शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
2
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
3
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
4
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
5
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
6
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
8
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
9
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
10
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
11
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
12
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
13
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
14
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
15
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
16
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
17
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
18
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
19
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
20
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग

दहा हजार क्युसेक्सला देणार धोक्याची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 01:03 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेने विठठलवाडी ते वारजेला जोडणारा नदीपात्रातील रस्ता उखडून टाकला आहे.

पुणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेने विठठलवाडी ते वारजेला जोडणारा नदीपात्रातील रस्ता उखडून टाकला आहे. या रस्त्यासाठी टाकण्यात आलेला मातीचा बंधारा काढण्यात आल्याने या परिसरातील जवळपास दहाहून अधिक सोसायटया थेट नदीपात्रातच आल्या आहेत. त्यामुळे अवघ्या १५ हजार क्यूसेक्स पाणी सोडण्यात आल्यानंतरही या सोसायटयांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता लक्षात घेऊन १0 हजार क्यूसेक्स पाणी सोडताच या परिसरात धोक्याची सूचना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शिवाय या परिसरासाठी आपत्ती निवारणासाठी विशेष यंत्रणा उभारण्याबाबत कामही सुरू करण्यात आले आहे. रस्ता उखडण्यापूर्वी धरणातून पाणी सोडल्यानंतर सुमारे ५0 हजार क्यूसेक्सच्या पुढे या परिसरात पाणी घुसत होते. मात्र, आता १५ हजार क्यूसेक्सलाच पाणी घुसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.या वर्षी चांगला पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत जादा पाणी झाल्यानंतर हे पाणी मुठा नदीतून सोडण्यात येते. हे पाणी मोठ्या प्रमाणात नदीकाठी बांधण्यात आलेल्या सोसायट्यांमध्ये घुसते. सर्वात प्रथम हे पाणी पुणे- बंगळुरू महामार्गावरील वारजे येथील उड्डाणपुलापासून विठ्ठल मंदिरापर्यंत असलेल्या सोसायट्यांमध्ये घुसते.२00९ आणि २0११ मध्ये आलेल्या पुरात जवळपास २५ ते ३0 सोसायट्यांमध्ये हे पाणी घुसले होते. या वेळी या धरणांमधून ५0 हजार क्युसेक्सहून अधिक पाणी सोडण्यात आलेले होते. मात्र, त्या वेळी नदीपात्राच्या बाजूला संरक्षक भिंत असतानाही हे पाणी घुसले होते. या वर्षी न्यायालयाच्या आदेशानुसार, महापालिकेने रस्त्यासाठी बांधलेली ही संरक्षक भिंत पूर्णपणे काढली असून, या ठिकाणी असलेली मातीही काढण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेक सोसायट्या नदीपात्रातच आलेल्या आहेत. परिणामी १५ हजार क्युसेक्सपेक्षा अधिक पाणी सोडताच काही सोसायट्यांमध्ये लगेच पाणी घुसणार आहे. ही बाब लक्षात घेऊन खडकवासला धरणातून १0 हजार क्युसेक्स पाणी सोडताच या सोसायट्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिका आणि पाटबंधारे विभागाकडून संयुक्त यंत्रणा उभारली जाणार असून, नागरिकांना ध्वनिक्षेपक, एसएमएस तसेच प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना सोसायट्यांमध्ये पाठवून सावधानतेचा इशारा दिला जाणार आहे. रस्ता उखडून काढल्याने या परिसरात सर्वाधिक पुराचा धोका आहे. ही बाब लक्षात घेऊन पुढील काही दिवसांत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून या परिसराची पाहणी केली जाणार असून, नागरिकांना मदतीसाठी २४ तास कार्यरत असलेला मदतकक्ष स्थापन केला जाण्याची शक्यता आहे. यात प्रामुखाने रबर बोटी, पाणी खेचणाऱ्या पंपासह मदतीसाठी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी असतील. या भागासाठी महापालिकेकडून टिळक रस्ता क्षेत्रीय कार्यालयात आपत्ती निवारण कक्ष स्थापन केला जाणार आहे.