज्यातील महापालिका स्वबळावर एवढा मोठा प्रकल्प राबवत आहे याचा आम्हाला अभिमान आहे.” जर पुण्याने आम्हाला येथेही संधी दिली तर या भागातही आम्ही असेच चांगले काम करू इच्छितो, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक