शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे जनजीवन विस्कळीत, पिके गेली वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 02:35 IST

जिल्हयात सुरु असलेल्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याशिवाय हाताशी आलेली पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय रस्त्यावर धोकादायक असे मोठमोठे खड्डे पडले असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. या पावसाचा नगदी पिकांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. सलग सुरु असणा-या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचाकण : अचानक कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे चाकण पंचक्रोशीतील महत्त्वाच्या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यात धोकादायक असे मोठमोठे खड्डे पडले असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रस्ता खड्ड्यात गेल्याने या मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी त्रस्त नागरिक करत आहेत.औद्योगिक पंढरीत महाळुंगे, निघोजे, कुरूळी, नाणेकरवाडी, खराबवाडी, खालुंब्रे, वासुली, शिंदे, वराळे, सावरदरी व आंबेठाण तसेच बिरदवडी परिसरात छोट्या मोठ्या कारखान्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या भागातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर ये-जा करणाºया कामगारांसह जड वाहने आणि अवजड कंटेनरची मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरु असते. शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक-युवतींचीही मोठी वर्दळ सुरु असते.या भागात दिवसरात्र पावसाची संततधार सुरू असल्याने रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असून, त्यात पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचल्याने वाहनचालकांना वाहने चालवताना मोठी सर्कस करावी लागत आहे.रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नसल्याने याठिकाणी महाविद्यालयीन युवती, प्रवासी आपल्या दुचाकी गाडीवरून खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाले आहेत. प्रतिवर्षी पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दुरवस्था होत असते. त्यामुळे आपोआपच मोठी वाहतूककोंडी होऊन अपघाताला निमंत्रण मिळत आहे.जनावरांनाही चालताना लाज वाटेल, असा हा रस्ता झाला असून, दिवसातून एक तरी लहानमोठा अपघात येथे होत आहे. चाकण तळेगाव महामार्गावरील हा रस्ता अक्षरश: मृत्यूचा सापळा बनला असून, रस्ता दुरुस्त करण्याच्या चालढकलपणामुळे येथील नागरिकांसह शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, प्रवासी, महाविद्यालयीन युवक, युवती, वाहनचालक अक्षरश: रडकुंडीला आले आहेत.चाकण आंबेठाण रस्त्याचीही खूप वाईट अवस्था झाली आहे. याही मार्गावर फूटभर खोल खड्डे पडल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. या मार्गावर लहान मोठ्या कंपन्या, कारखाने, गोदामे तसेच वाढते नागरिकीकरण असल्याने रस्त्याने जाणाºया नागरिकांना या खड्ड्यांशी रोजच सामना करावा लागतो.या खड्ड्यात साचलेल्या पाण्याने परिसरात दुर्गंधी सुटली असून, याचा मनस्ताप वाहनचालकांसह येथील नागरिक व प्रवाशांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे. 

टॅग्स :Puneपुणे