शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

पावसाअभावी भाताच्या लावण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:07 IST

भोर : जूनच्या मध्यावधीनंतर पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी धूळवाफेवर पेरलेल्या भाताच्या रोपांची उगवण चांगली झाली होती. त्यामुळे ...

भोर : जूनच्या मध्यावधीनंतर पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी धूळवाफेवर पेरलेल्या भाताच्या रोपांची उगवण चांगली झाली होती. त्यामुळे लागवडीला सुरुवात केली. मात्र, मागील आठवडाभरापासून पावसाने ओढ दिल्याने भाताच्या लावण्या रखडल्या आहेत.

भोर तालुक्यात पश्चिम व पूर्व असे दोन भाग पडत असून पश्चिम भागात नीरा देवघर धरण भागातील हिर्डोशी खोरे तर भाटघर धरण भागातील भुतोंडे व वेळवंड खोऱ्यात महुडे खोरे आंबवडे खोरे भागात दरवर्षी वळवाचे पाऊस झाल्यावर धूळवाफेवर भात पिकाची पेरणी करतात. १२ जूननंतर झालेल्या पावसामुळे भाताच्या बियाणांची उगवण चांगली झाली होती त्यामुळे पश्चिम पट्ट्यातील नीरा देवघर धरण भागातील हिर्डोशी खोऱ्यातील शेतकरी भाताच्या लागवडीला सुरवात केली होती. मात्र आठवड्यापासून पाऊस गायब झाला असून चक्क ऊन पडले आहे. त्यामुळे भाताच्या लागवडी रखडल्या आहे. लावलेले भात वाळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

पूर्व भागातील पुणे सातारा महामार्गावरील आजूबाजूची गावे, भोंगवली भागातील गावे, वीसगाव खोरे भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर जमिनीला चांगला वाफसा आल्यावर भाताच्या बियाणांची पेरणी केली असून भाताच्या

रोपांची उगवण झाली. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर भाताची लागवड करतात. मात्र सध्या पाणी नसल्याने माळरानावरील तरवे करपू लागले आहेत. भातलावणी पावसाआभावी रखडली असून लावलेले भात आणि भाताचे तरवे पाणी नसल्यामुळे सुकू लागले आहेत. पावसाची अशीच अवस्था राहिल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढू शकते, अशीच स्थिती आहे

इंद्रायणी तांदळाला सर्वाधिक मागणी

तालुक्यात खरीप पिकाखालील क्षेत्र २० हजार हेक्टर आहे. भात हे प्रमुख पीक असून सुमारे सात हजार ४०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. ५० हेक्टरवर भाताच्या रोपांची पेरणी केली होती. हळव्या आणि गरव्या जातीच्या भाताची लागवड केली जात असून, गरव्या जातीत इंद्रायणी, बासमती आंबेमोहर, पुसा बासमती, तामसाळ, हळवेबारीक या जाती, तर हळव्या जातीत रत्नागिरी २४, कर्जत १८४, सोनम, इंडम, फुले, राधा या जातीच्या भाताची लागवड केली जाते. हळव्या जातीचे भातपीक ९० ते १०० दिवसांत तयार होते आणि त्याला पाणी कमी लागते. तर गरव्या जातीचे भात १०० ते १२० दिवसांत तयार होते. त्याला पाणी अधिक प्रमाणात लागते. तालुक्यात इंद्रायणी जातीच्या तांदळाला सर्वाधिक मागणी असून तालुक्यात ८० ते ९० टक्के इंद्रायणी भाताचीच सर्वाधिक लागवड केली जाते.

०२ भोर

भोर तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यात भाताच्या लागवडी रखडल्या.