शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
2
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
3
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
4
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
5
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
6
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
7
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
8
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
9
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
10
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
11
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
12
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
13
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
14
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
15
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
16
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
17
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
18
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
19
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
20
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय

भोरमध्ये दमदार पाऊस; भातलावण सुरू

By admin | Updated: July 4, 2017 03:25 IST

चार दिवसांपासून तालुक्यात पडत असलेल्या दमदार पावसाने ओढ्या-नाल्यांना पाणी आले आहे. भात खाचरे तुडुंब भरली असून, पश्चिम भागातील

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : चार दिवसांपासून तालुक्यात पडत असलेल्या दमदार पावसाने ओढ्या-नाल्यांना पाणी आले आहे. भात खाचरे तुडुंब भरली असून, पश्चिम भागातील भुतोंडे व गुंजवणी खोऱ्यात भाताच्या लावण्या सुरू झाल्या आहेत, तर पूर्व भागातील खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून, यापूर्वी पेरलेल्या बियाण्यांची पावसाने चांगली उगवण होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे.तालुक्यात भाताचे एकूण क्षेत्र ७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून ७०० हेक्टरवर रोपवाटिकांची पेरणी झाली आहे. खरीप ज्वारी १०० हेक्टर असून, पेरणी ७० हेक्टरवर आहे. (७० %), नाचणी १५०० हेक्टर क्षेत्र असून, रोपवाटिका १३०० हेक्टरवर झाली आहे (८०%). कडधान्य तूर, मूग, उडीद १००० हेक्टर असून, पेरण्या ६०० हेक्टरवर (६०%) झाल्या आहेत. भुईमूग ४००० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी २५०० हेक्टरवर (६०%) पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीन ३००० हेक्टर क्षेत्र असून, २२०० हेक्टरवर (७०%) पेरण्या झाल्या आहेत.भाजीपाला ८०० हेक्टरपैकी १८० हेक्टर (२०%), चारा पीक मका, घास १०० हेक्टर असून पेरणी ५० हेक्टरवर (५०%) झाली आहे.भाटघर, नीरा देवघर धरण भागातील धूळवाफेवर पेरलेल्या भाताची व गुंजवणी खोऱ्यात लिफ्टच्या पाण्यावर लवकर लावणीला आलेल्या भाताची लागवड सुरू असल्याचे मंडल कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांनी सांगितले.दरम्यान, पावसाअभावी भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरादेवघर व भाटघर धरण परिसरातील गावात इतर ठिकाणी धूळवाफेवर सुमारे ७०० हेक्टरवर भाताची (रोपवाटिका) पेरणी झाली होती. मात्र, वळवाचा पाऊस न पडल्याने रोपांची उगवण उशिराने झाली, तर सध्या पाऊस नसल्याने भाताच्या व नाचणीच्या लावण्या रखडल्या होत्या. मात्र, चार दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे ओढे-नाले भरून वाहत असून भाताची खाचरेही पाण्याने तुडुंब भरली आहे. गतवर्षीच्या तुलनेत भाटघरचा साठा कमी भाटघर धरण भागात आज १५ मिमी, तर एकूण १५९ मिमी पाऊस झाला आहे. धरण १२.३३ टक्के भरले आहे. मागील वर्षी धरण भागात १९३ मिमी पाऊस होऊन धरण २३ टक्के भरले होते, तर नीरादेवघर धरण भागात आज ४३ मिमी तर एकूण ४४० मिमी पाऊस होऊन धरण १५.२५ टक्के आहे. गतवर्षी ३९० मिमी पाऊस होऊन धरण १२.३३ टक्के भरले होते. वीर धरण भागात आज ०, तर एकूण ५५ मिमी पाऊस झाला असून धरण ६.६३ टक्के भरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत भाटघर धरण भागात पाऊस कमी असून धरणातही पाणीसाठा निम्म्याने कमी आहे, तर नीरादेवघर धरण भागात पाऊस अधिक असून साठाही जास्त आहे. भातासह इतर पिकांसाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता होती. पाऊस झाल्याने फायदा होणार आहे.