शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

विहिरीच्या पाणीपातळीत घट

By admin | Updated: February 13, 2017 01:23 IST

उन्हाच्या तीव्रतेमुळे दिवसेंदिवस निरवांगी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या पाणीपातळीमध्ये घट होत आहे. पाणी कमी पडू

निरवांगी : उन्हाच्या तीव्रतेमुळे दिवसेंदिवस निरवांगी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या पाणीपातळीमध्ये घट होत आहे. पाणी कमी पडू लागल्याने निरवांगी परिसरातील वाघाळ तलावात पाटब्ांधारे विभागाने पाणी सोडावे, अशी मागणी निरवांगीचे सरपंच दशरथ पोळ यांनी केली आहे.याबाबत पोळ म्हणाले, की निरवांगीनजीक वाघाळ तलाव आहे. या तलावानजीकच निरवांगी गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपच्ाांयतीची विहीर आहे. या विहिरीचा पाणीपुरवठा निरवांगी व परिसरातील वाड्या-वस्त्यांवर दररोज केला जातो.परंतु सध्या उन्हाची तीव्रता वाढलेली आहे. यामुळे विहिरीला पाणी कमी येऊ लागले आहे. परिणामी, गावाला पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सध्या निमगाव पाटबंधारे खात्याचे शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे. नीरा-डावा कालव्याच्या वितरीका क्र. ५७ मधून १४ क्रमांकाच्या उपकालव्यातून पाणी वाघाळ तलावात सोडण्यात यावे.वाघाळ तलावात पाणी सोडल्यास लगतच्या विहिरींना चांगल्या प्रकारे पाणी येत असते. यामुळे जूनपर्यंत पाण्याची टंचाई होणार नाही. टँकरची गरज भासणार नाही. शासनाच्या लाखो रुपयांचीही बचत होणार आहे. नागरिकांनाही वेळेत पाणी मिळेल. पाटब्ांधारे विभागाने उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता वाघाळ तलावात पाणी सोडावे,अशी मागणी करण्यात आली आहे. तलावाशेजारी मोठ्या प्रमाणात झाडी, शेती आहे. यामुळे या परिसरात पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे. पाणी सोडल्यास पक्ष्यांचीही तहान भागणार आहे.(वार्ताहर)