शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

‘जलयुक्त’मुळे टंचाईग्रस्त २२ गावे पाणीदार!

By admin | Updated: March 31, 2016 02:58 IST

गेल्या दीड वर्षात जिल्ह्यात शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून २०० गावांत कामे झाल्याने सध्याच्या तीव्र पाणीटंचाईच्या काळातही २२ गावांतील टँकर हटले आहेत.

- बापू बैलकर,  पुणेगेल्या दीड वर्षात जिल्ह्यात शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेतून २०० गावांत कामे झाल्याने सध्याच्या तीव्र पाणीटंचाईच्या काळातही २२ गावांतील टँकर हटले आहेत. एकीकडे जिल्ह्यात पाणीटंचाईने परिस्थिती गंभीर होत असताना ही गावे मात्र आजही पाणीदार आहेत. या योजनेतून पहिल्या टप्प्यात भोर १२, वेल्हे ११, मुळशी १३, मावळ १५, हवेली १८, खेड १५, आंबेगाव ११, शिरूर १६, जुन्नर १५, बारामती १६, पुरंदर २२, दौैंड २१ व इंदापूर १५ अशा २०० गावांची निवड झाली होती. या गावांत कम्पार्टमेंट बीडिंग, सलग समतल चर, माती नालाबांध, अनगड दगडी बांध, गॅबियन स्ट्रक्चर, खोल सलग समतल चर, अर्बन स्ट्रक्चर, माती नाला बांधदुरुस्ती, शेततळे, साखळी सिमेंट बंधारा, सिमेंट बंधारा दुरुस्ती, नाला गोलीकरण व रुंदीकरण, पाझर तलाव व दुरुस्ती, के.टी. वेअर व दुरुस्ती, कालवा दुरुस्त, सिंचन विहीर, बोअरवेल पुनर्भरण, पुनर्भरण चर, रिचार्ज शाफ्ट, गाळ काढणे,मजगी, वनतळे, वळण बंधारा अशी ४ हजार ४३३ कामे हाती घेतली होती. यातील ३ हजार ३३८ कामे पूर्ण झाली असून ७५३ कामे प्रगतिपथावर आहेत. यासाठी ९,८६४.५३ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही बहुतांश कामे लोकसहभाग व शासकीय मदत यांतून करण्यात आली. यातील बहुतेक सारी कामे पावसाळ्यापूर्वीच झाल्याने पावसाळ्यात या कामांत ३०,०७२.२५ दलघमी पाणीसाठा होऊन २८,८४३.५ हेक्टर एवढे क्षेत्र सिंचनाखाली आल्याचा दावा प्रशासनाने केला होता. या वर्षी कमी पाऊस झाल्याने आजच्या परिस्थितीत जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. सुमारे पावणेदोन लाख लोकांना ७३ टँकरनी पाणीपुरवठा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, टंचाईतून मुक्तता मिळावी यासाठीच हाती घेतलेल्या ‘जलयुक्त शिवार’ योजनेचा नेमका किती फायदा होत आहे, याचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील सुमारे २२ ते २५ गावांतील टंचाई ‘जलयुक्त’मुळे संपली आहे. आजच्या तारखेला ही गावे पाणीदार असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी सांगितले. अन्यथा, या परिस्थितीत या गावांत सुमारे ३० ते ४० टँकरने पाणीपुरवठा करावा लागला असता. सद्य:स्थितीत मात्र तेथे टँकर सुरू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यात भोर तालुक्यातील भोंगवली, वेल्हे तालुक्यातील रांजणे, खेडमधील वाफगाव, जउळके, चिंचबाईवाडी, कनेरसर, भागडी, आंबेगावमधील लोणी-धामणी, पहाडदरा, जुन्नरमधील संतवाडी, शिरूरमधील धामारी, जांबूत, पुरंदरमधील वाल्हे, पिंगारी, पानवडी, धानोरी, गुळुंचे, बारामतीतील जोगवडी, मुर्टी, भोंगडेवाडी, पारवडी व इंदापूरमधील कळस या पूर्वीच्या टंचाईग्रस्त गावांचा समावेश आहे. लोणीधामणी : साडेचारशे हेक्टरवर कांदाजिल्ह्यात दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेले आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी गावाची जलयुक्तमधून झालेल्या कामामुळे ही ओळख पुसली गेली आहे. २0१२ पर्र्यत टंचाईत १३ वाड्या वस्त्यांवर ७ ते ९ टँकरने पाणी पुरवठा करावा लागत होता. गावाने एकत्र येवून या टंचाईतून मुक्त होण्याचे ठरविले आणि जलयुक्त शिवार या योजनेत लोकसहभाग दाखवला. त्यामुळे १७ सिमेंट बंधार, ओढा खोलीकरण, दोनशे हेक्टरपर्र्यत समतल चर, २२ माती नाल्यांचे गाळ काढल्याने ही पहिली वेळ आहे की गावात साडेचारशे हेक्टरवर सध्या कांदा लागवड केली आहे. या दिवसात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरू असायची. यावर्षी गावात विहीरींना आजही चांगला पाणीसाठा असून गाव टँकरमुक्त झाले असल्याचे माजी सरपंच अंकूश भुमकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.जलयुक्त शिवार योजना लोकसहभागातून सुरू आहे. ज्या गावांतील लोकांनी यासाठी पुढाकार घेतला, तेथे मोठ्या प्रमाणात व चांगली कामे झाली आहेत. त्यामुळे सध्याच्या टंचाईतही या गावांना पाणीटंचाईची झळ बसली नाही. - सुभाष काटकर, अधीक्षक, जिल्हा कृषी अधिकारी