शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

पावसामुळे जनजीवन विस्कळीत, पिके गेली वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 02:35 IST

जिल्हयात सुरु असलेल्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याशिवाय हाताशी आलेली पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय रस्त्यावर धोकादायक असे मोठमोठे खड्डे पडले असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. या पावसाचा नगदी पिकांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. सलग सुरु असणा-या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचाकण : अचानक कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे चाकण पंचक्रोशीतील महत्त्वाच्या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यात धोकादायक असे मोठमोठे खड्डे पडले असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्ता खड्ड्यात गेल्याने या मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी त्रस्त नागरिक करत आहेत.औद्योगिक पंढरीत महाळुंगे, निघोजे, कुरूळी, नाणेकरवाडी, खराबवाडी, खालुंब्रे, वासुली, शिंदे, वराळे, सावरदरी व आंबेठाण तसेच बिरदवडी परिसरात छोट्या मोठ्या कारखान्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर ये-जा करणाºया कामगारांसह जड वाहने आणि अवजड कंटेनरची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरु असते. शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवतींचीही मोठी वर्दळ सुरु असते.या भागात दिवसरात्र पावसाची संततधार सुरू असल्याने रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी सर्कस करावी लागत आहे.रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नसल्याने याठिकाणी महाविद्यालयीन युवती, प्रवासी आपल्या दुचाकी गाडीवरून खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाले आहेत. प्रतिवर्षी पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दुरवस्था होत असते. त्यामुळे आपोआपच मोठी वाहतूककोंडी होऊन अपघाताला निमंत्रण मिळत आहे.जनावरांनाही चालताना लाज वाटेल, असा हा रस्ता झाला असून, दिवसातून एक तरी लहानमोठा अपघात येथे होत आहे. चाकण तळेगाव महामार्गावरील हा रस्ता अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला असून, रस्ता दुरुस्त करण्याच्या चालढकलपणामुळे येथील नागरिकांसह शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, प्रवासी, महाविद्यालयीन युवक, युवती, वाहनचालक अक्षरश: रडकुंडीला आले आहेत.चाकण आंबेठाण रस्त्याचीही खूप वाईट अवस्था झाली आहे. याही मार्गावर फूटभर खोल खड्डे पडल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. या मार्गावर लहान मोठ्या कंपन्या, कारखाने, गोदामे तसेच वाढते नागरिकीकरण असल्याने रस्त्याने जाणाºया नागरिकांना या खड्ड्यांशी रोजच सामना करावा लागतो.या खड्ड्यात साचलेल्या पाण्याने परिसरात दुर्गंधी सुटली असून, याचा मनस्ताप वाहनचालकांसह येथील नागरिक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. 

टॅग्स :Puneपुणे