शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

रस्त्यांच्या दुर्दशेमुळे जिल्ह्यात वाढले अपघातांचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 02:20 IST

सासवडमध्ये एक ठार : पुणे-नाशिक महामार्गावर २ वाहने उलटली

सासवड : सासवड-जेजुरी रोडवरील वीर फाट्यावर २६ फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या दरम्यान झालेल्या अपघातात परिंचे येथील तरुण स्वप्निल वसंत दुधाळ (वय ३०) हा जागीच ठार झाला. सोमनाथ मारुती दुधाळ हा त्याचा चुलतभाऊ गंभीर जखमी झाला आहे. याची फिर्याद लहू महादेव दुधाळ (रा. परिंचे) यांनी सासवड पोलिसांत दिली आहे. अधिक तपास पोलिसांच्या वतीने सुरू आहे.

सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २६ फेब्रुवारी रोजी रात्री अकराच्या दरम्यान सासवड-जेजुरी मार्गावरील वीर फाटा येथे ट्रकने धडक दिल्याने दुचाकीवरील स्वप्निल वसंत दुधाळ (वय ३०) हा जागीच ठार झाला. त्याचा चुलत भाऊ सोमनाथ मारुती दुधाळ (वय ४२) हा गंभीर जखमी झाला आहे .दोघेही परींचे तालुका पुरंदर येथील रहिवाशी असून सासवड येथील एका पेट्रोल पंपावर कामाला होते. त्यांची कामावरील सुट्टी झाल्यानंतर मोटरसायकल (नंबरएम एच. १२-एनएच ९४९८) वरून दोघेही घरी निघाले असताना वीर फाटा येथे माल ट्रक (एमएच 0४-जीआर-३५४१)ने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात स्वप्निलचा जागीच मृत्यू झाला. खबर मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले अधिक तपास पोलिसांच्या वतीने सुरू आहे.कळंब व एकलहरे हद्दीत पुणे-नाशिक महामार्गावर २ वाहने वेगवेगळ्या ठिकाणी उलटली आहेत. अपघातात जीवितहानी झाली नाही.याबाबत माहिती पुढीलप्रमाणे घोडनदीवरील पुलाच्या पुढील बाजूस सकाळी साडेसहा वाजता आर. आर. रोडवेज प्रा. लि., कंपनीची मालवाहतूक गाडी उलटली. मुंबई येथील कंपनीतून टाटा मोटर्स कंपनीला पुण्याला माल घेऊन जाणारा कंटेनर (एमएच ४६ एच ३३५०) पुढील वाहनाने हुलकावणी दिल्यामुळे उलटला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु चालक मानकू यादव जखमी झाला असून मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार चालू आहेत.

ही घटना घडल्यानंतर त्याने दुसरा सहकारी मकसूद आलम याला फोनवरून गाडी उलटल्याची माहिती देत असतानाच त्याची गाडी उलटली.चौधरी ढाब्याजवळ कंटेनर (एमएच ४६ एआर ७५८०) उलटला. या दोन घटनांमध्ये एक किलोमीटरचे अंतर असल्याचे दिसून आले. यामध्ये चालक मकसूद आलम यालासुद्धा किरकोळ दुखापत झाली असून याच्याबरोबर असणारे सहकारी सलमान अन्सारी व काबीलमियाँ हेसुद्धा जखमी झाले आहेत.जिल्ह्यातील पुणे-नाशिक तसेच पुणे-सातारा , पुणे-सोलापूर, पुणे-नगर या मार्गांची दुरावस्था झाली आहे. अनेक ठिकाणी अतिक्रमणामुळे रस्ते अरूंद झाले आहेत. त्यामुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.