शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Ramesh Bais: शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल, भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल : राज्यपाल रमेश बैस

By विश्वास मोरे | Updated: August 14, 2023 17:50 IST

आपण विश्व गुरू होतो आणि मला विश्वास आहे, की भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी पिंपरीत सोमवारी सांगितले...

पिंपरी :शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि मशिन लर्निंगच्या उदयानंतर संपूर्ण शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होतील. केवळ साक्षर होणे पुरेसे नाही, तर एआय साक्षर होणे गरजेचे आहे. आपण विश्व गुरू होतो आणि मला विश्वास आहे, की भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी पिंपरीत सोमवारी सांगितले.

पिंपरी - चिंचवडमधील डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठाच्या चौदाव्या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल बैस बोलत होते. या सोहळ्यास विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र - कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया, प्राज इंडस्ट्रिजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी आणि डॉ. पी. एन. राजदान यांना डीलिट प्रदान करण्यात आली.

देश आणि जगाच्या कानाकोपऱ्यात जाण्याची तयारी ठेवा

राज्यपाल बैस म्हणाले, ‘‘नव्या उद्यमशील समाजात आपण प्रवेश करत आहोत. याचा अर्थ असा नाही, की प्रत्येकजण उद्योजक असला पाहिजे. जे कुठले काम, नोकरी करत असू, त्या ठिकाणी उद्यमशीलतेच्या भावनेतून काम केले पाहिजे. संपूर्ण जग आपले कार्यक्षेत्र बनले पाहिजे. प्रत्येक तरुणाने जगातली एक तरी भाषा आत्मसात केली पाहिजे. केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रापुरते सीमित न ठेवता देशाच्या, जगाच्या काेनाकोपऱ्यात कुठेही जाण्याची तयारी ठेवा.’’

राज्यपाल बैस म्हणाले, ‘‘येत्या २०३० पर्यंत मशिन लर्निंगच्या माध्यमातून ४० ते ८० कोटी रोजगार निर्माण होऊ शकतात, असा मॅकेन्झीचा अहवाल सांगतो. यातल्या ३७.५ कोटी लोकांना त्यांच्या कामाची श्रेणी पूर्णत: बदलावी लागेल. एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात केल्यास भारतीयांना एआय आणि मशिन लर्निंगमुळे होणाऱ्या बदलांना सामोरे जाता येईल. आपल्याला मी सावध करू इच्छितो की, एआयच्या बाबतीत आपण जगातील काही देशांच्या मागे आहोत. मात्र, चांगली गोष्ट ही आहे की, भारतीय नव्या गोष्टी वेगाने शिकतात. नव्या तंत्रज्ञानाशी भारतीय चटकन जुळवून घेतात. एआयच्या आगामी युगात निरंतर शिकत राहावे लागेल.

कुलपती डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, ‘‘शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता या बाबतीत विद्यापीठ तडजोड करत नाही. त्यामुळेच नॅक मानांकनात चारपैकी ३.६४ गुण विद्यापीठाला मिळाले असून, ए प्लस - प्लस दर्जा प्राप्त झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने पंधराव्या स्थानावर झेप घेतली आहे.

टॅग्स :Ramesh Baisरमेश बैसEducationशिक्षण