शहरं
Join us  
Trending Stories
1
'जात नाही, तर आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण हवे', सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
2
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
3
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
4
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
5
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
6
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
7
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
8
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
9
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
10
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
11
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
12
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
13
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
14
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
15
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
16
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
18
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
19
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
20
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान

Ramesh Bais: शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल, भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल : राज्यपाल रमेश बैस

By विश्वास मोरे | Updated: August 14, 2023 17:50 IST

आपण विश्व गुरू होतो आणि मला विश्वास आहे, की भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी पिंपरीत सोमवारी सांगितले...

पिंपरी :शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होत आहेत. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि मशिन लर्निंगच्या उदयानंतर संपूर्ण शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होतील. केवळ साक्षर होणे पुरेसे नाही, तर एआय साक्षर होणे गरजेचे आहे. आपण विश्व गुरू होतो आणि मला विश्वास आहे, की भारत पुन्हा एकदा विश्वगुरू बनेल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी पिंपरीत सोमवारी सांगितले.

पिंपरी - चिंचवडमधील डॉ. डी. वाय. पाटील (अभिमत) विद्यापीठाच्या चौदाव्या पदवीप्रदान समारंभात राज्यपाल बैस बोलत होते. या सोहळ्यास विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र - कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, सचिव डॉ. सोमनाथ पाटील, विश्वस्त डॉ. स्मिता जाधव, विश्वस्त व खजिनदार डॉ. यशराज पाटील उपस्थित होते. यावेळी राज्यपालांच्या हस्ते कायनेटिक ग्रुपचे अध्यक्ष अरुण फिरोदिया, प्राज इंडस्ट्रिजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी आणि डॉ. पी. एन. राजदान यांना डीलिट प्रदान करण्यात आली.

देश आणि जगाच्या कानाकोपऱ्यात जाण्याची तयारी ठेवा

राज्यपाल बैस म्हणाले, ‘‘नव्या उद्यमशील समाजात आपण प्रवेश करत आहोत. याचा अर्थ असा नाही, की प्रत्येकजण उद्योजक असला पाहिजे. जे कुठले काम, नोकरी करत असू, त्या ठिकाणी उद्यमशीलतेच्या भावनेतून काम केले पाहिजे. संपूर्ण जग आपले कार्यक्षेत्र बनले पाहिजे. प्रत्येक तरुणाने जगातली एक तरी भाषा आत्मसात केली पाहिजे. केवळ मुंबई किंवा महाराष्ट्रापुरते सीमित न ठेवता देशाच्या, जगाच्या काेनाकोपऱ्यात कुठेही जाण्याची तयारी ठेवा.’’

राज्यपाल बैस म्हणाले, ‘‘येत्या २०३० पर्यंत मशिन लर्निंगच्या माध्यमातून ४० ते ८० कोटी रोजगार निर्माण होऊ शकतात, असा मॅकेन्झीचा अहवाल सांगतो. यातल्या ३७.५ कोटी लोकांना त्यांच्या कामाची श्रेणी पूर्णत: बदलावी लागेल. एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात केल्यास भारतीयांना एआय आणि मशिन लर्निंगमुळे होणाऱ्या बदलांना सामोरे जाता येईल. आपल्याला मी सावध करू इच्छितो की, एआयच्या बाबतीत आपण जगातील काही देशांच्या मागे आहोत. मात्र, चांगली गोष्ट ही आहे की, भारतीय नव्या गोष्टी वेगाने शिकतात. नव्या तंत्रज्ञानाशी भारतीय चटकन जुळवून घेतात. एआयच्या आगामी युगात निरंतर शिकत राहावे लागेल.

कुलपती डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, ‘‘शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता या बाबतीत विद्यापीठ तडजोड करत नाही. त्यामुळेच नॅक मानांकनात चारपैकी ३.६४ गुण विद्यापीठाला मिळाले असून, ए प्लस - प्लस दर्जा प्राप्त झाला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाने पंधराव्या स्थानावर झेप घेतली आहे.

टॅग्स :Ramesh Baisरमेश बैसEducationशिक्षण