शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

डोळ्यात स्वप्न आणि मनात भीती, सूसवासीय द्विधा मन:स्थितीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:21 IST

.......................... सूस गाव :२ ....................................... दीपक मुनोत/ लोकमत न्यूज नेटवर्क पुणे :पुण्याच्या आसपासच्या बहुतांश गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम ...

..........................

सूस गाव :२

.......................................

दीपक मुनोत/ लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे :पुण्याच्या आसपासच्या बहुतांश गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. त्याला सूस गावही अपवाद नाही. पायाभूत सुविधा उपलब्ध होणार असतील आणि पाण्याचा प्रश्न सुटणार असेल ग्रामस्थांचे विलीनीकरणास ना नाही. या परिस्थितीत ग्रामस्थ आजही द्विधा मन:स्थितीत आहे.

गावात पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव असून, पाणी प्रश्नाबरोबरच नागरिकांनी वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार ''लोकमत''शी बोलताना केली. जागोजागी विजेचे खांब नादुरुस्त असून केबलचेही काम अर्धवट आहे.

ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या 3 कोटी रुपयांच्या महसुलातील मोठा हिस्सा हा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) ला जातो. पण गावात रखडलेल्या कामांना निधी देण्याविषयी प्राधिकरणाने नेहमीच उदासीनता दाखवली आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात स्मशानभूमी आणि शाळेसाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून अनेकदा प्रयत्न केले गेले पण उपयोग झाला नाही.

गावातील अनेक विद्यार्थी हे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या खेळातून नावारूपाला आले आहेत, पण त्यांना खेळण्यासाठी मैदानच उपलब्ध नसल्याने गावातील विद्यार्थी आणि खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली.

आमचे गांव पुणे महापालिकेत समाविष्ट झाले तर आमच्यावर अतिरिक्त कर वसूल करण्यात येईल, त्यामानाने सुविधा मिळतील की नाही यावरही प्रश्नचिन्ह आहेच. यापूर्वी, अकरा गावं महापालिकेत समाविष्ट करण्यात आली होती, त्यांची आज काय अवस्था आहे हेही बघीतलं गेलं पाहिजे. त्यांची जी अवस्था आज आहे ती आमची भविष्यात होऊ नये, अशी भीतीदेखील गावातील नागरिकांनी व्यक्त केली.

नियोजित विकास आराखड्यात आरक्षण पडल्यास, आमच्या जागांची बाजारभावानुसार किंमत मिळावी, अशीही मागणी नागरिकांनी केली.

............................

प्राथमिक शाळा पत्र्याच्या खोलीत भरते. शाळा आणि अंगणवाडीसाठी जागा नसल्याने मुलांना आम्ही शिकवण्यासाठी पाठवायचे कुठे? महानगरपालिकेने ही दूर करावी.

- एक पालक

.........................

लॉकडाऊनमध्ये आमच्यासारख्या लघू उद्योग करणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ग्रामपंचायत अथवा प्रशासनकडून कुठलीही मदत मिळाली नाही. महापालिकेने आम्हाला मदत करावी.

- युवराज सामाले, गॅरेज चालक.

.........

गावाच्या मुख्य रस्त्यावर पावसाळ्यात पाणी साचते. परिणामी संपूर्ण रस्ता बंद असतो. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी होत असल्याने मनस्ताप सहन करावा लागतो. महानगरपालिकेने रस्तारुंदीकरण प्राधान्याने करावे.

- संदीप नाईक, व्यावसायिक

...................................

(उद्याच्या अंकात : महाळूंगे)

.......

फोटो आहे