शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

पावसाअभावी भाताच्या लावण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:07 IST

भोर : जूनच्या मध्यावधीनंतर पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी धूळवाफेवर पेरलेल्या भाताच्या रोपांची उगवण चांगली झाली होती. त्यामुळे ...

भोर : जूनच्या मध्यावधीनंतर पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी धूळवाफेवर पेरलेल्या भाताच्या रोपांची उगवण चांगली झाली होती. त्यामुळे लागवडीला सुरुवात केली. मात्र, मागील आठवडाभरापासून पावसाने ओढ दिल्याने भाताच्या लावण्या रखडल्या आहेत.

भोर तालुक्यात पश्चिम व पूर्व असे दोन भाग पडत असून पश्चिम भागात नीरा देवघर धरण भागातील हिर्डोशी खोरे तर भाटघर धरण भागातील भुतोंडे व वेळवंड खोऱ्यात महुडे खोरे आंबवडे खोरे भागात दरवर्षी वळवाचे पाऊस झाल्यावर धूळवाफेवर भात पिकाची पेरणी करतात. १२ जूननंतर झालेल्या पावसामुळे भाताच्या बियाणांची उगवण चांगली झाली होती त्यामुळे पश्चिम पट्ट्यातील नीरा देवघर धरण भागातील हिर्डोशी खोऱ्यातील शेतकरी भाताच्या लागवडीला सुरवात केली होती. मात्र आठवड्यापासून पाऊस गायब झाला असून चक्क ऊन पडले आहे. त्यामुळे भाताच्या लागवडी रखडल्या आहे. लावलेले भात वाळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

पूर्व भागातील पुणे सातारा महामार्गावरील आजूबाजूची गावे, भोंगवली भागातील गावे, वीसगाव खोरे भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर जमिनीला चांगला वाफसा आल्यावर भाताच्या बियाणांची पेरणी केली असून भाताच्या

रोपांची उगवण झाली. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर भाताची लागवड करतात. मात्र सध्या पाणी नसल्याने माळरानावरील तरवे करपू लागले आहेत. भातलावणी पावसाआभावी रखडली असून लावलेले भात आणि भाताचे तरवे पाणी नसल्यामुळे सुकू लागले आहेत. पावसाची अशीच अवस्था राहिल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढू शकते, अशीच स्थिती आहे

इंद्रायणी तांदळाला सर्वाधिक मागणी

तालुक्यात खरीप पिकाखालील क्षेत्र २० हजार हेक्टर आहे. भात हे प्रमुख पीक असून सुमारे सात हजार ४०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. ५० हेक्टरवर भाताच्या रोपांची पेरणी केली होती. हळव्या आणि गरव्या जातीच्या भाताची लागवड केली जात असून, गरव्या जातीत इंद्रायणी, बासमती आंबेमोहर, पुसा बासमती, तामसाळ, हळवेबारीक या जाती, तर हळव्या जातीत रत्नागिरी २४, कर्जत १८४, सोनम, इंडम, फुले, राधा या जातीच्या भाताची लागवड केली जाते. हळव्या जातीचे भातपीक ९० ते १०० दिवसांत तयार होते आणि त्याला पाणी कमी लागते. तर गरव्या जातीचे भात १०० ते १२० दिवसांत तयार होते. त्याला पाणी अधिक प्रमाणात लागते. तालुक्यात इंद्रायणी जातीच्या तांदळाला सर्वाधिक मागणी असून तालुक्यात ८० ते ९० टक्के इंद्रायणी भाताचीच सर्वाधिक लागवड केली जाते.

०२ भोर

भोर तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यात भाताच्या लागवडी रखडल्या.