शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पावसामुळे शेतक-यांना मोठा फटका, जुन्या कांद्याला मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:07 IST

पुणे : दिवाळीपूर्वी झालेल्या धुवाधार पावसाचा कांदा उत्पादक शेतकºयांना मोठा फटका बसला असून, नवीन कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे.

पुणे : दिवाळीपूर्वी झालेल्या धुवाधार पावसाचा कांदा उत्पादक शेतकºयांना मोठा फटका बसला असून, नवीन कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. बाजारात येणारा नवीन कांदा खूपच खराब दर्जाचा असल्याने जुन्या कांद्याला मागणी वाढली आहे. यामुळेच कांद्याला चालू हंगामातील उच्चांकी म्हणजे १० किलोंमागे ३०० ते ३४० रुपये दर मिळाला असल्याची माहिती गुलटेकडी मार्केट यार्डातील कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.दिवाळीपूर्वी आठ-दहा दिवस सलग धुवाधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नवीन कांदा लवकर खराब होतो. यामुळे शेतकºयांनी नवीन कांदा विक्रीसाठी काढल्याने जुन्या कांद्याची आवक मंदावली आहे. याबाबत पोमण यांनी सांगितले, की भिजलेला कांदा बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे या कांद्याला १० किलोंना २०० ते २८० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तर, आवक कमी व मागणी जास्त असल्यामुळे जुन्या काद्याला १० किलोंना ३०० ते ३४० रुपये दर मिळाला.मंगळवारी मार्केट यार्डामध्ये तब्बल शंभर गाडी कांद्याची आवक झाल्याने १० ते २० रुपयांनी दर किलोमागे कमी झाले आहेत. रविवारी हेच दर १० किलोंमागे ३०० ते ३७० इतके होते. किरकोळ बाजारातदेखील जुन्या कांद्याला मागणी अधिकआहे.किरकोळमध्ये एकाकिलोसाठी ४० ते ५० रुपये दर मिळत आहे. साधारण नोव्हेंबरमध्ये जुन्या कांद्याचा हंगाम संपतो. यामुळे चांगल्या प्रतीच्या कांद्याची भाववाढ होण्याची शक्यता आहे.>नव्या कांद्याची प्रतीक्षायंदा काही भागामध्ये कांद्याची उशिरा लावगड झालेली आहे. यामुळे सध्या नवीन कांदा अपेक्षेएवढा बाजारात दाखल होत नाही. कांद्याचे भाव सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात येण्यासाठी नवीन कांदा बाजारात दाखल होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. येत्या काही दिवसांत जुन्या कांद्याचे दर वाढणार असल्याचे पोमण यांनी सांगितले. सध्या जुन्या कांद्याला आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू या राज्यांतून मागणी वाढत आहे. यंदा कर्नाटकामधून होणारी कांद्याची आवक घटल्यानेदेखील काही प्रमाणात दरवाढ झाली आहे.