शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

कर्तव्यनिष्ठ शिक्षणप्रसारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:10 IST

विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक म्हणून त्यांनी लौकिक कमावला. दरम्यान, काही वर्षांनंतर भारताची फाळणी होऊन पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले. त्याच ...

विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक म्हणून त्यांनी लौकिक कमावला. दरम्यान, काही वर्षांनंतर भारताची फाळणी होऊन पाकिस्तान स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले. त्याच काळात कराचीत दंगल उसळली. हिंदू कुटुंबे भारतात परतू लागले. भारतात परतणाऱ्या अनेकांनी देशपांडे गुरुजींनाही बरोबर येण्याची विनंती केली, पण त्यांनी ती मान्य केली नाही.

गुरुजींचे घर शाळेशेजारीच होते. काही स्थानिक दंगलखोरांना ते घरात असल्याची चाहूल लागली. पंधरा वीस जणांची टोळी त्यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होती. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या युसूफ शेखच्या कुटुंबाला गुरुजींबद्दल मोठा आदर होता. हल्ल्याची कुणकुण लागताच युसूफ त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला, "गुरुजी, परिस्थिती बिकट आहे. तुम्ही खोलीबाहेर येऊ नका. मी तुम्हाला मुंबईला जाणाऱ्या बोटीचं तिकीट आणून देतो. बोटीपर्यंत सुखरूप पोहोचविण्याची जबाबदारीही माझी."

जाज्वल्य कर्तव्यबुद्धी असलेले देशपांडे गुरुजी त्याला म्हणाले, “मी शाळेचा मुख्याध्यापक आहे. माझ्या जागेवर स्थानिक मुख्याध्यापक येत नाहीत, तोपर्यंत मला कराची शहर सोडता येणार नाही. माझं काय होईल याची मला पर्वा नाही. तूही माझी काळजी करू नकोस."

आपल्या कर्तव्याप्रती प्रसंगी स्वतःच्या जिवाचीही पर्वा न करणाऱ्या जनार्दन देशपांडे यांच्यासारखा ध्येयवादी कर्तव्यनिष्ठ शिक्षक विरळाच, नाही का!

- प्रसाद भडसावळे