शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

बेशिस्तीमुळे वाघोलीत वाहतूककोंडी, राजकीय पुढाऱ्यांची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 02:10 IST

पुणे-नगर महामार्ग हा कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला महामार्ग आहे. कारण, काही वर्षांपर्यंत या महामार्गाला मृत्यूचा सापळा म्हणूनही संबोधले जायचे

वाघोली : पुणे-नगर महामार्ग हा कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला महामार्ग आहे. कारण, काही वर्षांपर्यंत या महामार्गाला मृत्यूचा सापळा म्हणूनही संबोधले जायचे. मात्र, याच मार्गावर आता नवीन समस्या उभी राहिलेली आहे, ती म्हणजे वाहतूककोंडीची. त्यामुळे वाहतूककोंडीचा महामार्ग असे नवीन नाव त्याला देण्यात आले आहे.

अरुंद चौक आणि रस्ते, रस्त्याच्या दुतर्फा दुचाकी व चारचाकी वाहनांनी केलेले अतिक्रमण, व्यापाऱ्याची रस्त्यावर दुकानदारी व अपुरे पोलीस प्रशासन, राजकीय उदासीनता अशा परिस्थितीत वाघोलीमधील मुख्य रस्त्यावर बेशिस्त वाहतुकीमुळे मोठी वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व महिलांसह वाहनचालकांना वाहतूककोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागतो. तसेच, रस्त्यावर चालताना पादचाºयांना तारेवरची कसरत करावी लागते. या दैनंदिन बेशिस्त वाहतूककोंडीमुळे नागरिक वाहनचालक हैराण झाले आहेत. पुणे-नगर महामार्ग मराठवाडा, विदर्भाला जोडणारा असल्याने सतत वर्दळीचा आहे. वाहनांची संख्यादेखील मोठी असते. वाघोलीत मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळा मोठ्या प्रमाणात आहेत. ग्रामीण भागातून हजारो विद्यार्थी ये-जा करीत असतात. या विद्यार्थ्यांनाही या बेशिस्त वाहतूककोंडीचा त्रास सोसावालागतो.

साईडपट्ट्या खराबपुणे-नगर रोडवरील खांदवेनगर ते आळंदी फाटा पर्यंतच्या रोडवरील दोन्ही बाजूंच्या साईडपट्ट्या खराब होऊन मोठमोठे खड्डे तयार झालेले आहेत, तेही तत्काळ भरून घेणे गरजेचे आहे. तसेच पोलिसांनी विरुद्ध दिशेने येणाºया वाहनांवर रोज सकाळी व सायंकाळी कारवाई करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.पोलीस बळ हे अपुरे नसून पुरेसे आहे. नुसत्या पोलिसांकडून हा प्रश्न सुटणार नाही. त्यासाठी बांधकाम विभागाने आणि स्थानिक स्वराज्य संस्थेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रोडच्या साईडपट्ट्यांची कामे झाली पाहिजेत. बाजूची अतिक्रमणे काढणे गरजेचे आहे. तत्काळ सिग्नल चालू करण्यात येतील. रस्तावर पार्किंग केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल .- सुहास गरुड (उपविभागीय पोलीस अधीकारी हवेली )पोलिसांनी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. बाजाराच्या दिवशी व्यापाºयाने रोडवर बसू नये; अन्यथा ग्रामपंचायीकडून त्याच्यावर आणि टेडंर घेणाºयावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. अवैधरीत्या रोडवर, रोडच्या कडेला वाहन पार्किंग केल्यावर पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे.- वसुंधराताई उबाळे(सरपंच वाघोली)

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडी