शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
2
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
3
Operation Sindoor Live Updates: स्फोटाचा आवाजांमुळे अमृतसरमध्ये रात्रभर ब्लॅक आऊट; पोलिस म्हणतात काहीच सापडले नाही
4
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
6
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
7
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
8
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
9
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
10
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
11
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
12
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
13
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
14
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
15
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
16
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
17
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
18
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
19
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
20
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 

कर्तव्यनिष्ठ बँक अधिकाऱ्यांनी दिला स्मृतींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:20 IST

पुणे : मराठीचा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांना मिळाला. या ऐतिहासिक क्षणाची नोंद बँकेकडे राहावी म्हणून पुरस्काराच्या ...

पुणे : मराठीचा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार वि. स. खांडेकर यांना मिळाला. या ऐतिहासिक क्षणाची नोंद बँकेकडे राहावी म्हणून पुरस्काराच्या रकमेचा चेक आपल्या बँकेच्या माध्यमातून वटवण्यासाठी केलेली धडपड आणि ती पाहून त्या रकमेतील निम्मी रक्कम त्यांनी बँकेत ठेव म्हणून ठेवली, अशा अनेक आठवणी बँक अधिकाऱ्यांनी उलडगडल्या.

पानशेत धरण फुटलं तेव्हा बँकेची इमारत पाण्याखाली गेली तेव्हा केवळ नाव नोंदवून घेत खातेदारांना पैसे दिले. विशेष म्हणजे एकाही खातेदारानं शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम घेतली नाही, हे नंतर हिशेब तपासला असता लक्षात आलं. जप्ती करायला गेलो असताना खातेदाराची आर्थिक स्थिती खरंच हलाखीची असल्याचं लक्षात आल्यावर त्याच्या दोन्ही मुलांना बँकेच्या उद्योजक खातेदाराला सांगून नोकरी लावली. त्यांच्या पगारातून कर्जाची वसुली केली. त्यातून वसुलीही झाली आणि घरही उभं राहिलं... अशी आठवण देखील अधिकाऱ्यांनी ताजी केली.

निमित्त होते, गुरुकुल प्रतिष्ठान आयोजित ‘महाराष्ट्राची उद्योजकता आणि प्रेरणादायी बँक’ या चर्चासत्राचे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. वसंतराव पटवर्धन, बँक ऑफ महाराष्ट्र माजी अधिकारी आणि साहित्यिक प्रा. श्याम भुर्के, उद्योजक रामदास माने, उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा. जोशी, बँकिंग क्षेत्रातील निवृत्त अधिकारी भास्कर मांडकेश्वर, श्रीकांत जोशी, रणजित सिसोदिया, गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत उपस्थित होते.

खाजगीकरणाऱ्या प्रक्रियेत असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा या वेळी डॉ. वसंतराव पटवर्धन यांनी घेतला.

भावी पिढीला प्रेरणा मिळण्यासाठी बँकेत काम करत असताना केलेल्या कामाचे अनुभव जाणकार अधिकाऱ्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवावेत, असं आवाहन डॉ. कामत यांनी यावेळी केलं. या सगळ्या अनुभवांचं पुस्तक करण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रा. रवींद्र कोठावदे यांनी निवेदन केले.

......