शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

उंबरठा आणि गिरीश कर्नाड ; जब्बार पटेल यांनी जागवल्या आठवणी (व्हिडीओ)

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 17:40 IST

गिरीशबद्दल बोलायचं झाल्यास तो मुळात उमदा, विद्वान, उत्तम अभिनेता आणि प्रयोगशील कलाकार आणि लेखक होता. अनेकदा कलाकार भावनिक असतो.मात्र गिरीश हा अतिशय तर्कशुद्ध बुद्धीने मांडणी करणारा होता.

पुणे : आम्ही उंबरठा केला तेव्हा आम्हाला स्मिताच्या नवऱ्याची भूमिका करणाऱ्यासाठी एका देखण्या पुरुषाची गरज होती. पुरुष हा शब्द मुद्दाम याकरीता वापरतो कारण विजय तेंडुलकरांनी पटकथा लिहिताना बायकांना किती सहन करावा लागतो असा अर्थ लावला होता. याच पटकथेचा दुसरा भाग म्हणजे एक पुरुष आहे. तो तिचा नवरा आहे आणि तो पुरुषासारखा वागतो. गिरीशने या भूमिकेचं आव्हान स्वीकारलं. खरं तर भूमिकेला नकारात्मक छटा होता. संपूर्ण भूमिकेत त्याने पुरुषीपण आणलं होत. काही दृश्यांमध्ये त्याचं पुरुषीपण ठसण्यासाठी त्याला उघडा दाखवलं आहे. अगदी माझे दुसऱ्या बाईशी संबंध आहेत हे सांगतानाही त्याचा पुरुषी अहंकार त्याने दाखवला होता. काही स्त्रियांना तर गिरीशचं कसं नुकसान केलं इतपत त्याचं काम पटलं होतं. पण गिरीशला तो काय करतोय याची पूर्ण जाणीव होती. 

               १९६०च्या काळात  बंगाली रंगभूमी जिथे बादल सरकार. मोहन राकेश हिंदीमध्ये, कन्नड रंगभूमीवर मध्ये गिरीश कर्नाड आणि मराठीमध्ये विजय तेंडुलकर अशा चार समकालीन नाटककारांनी तिथलीच नाही तर एकमेकांच्या भाषांची रंगभूमी अजरामर केली.  इतरांची नाटकं स्वतःच्या रंगभूमीवर नेणे आणि आपली नाटकं  वेगळ्या भाषेत बसवणे असे प्रयोग झाले. गिरीशबद्दल बोलायचं झाल्यास तो मुळात उमदा, विद्वान, उत्तम अभिनेता आणि प्रयोगशील कलाकार आणि लेखक होता. अनेकदा कलाकार भावनिक असतो.मात्र गिरीश हा अतिशय तर्कशुद्ध बुद्धीने मांडणी करणारा होता. त्याला इतिहासात, पुराणात अधिक रस होता. त्याची नाटकं मिथकावर आधारित असायचं. नाटकात तुघलकसारखं नाटक लिहिणं सोपं नसत. असं नाटक लिहिताना लेखकाची लिखाण शैली बदलते. नटाला स्वतःची शैली बदलावी लागते. तो आजच्या आधुनिकेतचा प्रवक्ता होतास. संगीत अकादमीचा अध्यक्ष असताना त्याला मी जवळून बघितलं आहे. तो सगळ्यांची आठवण ठेवत असे. एकदा म्हणाला, ' जब्बार आपण विठाबाईंना अवॉर्ड द्यायला हवं'. तो अध्यक्ष असतानाच ज्येष्ठ तमाशा कलावंत विठाबाई नारायणगावकर यांना सन्मानित करण्यात आलं. त्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यावर 'हा पुरस्कार तेंडुलकरांना का नाही मिळाला' अशी प्रतिक्रिया दिली होती. यावरून त्याचा साधेपणा दिसतो. मध्यंतरी त्याने ऑक्सिजन सिलेंडर लावून सलमान खानसोबत काम केलं होत.त्यात त्याची कमिटमेन्ट होती. त्याचा जन्म पुण्यातला. उंबरठातलं मराठी स्वतः बोललेला आहे. आधुनिकेतचा व अविष्कार स्वातंत्र्याचा प्रवक्ता, उत्तम मराठी, कन्नड आणि इंग्रजी बोलणारा गिरीश आज नाही याचं अतीव दुःख आहे.   

-डॉ. जब्बार पटेल 

(गिरीश कर्नाड यांना वाहिलेल्या श्रद्धांजलीमधून साभार)

टॅग्स :Girish Karnadगिरिश कर्नाडJabbar Patelजब्बार पटेल