शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
5
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
6
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
7
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
8
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
9
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
10
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
11
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
12
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
13
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
14
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
15
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
16
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
17
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
18
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
19
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
20
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र

गावकारभाऱ्यांच्या निवडीसाठी उडणार धुरळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST

निवडणूकीचे चित्र स्पष्ट : अनेक ग्रामपंचायती बिनविरोध तर काही गावात होणार चुरशीच्या लढती, प्रचाराचा नारळ फुटणार लोकमत न्यूज नेटवर्क ...

निवडणूकीचे चित्र स्पष्ट : अनेक ग्रामपंचायती बिनविरोध तर काही गावात होणार चुरशीच्या लढती, प्रचाराचा नारळ फुटणार

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कोरोनामुळे रखडलेल्या जिल्ह्यातील ७४८ ग्रामपंचायतींचे चित्र सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी स्पष्ट झाले. निवडणुक लागलेल्या या ग्रामपंचायतींपैकी काहींनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार बिनविरोध केल्या. मात्र, अनेक ठिकाणी उमेदवारांनी अर्ज माघारी न घेतल्याने निवडणुकी लागल्या आहेत. गावकारभाऱ्यांच्या निवडीचा फड यामुळे रंगणार आहे. अनेक इच्छूकांनी आपले पॅनल रणधुमाळीत उभे केल्याने काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी तर काही ठिकाणी चौरंगी लढती पाहायला मिळणार आहे. सरंपंचपदाचे आरक्षण अजुन जाहिर झाले नसले तरी काहींनी नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ केला आहे. १५ जानेवारीला निवडणुका होणार असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण यामुळे ढवळून निघणारआहे.

जिल्ह्यातील १४०० ग्रामपंच्यातींपैकी काही ग्रामपंचयातींची मुदत ही डिंसेंबर महिन्यात संपली. या निवडणुका गेल्या वर्षी होने अपेक्षित होते. मात्र, कोरोनामुळे निवडणुक कार्यक्रम जाहिर होण्यास उशीर लागला. यामुळे मुदत संपलेल्या ७४८ ग्रामपंचायतींवर प्रशासन नेमण्यात आले. यामुळे निवडणुक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणुक आयोगाने ग्रामपंचायतींचा निवडणुक कार्यक्रम जाहिर करत जानेवारीच्या १५तारखेला निवडणुक घोषित केल्या. यासाठी आरक्षण घेण्यात आल्याने अनेक इच्छुकांच्या आशा वाढल्या होत्या. मात्र, सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर होणार असल्याने अनेकांच्या इच्छा मावळल्या होत्या. असे असले तरी आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी अनेकांनी जय्यत तयारी केली. २३ ते ३० डिसेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ३१ जानेवारी रोजी छाननीत अनेकांचे अर्ज बाद झाले. निवडणुक कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करण्याचे आवाहन करण्यात आले. याला प्रतिसाद देत अर्ज माघारीच्या दिवशी सोमवारी अनेकांनी अर्ज मागे घेत निवडणुका बिनविरोध केल्या. मात्र, अनेक बड्या ग्रामपंचयातीत सत्ताधारी आणि विरोधकांनी आपले अर्ज कायम ठेवल्याने निवडणुका लागल्या आहेत.

निवडणुक रिंगणात अनेक मातब्बर असल्याने या निवडणुका चुरशीच्या होणार आहेत. प्रचाराचा नारळ फाेडत पॅनल प्रमुखांनी सोमवारीच प्रचाराचा शुभारंभ केला. यामुळे येत्या १० दिवसांत गावातील राजकारण ढवळुन निघणार आहे. मंगळवार पासुन गावात कोपरा सभा, रोड शो, निवडणुक रॅल्या काढत मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न उमेदवार करणार आहेत.

चौकट

प्रचारासाठी राबणार हायटेक यंत्रणा

अनेक ग्रामपंचयातीत निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले आहे. यामुळे उमेचारांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे. एरवी खासदार, आमदारकीच्या निवडणुकांत हायटेक यंत्रणेचा वापर उमेदवारांमार्फत केला जात होता. मात्र, ग्रामपंचयात निवडणुकांतही उमेदवार मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी हायटेक यंत्रणांचा वापर करणार आहेत. यात सोशल मिडियाला प्राधान्य उमेदवारांनी दिला आहे. गेल्या वर्षात गावाच्या विकासाची उदाहरणे देत रखघडलेल्या कामांचा पंचनामा करत गावविकासासाठी अनेक योजनाही या माध्यमातून उमेदवारांपर्यंत पोहचवील्या जात आहेत.

चौकट

रात्री उशीरा पर्यंत सुरू होती प्रक्रीया

जिल्ह्यात ७४८ ग्रामपंचायतींच्या अर्ज माघारीची प्रक्रिया सोमवारी पार पडली. सकाळ पासुन सुरू झालेली ही प्रक्रिया रात्री उशीरा पर्यंत तालुक्याच्या ठीकाणी सुरू होती. यामुळे किती ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या याचे चित्र स्पष्ट होऊ शकले नाही.