शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

पावसाअभावी भाताच्या लावण्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:07 IST

भोर : जूनच्या मध्यावधीनंतर पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी धूळवाफेवर पेरलेल्या भाताच्या रोपांची उगवण चांगली झाली होती. त्यामुळे ...

भोर : जूनच्या मध्यावधीनंतर पडलेल्या पावसामुळे तालुक्यातील पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी धूळवाफेवर पेरलेल्या भाताच्या रोपांची उगवण चांगली झाली होती. त्यामुळे लागवडीला सुरुवात केली. मात्र, मागील आठवडाभरापासून पावसाने ओढ दिल्याने भाताच्या लावण्या रखडल्या आहेत.

भोर तालुक्यात पश्चिम व पूर्व असे दोन भाग पडत असून पश्चिम भागात नीरा देवघर धरण भागातील हिर्डोशी खोरे तर भाटघर धरण भागातील भुतोंडे व वेळवंड खोऱ्यात महुडे खोरे आंबवडे खोरे भागात दरवर्षी वळवाचे पाऊस झाल्यावर धूळवाफेवर भात पिकाची पेरणी करतात. १२ जूननंतर झालेल्या पावसामुळे भाताच्या बियाणांची उगवण चांगली झाली होती त्यामुळे पश्चिम पट्ट्यातील नीरा देवघर धरण भागातील हिर्डोशी खोऱ्यातील शेतकरी भाताच्या लागवडीला सुरवात केली होती. मात्र आठवड्यापासून पाऊस गायब झाला असून चक्क ऊन पडले आहे. त्यामुळे भाताच्या लागवडी रखडल्या आहे. लावलेले भात वाळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

पूर्व भागातील पुणे सातारा महामार्गावरील आजूबाजूची गावे, भोंगवली भागातील गावे, वीसगाव खोरे भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर जमिनीला चांगला वाफसा आल्यावर भाताच्या बियाणांची पेरणी केली असून भाताच्या

रोपांची उगवण झाली. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर भाताची लागवड करतात. मात्र सध्या पाणी नसल्याने माळरानावरील तरवे करपू लागले आहेत. भातलावणी पावसाआभावी रखडली असून लावलेले भात आणि भाताचे तरवे पाणी नसल्यामुळे सुकू लागले आहेत. पावसाची अशीच अवस्था राहिल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढू शकते, अशीच स्थिती आहे

इंद्रायणी तांदळाला सर्वाधिक मागणी

तालुक्यात खरीप पिकाखालील क्षेत्र २० हजार हेक्टर आहे. भात हे प्रमुख पीक असून सुमारे सात हजार ४०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. ५० हेक्टरवर भाताच्या रोपांची पेरणी केली होती. हळव्या आणि गरव्या जातीच्या भाताची लागवड केली जात असून, गरव्या जातीत इंद्रायणी, बासमती आंबेमोहर, पुसा बासमती, तामसाळ, हळवेबारीक या जाती, तर हळव्या जातीत रत्नागिरी २४, कर्जत १८४, सोनम, इंडम, फुले, राधा या जातीच्या भाताची लागवड केली जाते. हळव्या जातीचे भातपीक ९० ते १०० दिवसांत तयार होते आणि त्याला पाणी कमी लागते. तर गरव्या जातीचे भात १०० ते १२० दिवसांत तयार होते. त्याला पाणी अधिक प्रमाणात लागते. तालुक्यात इंद्रायणी जातीच्या तांदळाला सर्वाधिक मागणी असून तालुक्यात ८० ते ९० टक्के इंद्रायणी भाताचीच सर्वाधिक लागवड केली जाते.

०२ भोर

भोर तालुक्यातील हिर्डोशी खोऱ्यात भाताच्या लागवडी रखडल्या.