शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

डेडलाइन डावलून रस्ते खोदाई सुरूच

By admin | Updated: May 9, 2016 01:01 IST

शहरामध्ये ३० एप्रिलनंतर कोणत्याही प्रकारची खोदाई होणार नाही असे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले असतानाही विविध भागांमध्ये खोदाई सुरूच आहे

पुणे : शहरामध्ये ३० एप्रिलनंतर कोणत्याही प्रकारची खोदाई होणार नाही असे महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले असतानाही विविध भागांमध्ये खोदाई सुरूच आहे. त्याचबरोबर खोदाईनंतरच्या दुरुस्तीची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून, ती पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. या रखडलेल्या खोदाईमुळे नागरिकांचा मनस्ताप मात्र अद्यापही कायम आहे. शहरामध्ये ३० एप्रिलनंतर मोबाईल कंपन्या, महावितरण, गॅस कंपनी यांच्याकडून कोठेही खोदाई होताना दिसल्यास संबंधित कंपनीने पालिकेकडे खोदाईसाठी जमा केलेली अनामत रक्कम जप्त केली जावी तसेच त्या कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावा, असे आदेश महापौर प्रशांत जगताप यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार आयुक्तांनीही ३० एप्रिलनंतर कोणत्याही प्रकारची खोदाई होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. सेनापती बापट रस्त्यावरील मेरिएट हॉटेलजवळच्या मॉलसमोर रविवारी भर दिवसा ड्रेनेजच्या कामासाठी खोदाई सुरू होती. चतु:शृंगी मंदिराकडून सावित्रीबाई पुणे विद्यापीठाकडे जाण्यासाठी एक छोटा रस्ता आहे. तिथे गेल्या ४ महिन्यांपासून पाण्याच्या पाइपलाइनसाठी खोदाई सुरू आहे. त्या कामाची मुदत संपली तरी ते अद्याप पूर्ण झाले नसून ३० एप्रिलनंतरही तिथे खोदाई सुरूच आहे. ही खोदाई थांबणार कधी आणि त्याच्या दुरुस्तीची कामे कधी केली जाणार, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी खोदाई झालेल्या कामाची दुरुस्ती प्रशासनाकडून पूर्ण केली जाणे अपेक्षित असते. मात्र दुरुस्तीची ही कामे प्रशासनाकडून खूपच संथगतीने सुरू आहेत.खोदाईची कामे अपूर्ण राहिल्यास त्याचा मोठा त्रास पावसाळ्यामध्ये नागरिकांना सहन करावा लागेल. दत्तवाडी येथील रहिवासी पुष्कर तुळजापूरकर यांनी सांगितले, ‘‘दत्तवाडी पोलीस स्टेशनसमोरच ३० एप्रिलनंतरही खोदाईची कामे सुरू आहेत. मोबाईल कंपन्यांच्या केबल टाकण्यासाठी ही खोदाई केली जात आहे. प्रशासनाकडून त्यांच्यावर का कारवाई केली जात नाही?’’शहरामध्ये ४ जी सेवा सुरू करण्यासाठी मोबाईल कंपन्या, गॅस कंपनी, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी शेकडो किलोमीटर खोदाईसाठी परवानगी घेतलेली आहे. पावसाळा पूर्ण झाल्यानंतर पुन्हा ही खोदाई सुरू होणार आहे. नुकतेच बनविलेले रस्ते, फुटपाथ उखडून खोदाई होत असल्याने त्यावर महापौरांसह नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर खोदाईमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी समिती स्थापन केली आहे. (प्रतिनिधी)