शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

पावसामुळे शेतक-यांना मोठा फटका, जुन्या कांद्याला मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 01:07 IST

पुणे : दिवाळीपूर्वी झालेल्या धुवाधार पावसाचा कांदा उत्पादक शेतकºयांना मोठा फटका बसला असून, नवीन कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे.

पुणे : दिवाळीपूर्वी झालेल्या धुवाधार पावसाचा कांदा उत्पादक शेतकºयांना मोठा फटका बसला असून, नवीन कांदा मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. बाजारात येणारा नवीन कांदा खूपच खराब दर्जाचा असल्याने जुन्या कांद्याला मागणी वाढली आहे. यामुळेच कांद्याला चालू हंगामातील उच्चांकी म्हणजे १० किलोंमागे ३०० ते ३४० रुपये दर मिळाला असल्याची माहिती गुलटेकडी मार्केट यार्डातील कांद्याचे व्यापारी रितेश पोमण यांनी दिली.दिवाळीपूर्वी आठ-दहा दिवस सलग धुवाधार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नवीन कांदा लवकर खराब होतो. यामुळे शेतकºयांनी नवीन कांदा विक्रीसाठी काढल्याने जुन्या कांद्याची आवक मंदावली आहे. याबाबत पोमण यांनी सांगितले, की भिजलेला कांदा बाजारात दाखल होत आहे. त्यामुळे या कांद्याला १० किलोंना २०० ते २८० रुपयांपर्यंत भाव मिळत आहे. तर, आवक कमी व मागणी जास्त असल्यामुळे जुन्या काद्याला १० किलोंना ३०० ते ३४० रुपये दर मिळाला.मंगळवारी मार्केट यार्डामध्ये तब्बल शंभर गाडी कांद्याची आवक झाल्याने १० ते २० रुपयांनी दर किलोमागे कमी झाले आहेत. रविवारी हेच दर १० किलोंमागे ३०० ते ३७० इतके होते. किरकोळ बाजारातदेखील जुन्या कांद्याला मागणी अधिकआहे.किरकोळमध्ये एकाकिलोसाठी ४० ते ५० रुपये दर मिळत आहे. साधारण नोव्हेंबरमध्ये जुन्या कांद्याचा हंगाम संपतो. यामुळे चांगल्या प्रतीच्या कांद्याची भाववाढ होण्याची शक्यता आहे.>नव्या कांद्याची प्रतीक्षायंदा काही भागामध्ये कांद्याची उशिरा लावगड झालेली आहे. यामुळे सध्या नवीन कांदा अपेक्षेएवढा बाजारात दाखल होत नाही. कांद्याचे भाव सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात येण्यासाठी नवीन कांदा बाजारात दाखल होण्याची प्रतीक्षा करावी लागेल. येत्या काही दिवसांत जुन्या कांद्याचे दर वाढणार असल्याचे पोमण यांनी सांगितले. सध्या जुन्या कांद्याला आंध्र प्रदेश, केरळ, तमिळनाडू या राज्यांतून मागणी वाढत आहे. यंदा कर्नाटकामधून होणारी कांद्याची आवक घटल्यानेदेखील काही प्रमाणात दरवाढ झाली आहे.