शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
2
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
3
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
4
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
5
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
6
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
7
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
8
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
9
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीराव फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
10
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
11
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
12
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
13
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
14
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
15
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
16
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
17
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
18
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
19
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
20
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळातही शेततळी वरदान

By admin | Updated: August 6, 2015 03:38 IST

सध्याच्या दुष्काळसदृश स्थितीत फळबागांना जगविणारी, आठमाही पाणी परवानाधारकांना बागायतदाराचा दर्जा देणारी, वैयक्तिक व सामुदायिक शेततळी म्हणजे

शैलेश काटे, इंदापूर सध्याच्या दुष्काळसदृश स्थितीत फळबागांना जगविणारी, आठमाही पाणी परवानाधारकांना बागायतदाराचा दर्जा देणारी, वैयक्तिक व सामुदायिक शेततळी म्हणजे शेतकऱ्यांच्या भरवशाच्या पाण्याच्या बँका ठरलेल्या आहेत. त्यामुळे दुष्काळात शेततळी वरदानच ठरली आहेत.सन २००३-०४ च्या सुमारास ही शेततळ्यांची योजना सुरू झाली. पुढच्या दोन-तीन वर्षांत तिने गती घेतली. प्रथमत: पुरेशा गांभीर्याने न घेतलेल्या या योजनेचे महत्त्व त्या दशकात सतत दुष्काळ अनुभवणाऱ्या इंदापूरकरांना चांगलेच पटले. आजघडीला सन २०१२-१३, सन २०१३-१४ या कालावधीत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून १९४ सामुदायिक शेततळी झाली आहेत. ४ कोटी ९० लाख १ हजार ७४ रुपयांचे अनुदान मिळाले आहे. ८ लाख ३१ हजार ५०० घनमीटर पाणीसाठा निर्माण झाला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून सन २०१३-१४ या वर्षात १३६ लाभार्थ्यांना २ कोटी ६९ लाख ७७ हजार ७७४ रुपये अनुदान मिळाले. निर्माण झालेल्या शेततळ्यांमध्ये ४ लाख ५५ हजार घनमीटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.पावसाचा लहरीपणा, भूगर्भातील पाणीपातळीत होणारी घट, वातावरणातील बदलांमुळे तापमानात होणारी वाढ, वीज भारनियमनाचे संकट यातून पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना मार्च ते जूनदरम्यान पाण्याची मोठ्या प्रमाणात आवश्यकता भासत असे. भीमा, नीरा नद्यांच्या किनारी शेतकऱ्यांनी उचलपाणी परवानगी घेऊन अथवा विनापरवाना उपसा सिंचन योजना राबवल्या. त्यामुळे त्यांना उन्हाळा तितकासा जाचत नसे. नीरा कालव्यावरील बारमाही पाणी परवानाधारकांनाही उन्हाळ्यात पाण्याची कमतरता भासत नसे. मात्र, तालुक्यातील निमगाव केतकी पट्टयातील २२ गावे, खडकवासला कालव्यावर अवलंबून असणाऱ्या गावांना उन्हाळ्यात पाण्यापासून वंचित राहावे लागत असे.आठमाही पाणी परवानाधारकांना मार्च ते जून या कालावधीत शेतीला शाश्वत पाण्याची सोय करण्यासाठी शेततळ्याच्या योजनेचा पर्याय पुढे आला. दुष्काळात त्याची उपयुक्तता जाणवली. शेततळ्याची सुरुवात तालुक्यातील बोरी गावापासून झाली. तेथील द्राक्ष व डाळिंबाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डाळिंब व द्राक्षासारख्या पिकांना गरजेप्रमाणे पाणी व्यवस्थापन करणे शेततळ्यांमुळे सोयीस्कर होऊ लागले. बघता बघता शेततळे घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली.चालू वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे जून महिन्यामध्ये फळझाडांची पाण्याची गरज शेततळ्यांनीच भागवली आहे. इंदापूर तालुक्यातील फळबागा मध्यम ते हलक्या प्रतीच्या जमिनीवर बहरलेल्या आहेत. ठिबक सिंचन व आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकरी फळबागांचे व्यवस्थापन करीत आहेत. शेततळ्यातील पाण्याचा गरजेएवढाच वापर करण्यात येत असल्याने द्राक्ष व डाळिंब बागा योग्य प्रकारे जोपासल्या गेल्या आहेत. काळ्या रंगाच्या द्राक्षाच्या निर्यातीमध्ये इंदापूर तालुका अग्रेसर राहील. त्यामध्ये शेततळ्याचे मोठे योगदान आहे.