शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

रस्त्यांच्या दुर्दशेमुळे जिल्ह्यात वाढले अपघातांचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 02:20 IST

सासवडमध्ये एक ठार : पुणे-नाशिक महामार्गावर २ वाहने उलटली

सासवड : सासवड-जेजुरी रोडवरील वीर फाट्यावर २६ फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या दरम्यान झालेल्या अपघातात परिंचे येथील तरुण स्वप्निल वसंत दुधाळ (वय ३०) हा जागीच ठार झाला. सोमनाथ मारुती दुधाळ हा त्याचा चुलतभाऊ गंभीर जखमी झाला आहे. याची फिर्याद लहू महादेव दुधाळ (रा. परिंचे) यांनी सासवड पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलिसांच्या वतीने सुरू आहे.

सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६ फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या दरम्यान सासवड-जेजुरी मार्गावरील वीर फाटा येथे ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील स्वप्निल वसंत दुधाळ (वय ३०) हा जागीच ठार झाला. त्याचा चुलत भाऊ सोमनाथ मारुती दुधाळ (वय ४२) हा गंभीर जखमी झाला आहे .दोघेही परींचे तालुका पुरंदर येथील रहिवाशी असून सासवड येथील एका पेट्रोल पंपावर कामाला होते. त्यांची कामावरील सुट्टी झाल्यानंतर मोटरसायकल (नंबरएम एच. १२-एनएच ९४९८) वरून दोघेही घरी निघाले असताना वीर फाटा येथे माल ट्रक (एमएच 0४-जीआर-३५४१)ने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात स्वप्निलचा जागीच मृत्यू झाला. खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले अधिक तपास पोलिसांच्या वतीने सुरू आहे.कळंब व एकलहरे हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर २ वाहने वेगवेगळ्या ठिकाणी उलटली आहेत. अपघातात जीवितहानी झाली नाही.याबाबत माहिती पुढीलप्रमाणे घोडनदीवरील पुलाच्या पुढील बाजूस सकाळी साडेसहा वाजता आर. आर. रोडवेज प्रा. लि., कंपनीची मालवाहतूक गाडी उलटली. मुंबई येथील कंपनीतून टाटा मोटर्स कंपनीला पुण्याला माल घेऊन जाणारा कंटेनर (एमएच ४६ एच ३३५०) पुढील वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे उलटला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु चालक मानकू यादव जखमी झाला असून मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू आहेत.

ही घटना घडल्यानंतर त्याने दुसरा सहकारी मकसूद आलम याला फोनवरून गाडी उलटल्याची माहिती देत असतानाच त्याची गाडी उलटली.चौधरी ढाब्याजवळ कंटेनर (एमएच ४६ एआर ७५८०) उलटला. या दोन घटनांमध्ये एक किलोमीटरचे अंतर असल्याचे दिसून आले. यामध्ये चालक मकसूद आलम यालासुद्धा किरकोळ दुखापत झाली असून याच्याबरोबर असणारे सहकारी सलमान अन्सारी व काबीलमियाँ हेसुद्धा जखमी झाले आहेत.जिल्ह्यातील पुणे-नाशिक तसेच पुणे-सातारा , पुणे-सोलापूर, पुणे-नगर या मार्गांची दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. त्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.