शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

‘जलयुक्त’मुळे टंचाईग्रस्त २२ गावे पाणीदार!

By admin | Updated: March 31, 2016 02:58 IST

गेल्या दीड वर्षात जिल्ह्यात शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून २०० गावांत कामे झाल्याने सध्याच्या तीव्र पाणीटंचाईच्या काळातही २२ गावांतील टँकर हटले आहेत.

- बापू बैलकर,  पुणेगेल्या दीड वर्षात जिल्ह्यात शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून २०० गावांत कामे झाल्याने सध्याच्या तीव्र पाणीटंचाईच्या काळातही २२ गावांतील टँकर हटले आहेत. एकीकडे जिल्ह्यात पाणीटंचाईने परिस्थिती गंभीर होत असताना ही गावे मात्र आजही पाणीदार आहेत. या योजनेतून पहिल्या टप्प्यात भोर १२, वेल्हे ११, मुळशी १३, मावळ १५, हवेली १८, खेड १५, आंबेगाव ११, शिरूर १६, जुन्नर १५, बारामती १६, पुरंदर २२, दौैंड २१ व इंदापूर १५ अशा २०० गावांची निवड झाली होती. या गावांत कम्पार्टमेंट बीडिंग, सलग समतल चर, माती नालाबांध, अनगड दगडी बांध, गॅबियन स्ट्रक्चर, खोल सलग समतल चर, अर्बन स्ट्रक्चर, माती नाला बांधदुरुस्ती, शेततळे, साखळी सिमेंट बंधारा, सिमेंट बंधारा दुरुस्ती, नाला गोलीकरण व रुंदीकरण, पाझर तलाव व दुरुस्ती, के.टी. वेअर व दुरुस्ती, कालवा दुरुस्त, सिंचन विहीर, बोअरवेल पुनर्भरण, पुनर्भरण चर, रिचार्ज शाफ्ट, गाळ काढणे,मजगी, वनतळे, वळण बंधारा अशी ४ हजार ४३३ कामे हाती घेतली होती. यातील ३ हजार ३३८ कामे पूर्ण झाली असून ७५३ कामे प्रगतिपथावर आहेत. यासाठी ९,८६४.५३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही बहुतांश कामे लोकसहभाग व शासकीय मदत यांतून करण्यात आली. यातील बहुतेक सारी कामे पावसाळ्यापूर्वीच झाल्याने पावसाळ्यात या कामांत ३०,०७२.२५ दलघमी पाणीसाठा होऊन २८,८४३.५ हेक्टर एवढे क्षेत्र सिंचनाखाली आल्याचा दावा प्रशासनाने केला होता. या वर्षी कमी पाऊस झाल्याने आजच्या परिस्थितीत जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. सुमारे पावणेदोन लाख लोकांना ७३ टँकरनी पाणीपुरवठा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, टंचाईतून मुक्तता मिळावी यासाठीच हाती घेतलेल्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेचा नेमका किती फायदा होत आहे, याचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील सुमारे २२ ते २५ गावांतील टंचाई ‘जलयुक्त’मुळे संपली आहे. आजच्या तारखेला ही गावे पाणीदार असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी सांगितले. अन्यथा, या परिस्थितीत या गावांत सुमारे ३० ते ४० टँकरने पाणीपुरवठा करावा लागला असता. सद्य:स्थितीत मात्र तेथे टँकर सुरू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यात भोर तालुक्यातील भोंगवली, वेल्हे तालुक्यातील रांजणे, खेडमधील वाफगाव, जउळके, चिंचबाईवाडी, कनेरसर, भागडी, आंबेगावमधील लोणी-धामणी, पहाडदरा, जुन्नरमधील संतवाडी, शिरूरमधील धामारी, जांबूत, पुरंदरमधील वाल्हे, पिंगारी, पानवडी, धानोरी, गुळुंचे, बारामतीतील जोगवडी, मुर्टी, भोंगडेवाडी, पारवडी व इंदापूरमधील कळस या पूर्वीच्या टंचाईग्रस्त गावांचा समावेश आहे. लोणीधामणी : साडेचारशे हेक्टरवर कांदाजिल्ह्यात दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेले आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी गावाची जलयुक्तमधून झालेल्या कामामुळे ही ओळख पुसली गेली आहे. २0१२ पर्र्यत टंचाईत १३ वाड्या वस्त्यांवर ७ ते ९ टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. गावाने एकत्र येवून या टंचाईतून मुक्त होण्याचे ठरविले आणि जलयुक्त शिवार या योजनेत लोकसहभाग दाखवला. त्यामुळे १७ सिमेंट बंधार, ओढा खोलीकरण, दोनशे हेक्टरपर्र्यत समतल चर, २२ माती नाल्यांचे गाळ काढल्याने ही पहिली वेळ आहे की गावात साडेचारशे हेक्टरवर सध्या कांदा लागवड केली आहे. या दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू असायची. यावर्षी गावात विहीरींना आजही चांगला पाणीसाठा असून गाव टँकरमुक्त झाले असल्याचे माजी सरपंच अंकूश भुमकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जलयुक्त शिवार योजना लोकसहभागातून सुरू आहे. ज्या गावांतील लोकांनी यासाठी पुढाकार घेतला, तेथे मोठ्या प्रमाणात व चांगली कामे झाली आहेत. त्यामुळे सध्याच्या टंचाईतही या गावांना पाणीटंचाईची झळ बसली नाही. - सुभाष काटकर, अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी