शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
5
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
6
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
7
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
8
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
9
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
10
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
11
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
12
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
13
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
14
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
15
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
16
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
17
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
18
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
19
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
20
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा

सरपंचासह १३ जणांवर दरोड्याचा गुन्हा

By admin | Updated: November 27, 2015 01:38 IST

नारायणगाव येथील शंकर जाधव यांचा गाळा ताब्यात घेण्याच्या प्रकरणात नारायणगाव पोलिसांनी अखेर ग्रामपंचायतीचे सरपंचांसह ग्रामसेवक व कर्मचारी

नारायणगाव : नारायणगाव येथील शंकर जाधव यांचा गाळा ताब्यात घेण्याच्या प्रकरणात नारायणगाव पोलिसांनी अखेर ग्रामपंचायतीचे सरपंचांसह ग्रामसेवक व कर्मचारी अशा १३ जणांवर भा़ द़ विधान कलम ३९५ अन्वये दरोड्याचा गुन्हा बुधवारी रात्री उशिरा दाखल केला आहे.सुधारित रिव्हिजनची कॉपी जुन्नर न्यायालयात दाखल करून, आरोपींना पुन्हा अटक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नारायणगाव पोलीस ठाण्याच्या वतीने केली आहे़, अशी माहिती नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र थोरात यांनी दिली़ या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल होणार, असे वृत्त प्रथम ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते़ नारायणगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री मेहेत्रे, ग्रामसेवक राजेंद्र खराडे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी मच्छिंद्र जगताप, दिनेश वाव्हळ, मंदार देशपांडे, प्रवीण जगताप, हनुमान लोखंडे, विजय माने, दीपक कदम, गोपी खंडे, दीपक जोशी, ज्ञानेश्वर माने, संतोष कोल्हे यांच्यासह राजेंद्र हाडवळे, ग्रा़ पं़ सदस्य अमित राजेंद्र कोऱ्हाळे, शांताराम बरडे, अतुल किसन डेरे, स्वप्नील किसन डेरे, गौरव दिलीप पाटे, अनिकेत अविनाश कोऱ्हाळे, दिनेश दादाभाऊ शिंंदे, साईनाथ घोलप, नंदू अडसरे, दत्तोबा तरडे, विनायक जाधव, सागर डेरे, रूपेश विलास खैरे, अक्षय खोकराळे, प्रणव पाटे, कृष्णा डेरे, चंद्रकांत अडसरे आदींवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ पोलिसांनी शंकर जाधव यांचा फेरपुरवणी जबाब २१ नोव्हेंबर रोजी घेतला होता. यावरून दरोड्याचे कलम लागणार, हे जवळपास निश्चित झाले होते. पोलिसांनी जुन्नर पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, नारायणगाव ग्रामपंचायत, जिल्हा परिषद यांच्याकडे पत्रव्यवहार करून ग्रामपंचायतीला ही कारवाई करण्याचे अधिकार आहेत किंवा नाही, याची माहिती मागितल्याने दरोड्याचे कलम वाढविण्यास विलंब झाला होता़ यापूर्वी नारायणगाव पोलीस ठाणे गुन्हा रजि़ नं़ १३०/२०१५ भा़ द़ वि़ कलम ४५२, ४४८, ४२७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६ प्रमाणे ग्रामपंचायत व बाहेरील गुंडाविरूद्घ १८ आरोपींविरूद्घ गुन्हा नोंद केला होता़ आता यापूर्वीच्या १८ जण व सरपंच, ग्रामसेवक व ग्रामपंचायत कर्मचारी आदी १३ जणांवर नव्याने गुन्हा दाखल केला आहे़ या गुन्ह्यात आरोपींची संख्या ३१ झाली आहे़ (वार्ताहर)ग्रामपंचायतीचीही पोलिसांकडे तक्रारग्रामपंचायतीने नारायणगाव पोलीस ठाण्यास पत्र दिले असून, या पत्रात सदरची जागा ही ग्रामपंचायत मालकीची असून ती गोडाऊन म्हणून वापरात आहे़ १६ नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीने गाळ्यावर केलेल्या कारवाईचा राग मनात धरून त्याच दिवशी ११.१५ वाजता बाळू लक्ष्मण जाधव यांचेसह दिलीप खैरे, प्रशांत खैरे, योगेश पाटे, मंदार पाटे, कपिल कानसकर, आकाश कानसकर, संतोष दांगट, नीलेश गांधी, अशोक रत्नपारखी, आरीफ आतार, संदीप मुळे, नामदेव खैरे, सागर भोर, दिनेश बारणे, शिवाजी कोल्हे, वैभव बारहाते, अनिकेत धावडे, आकाश वऱ्हाडी, अझर शेख, प्रफुल्ल सुराणा, अभिजीत शेटे आदींनी ग्रामपंचायत मालकीच्या गोडाऊनची तोडफोड करून सुमारे ४७ हजार रुपयांचे, गाळ्यातील साहित्य लंपास केले़, अशी लेखी तक्रार सरपंच जयश्री मेहेत्रे व ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यास केली आहे़