शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गसंवर्धन समिती कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 03:06 IST

हिंदवी स्वराज्याचे वैभव असलेले राज्यातील गडकोट आणि किल्ले यांचे जतन व संवर्धन व्हावे, या उदात्त हेतूने राज्य शासनाने २०१५ साली दुर्गसंवर्धन समितीची स्थापना केली. सुरुवातीचे दोन वर्षे या समितीचे कामकाज सुरळीत सुरू होते.

अभिजित कोळपे पुणे : हिंदवी स्वराज्याचे वैभव असलेले राज्यातील गडकोट आणि किल्ले यांचे जतन व संवर्धन व्हावे, या उदात्त हेतूने राज्य शासनाने २०१५ साली दुर्गसंवर्धन समितीची स्थापना केली. सुरुवातीचे दोन वर्षे या समितीचे कामकाज सुरळीत सुरू होते. मात्र मागील सहा महिन्यांपासून राज्याच्या पुरातत्त्व विभागाला पूर्णवेळ अधिकारी नसल्याने राज्याची दुर्गसंवर्धन समिती फक्त कागदावरच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे किल्ले संवर्धनाचे कामही ठप्प असल्याचे समितीच्या सदस्यांनी सांगितले.३० मार्च २०१५ साली राज्य दुर्गसंवर्धन समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष हे राज्याचे सांस्कृतिकमंत्री विनोद तावडे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर आणि पांडुरंग बलकवडे यांची नियुक्ती केली आहे. (निनाद बेडेकर यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे.) तसेच दुर्गसंवर्धनाचे वेगवेगळ्या पातळ्यांवर कार्य करणाºया हृषीकेश यादव, राजेंद्र टिपरे, राजेंद्र शेळके, प्रमोद पाटील, भगवान चिले, वि. रा. पाटील,प्र. के. घाणेकर, सचिन जोशी, प्रफुल्ल माटेगावकर व संकेत कुलकर्णी असे इतर दहा सदस्यांचा यामध्ये समावेश आहे. या समितीचा कालावधी एक-एक वर्षाचा ठरविण्यात आला आहे.२०१५ आणि २०१६ या दोन्ही वर्षी चांगले काम केल्याने समितीला मुदतवाढ दिली होती. दोन वर्षे हे काम सुरळीतपणे सुरू होते. मात्र चालू वर्षी २०१७ ला मात्र प्रमुख अधिकारी नसल्याचे कारण देत मागील सहा महिन्यांपासून या समितीने दिलेला मसुदा धूळखात पडून आहे. तसेच गड, किल्ल्यांच्या संंवर्धनाचे कामही ठप्प आहे. दोन वर्षांत या समितीच्या फक्त तीन बैठका झाल्या आहेत. प्रथम बैठक १९ आॅक्टोबर २०१६, तर दुसरी बैठक २ नोव्हेंबर २०१६ रोजी झाली. चालू वर्षी १४ मार्च २०१७ ला शेवटची बैठक झाली. त्यानंतर या समितीचा कालावधी पूर्ण झाला.मागील समितीमध्ये मी प्रमुख मार्गदर्शक होतो. त्यावेळी आम्ही समितीचा वर्षभरात करावयाचा मसुदा दिला आहे. त्यावर किती काम झाले. तसेच नवीन समितीबाबत कोणताही अध्यादेश किंवा होणाºया बैठकीसंबंधात मला अजून कोणत्याही (पत्र किंवा फोन) प्रकारचा निरोप आलेला नाही. त्यामुळे या समितीबाबत सद्यस्थिती काय आहे. याबाबत काहीच सांगता येणार नाही. राज्याच्या पुरातत्त्व विभागातर्फे कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत.- पांडुरंग बलकवडे,प्रमुख मार्गदर्शक, दुर्गसंवर्धन समितीमागील वर्षी आम्ही मुंबईला बैठकीला नियमित जात होतो. मात्र या वर्षी दुर्गसंवर्धन समिती अस्तित्त्वात आहे की नाही, याबाबत काहीच कल्पना नाही. आम्ही दिलेल्या मसुद्यावर काय काम झाले, त्याबाबतही राज्य पुरातत्त्व विभागाकडून आम्हाला काहीच कळविले जात नाही.- प्र. के. घाणेकर,सदस्य, दुर्गसंवर्धन समितीमागील काही महिन्यांपासून राज्य पुरातत्त्व विभागाला कोणी प्रमुख अधिकारी उपलब्ध नव्हता. त्यामुळे या समितीचे कामकाज ठप्प होते. मात्र नुकतेच राज्य पुरातत्त्व विभागाच्या प्रमुखपदी तेजस गर्गे यांची निवड झाली आहे. त्यामुळे या महिन्याच्या मध्यावर बैठक होणार असल्याचा निरोप मला मिळाला आहे. तसेच इतर सदस्यांनाही याबाबत कळवण्यात येणार आहे.- भगवान चिले,सदस्य, दुर्गसंवर्धन समिती