शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

भोरमध्ये दमदार पाऊस; भातलावण सुरू

By admin | Updated: July 4, 2017 03:25 IST

चार दिवसांपासून तालुक्यात पडत असलेल्या दमदार पावसाने ओढ्या-नाल्यांना पाणी आले आहे. भात खाचरे तुडुंब भरली असून, पश्चिम भागातील

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : चार दिवसांपासून तालुक्यात पडत असलेल्या दमदार पावसाने ओढ्या-नाल्यांना पाणी आले आहे. भात खाचरे तुडुंब भरली असून, पश्चिम भागातील भुतोंडे व गुंजवणी खोऱ्यात भाताच्या लावण्या सुरू झाल्या आहेत, तर पूर्व भागातील खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग आला असून, यापूर्वी पेरलेल्या बियाण्यांची पावसाने चांगली उगवण होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे.तालुक्यात भाताचे एकूण क्षेत्र ७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र असून ७०० हेक्टरवर रोपवाटिकांची पेरणी झाली आहे. खरीप ज्वारी १०० हेक्टर असून, पेरणी ७० हेक्टरवर आहे. (७० %), नाचणी १५०० हेक्टर क्षेत्र असून, रोपवाटिका १३०० हेक्टरवर झाली आहे (८०%). कडधान्य तूर, मूग, उडीद १००० हेक्टर असून, पेरण्या ६०० हेक्टरवर (६०%) झाल्या आहेत. भुईमूग ४००० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी २५०० हेक्टरवर (६०%) पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीन ३००० हेक्टर क्षेत्र असून, २२०० हेक्टरवर (७०%) पेरण्या झाल्या आहेत.भाजीपाला ८०० हेक्टरपैकी १८० हेक्टर (२०%), चारा पीक मका, घास १०० हेक्टर असून पेरणी ५० हेक्टरवर (५०%) झाली आहे.भाटघर, नीरा देवघर धरण भागातील धूळवाफेवर पेरलेल्या भाताची व गुंजवणी खोऱ्यात लिफ्टच्या पाण्यावर लवकर लावणीला आलेल्या भाताची लागवड सुरू असल्याचे मंडल कृषी अधिकारी हनुमंत खाडे यांनी सांगितले.दरम्यान, पावसाअभावी भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील नीरादेवघर व भाटघर धरण परिसरातील गावात इतर ठिकाणी धूळवाफेवर सुमारे ७०० हेक्टरवर भाताची (रोपवाटिका) पेरणी झाली होती. मात्र, वळवाचा पाऊस न पडल्याने रोपांची उगवण उशिराने झाली, तर सध्या पाऊस नसल्याने भाताच्या व नाचणीच्या लावण्या रखडल्या होत्या. मात्र, चार दिवसांपासून पडत असलेल्या दमदार पावसामुळे ओढे-नाले भरून वाहत असून भाताची खाचरेही पाण्याने तुडुंब भरली आहे. गतवर्षीच्या तुलनेत भाटघरचा साठा कमी भाटघर धरण भागात आज १५ मिमी, तर एकूण १५९ मिमी पाऊस झाला आहे. धरण १२.३३ टक्के भरले आहे. मागील वर्षी धरण भागात १९३ मिमी पाऊस होऊन धरण २३ टक्के भरले होते, तर नीरादेवघर धरण भागात आज ४३ मिमी तर एकूण ४४० मिमी पाऊस होऊन धरण १५.२५ टक्के आहे. गतवर्षी ३९० मिमी पाऊस होऊन धरण १२.३३ टक्के भरले होते. वीर धरण भागात आज ०, तर एकूण ५५ मिमी पाऊस झाला असून धरण ६.६३ टक्के भरले आहे. गतवर्षीच्या तुलनेत भाटघर धरण भागात पाऊस कमी असून धरणातही पाणीसाठा निम्म्याने कमी आहे, तर नीरादेवघर धरण भागात पाऊस अधिक असून साठाही जास्त आहे. भातासह इतर पिकांसाठी मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता होती. पाऊस झाल्याने फायदा होणार आहे.