शहरं
Join us  
Trending Stories
1
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
2
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
3
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
4
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
5
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
6
LIC चा ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
7
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
8
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
9
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
10
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
11
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
12
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
13
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
14
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
15
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
16
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
17
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
18
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या सुटकेसाठी उच्च न्यायालयाला का लागले तब्बल १० वर्षे?
19
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
20
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!

कालव्यात मैलापाण्याची डबकी

By admin | Updated: January 24, 2017 02:27 IST

मागील महिन्याभरापासून बेबी कालव्यातून पाणी बंद झाले, तर नव्या कालव्यातून गेल्या आठवड्यापासून पाण्याचा विसर्ग बंद

हडपसर : मागील महिन्याभरापासून बेबी कालव्यातून पाणी बंद झाले, तर नव्या कालव्यातून गेल्या आठवड्यापासून पाण्याचा विसर्ग बंद झाला आहे. त्यामुळे कालव्यात ठिकठिकाणी पाण्याची डबकी साठली असून, नागरिकांनी कचरा टाकल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. कालव्यातील पाण्याचा विसर्ग बंद असल्याने तातडीने पाटबंधारे आणि महापालिकेने कालव्याची स्वच्छता करून औषध फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.पुणे शहराचा विस्तार वाढत असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा वापरही वाढला आहे. त्यामुळे मुळा-मुठा नदीतील पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीसाठी वापरण्याचा प्रस्ताव पुढे आला. त्याप्रमाणे मुंढवा येथे जॅकवेल प्रकल्प उभारला आणि गेल्या वर्षभरापासून खुटबावपर्यंत शेतीसाठी पाणी सुरू केले. गेल्या महिन्याभरापासून मुंढवा जॅकवेलमधून बेबी कालव्यात पाणी सोडले नाही. जॅकवेलमधून एका पंपाद्वारे पाणी कालव्यात सोडले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, प्रत्यक्षात कालव्यात पाणी येत नसल्याचे चित्र दिसत आहे.कालव्यात ठिकठिकाणी पाण्याची डबकी साठल्यामुळे मोकाट कुत्री, जनावरे आणि डुकरांचा वावर वाढला आहे. कालव्यालगतचे नागरिकही कचरा टाकतात. त्यामुळे कचरा कुजल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कालव्यालगतच्या महापालिका आणि ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.मुंढवा जॅकवेलमधून पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतरच पाणी कालव्यात सोडावे, असे नियोजन आहे. मात्र, प्रत्यक्षात नदीतील पाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता थेट पाणी कालव्याद्वारे शेतीसाठी सोडले जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेवर कायदेशीर कारवाई केली होती. त्याचबरोबर हरित लवादानेही पाण्यावर प्रक्रिया केली जात नसल्यामुळे आक्षेप घेतला होता. त्यानंतर शेवाळवाडी, साडेसतरानळी व कालव्यालगतच्या अनेक ग्रामपंचायतींच्या वतीनेही हरकती नोंदविल्या होत्या. प्रदूषण नियंत्रण मंडळाने जॅकवेलमधून सोडल्या जाणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्याविषयी पालिकेवर याचिका दाखल केली होती. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)