शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

गूढ आवाजाने दिघीत नागरिक भयभीत

By admin | Updated: January 6, 2015 00:29 IST

अचानक बसणाऱ्या हादऱ्यामुळे थरथरणाऱ्या भिंती, मांडणीवरून पडलेली भांडी, जणू घरच हलत आहे की काय, असा होणारा भास नव्हे तर ही वास्तव परिस्थिती आहे

दिघी : अचानक बसणाऱ्या हादऱ्यामुळे थरथरणाऱ्या भिंती, मांडणीवरून पडलेली भांडी, जणू घरच हलत आहे की काय, असा होणारा भास नव्हे तर ही वास्तव परिस्थिती आहे. दिघी, चऱ्होली, चोविसावाडी, वडमुखवाडी या परिसरात दिवसा व रात्री अचानक हादरे जाणवत आहेत. या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये एक प्रकारची घबराट निर्माण झाली आहे.दिघी, चऱ्होली, वडमुखवाडी व चोविसावाडी ही गावे १७ वर्षांपूर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झाली. त्यानंतर या भागाचे विस्तारीकरण झपाट्याने होत गेले. आजही या भागात मोठमोठ्या इमारती उभारण्याचे काम सुरूच आहे. झपाट्याने वाढणाऱ्या विस्तारीकरणाबरोबरच या भागातील लोकसंख्याही झपाट्याने वाढतच आहे. हा भाग म्हणजे महानगरपालिकेचे अगदी शेवटचे टोक. पुणे-आळंदी रोडवर असलेला हा परिसर, याला लागूनच (दिघी मॅग्झिन) आर्मीची हद्द लागते. आर्मी हद्दीतही नेहमी होणाऱ्या दारुगोळ्यांच्या चाचण्या याही नागरिकांसाठी डोकेदुखीचा भाग बनला आहे. या हद्दीलगतही मोठमोठ्या इमारती आहेत. या इमारतीमध्ये दिवसा व रात्री अचानक भिंती थरथरत असल्याचा भास होतो. अनेक वेळा घरातील मांडणीवरील भांडी पडल्याचे या परिसरातील नागरिक सांगतात.आर्मी हद्दीत नेहमीच दारुगोळ्याच्या चाचण्या घेतल्या जातात. याचा मोठमोठा आवाज कानावर येतो. शिवाय इमारतींनाही जोराचे हादरे बसतात. काही महिन्यांपूर्वी दिघी परिसरात भूकंप होऊन घरातील भांडी खाली पडली होती. मात्र तो भूकंप होता की, आर्मीच्या चाचणीमुळे घडले याबाबत नागरिक अनभिज्ञ आहेत. या भागातील नागरिक सांगतात की, दारुगोळ्याच्या चाचण्यांमुळे इमारती हलतात, घरातील भांडी पडतात. त्यामुळे घर पडते की काय अशी भीती वाटते. त्यामुळे रात्रीच्या वेळी तर कमालीची भीती जाणवते. याबाबत अनेक वेळा अधिकाऱ्यांना कळविले असता फक्त पाहणी केली जाते. अलीकडे अशाच प्रकारच्या तक्रारी येऊ लागल्याने असे जर काही प्रकार असतील व एखादी गंभीर दुर्घटना घडलीच तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आर्मी हद्दीमध्ये अनेकदा कचरा, भंगार गोळा करणाऱ्या महिला, पुरुष या भागात फिरतात. अनेकदा मुलेही क्रीडांगण म्हणून हद्दीत खेळण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळी अचानक होणाऱ्या भीतिदायक चाचण्यांमुळे एखादी दुर्घटना घडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.(वार्ताहर)आठ-नऊ महिन्यांपूर्वी या परिसरात दोन-तीन वेळा भूकंपासारखे धक्के जाणवत होते. याबाबत हवामान खात्याकडे चौकशी केली असता पुण्यासह दिघी परिसरात कोठेच भूकंप झाला नसल्याचे सांगण्यात आले होते. आर्मीकडेही याबाबत माहिती घेतली असता त्यांनीही आमच्या कोणत्याच चाचण्या सध्या घेत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे या परिसरात नक्की कशामुळे धक्के जाणवत होते हे गुलदस्तातच राहिले.- चंद्रकांत वाळके, नगरसेवकआर्मी हद्दीत होणाऱ्या दारुगोळ्याच्या चाचण्यांमुळे या भागात सतत होणारा मोठा आवाज व त्यामुळे हादरणारी घरे ही परिस्थितीच भयानक वाटते. आर्मीने आपल्या या चाचण्या नागरी वस्त्यांजवळ करण्यापेक्षा चाकणच्या घाटात घेतल्यास नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने योग्य राहील.- सुनील तापकीर, दिघीचऱ्होली परिसरातही अचानक हादऱ्याचा त्रास जाणवतो. मोठा आवाज आल्यासारखा वाटतो. हा प्रकार नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने भीतिदायक आहे. लहान-मोठ्या घरांसह मोठ्या व उंच इमारतींनाही याचा निश्चितच धोका जाणवतो. - राहुल तापकीर, चऱ्होली