शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रुंदीकरणासाठीची खोदाई धोकादायक

By admin | Updated: May 30, 2017 02:29 IST

संत तुकाराममहाराज पालखी सोहळा अवघ्या १७ दिवसांनी मार्गस्थ होणार असताना देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत पालखी मार्गालगतचा

देवराम भेगडे /लोकमत न्यूज नेटवर्कदेहूरोड : संत तुकाराममहाराज पालखी सोहळा अवघ्या १७ दिवसांनी मार्गस्थ होणार असताना देहूरोड कॅन्टोन्मेंट हद्दीत पालखी मार्गालगतचा कचरा उचलणे, स्वच्छता विषयक कामे करणे व झाडेझुडपे छाटणीचे काम सुरू करण्यात आलेले नाही. पालखीमार्गावर विविध समस्या दिसत असल्याने वारकऱ्यांची वाट अधिकच बिकट होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. देहूरोड ते निगडीदरम्यानच्या महामार्ग रुंदीकरणाचे काम संथगतीने सुरू असून, खोदलेले मोठे धोकादायक चर व खड्ड्यांमुळे वारकऱ्यांची वाटचाल असुरक्षित होणार असल्याने खोदलेल्या भागातील रस्ता तातडीने पूर्ण करण्याबाबत संबंधित ठेकेदारास आदेश देण्याची गरज व्यक्त होत आहे. पालखीमार्गावर माळवाडीनजीक देहूरोड बोर्डाची हद्द सुरू झाल्यावर दहा ते पंधरा मीटर अंतरापासून झेंडेमळा येथील जकात नाक्यापर्यंत विविध ठिकाणी रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग पडले आहेत. माळवाडी ते झेंडेमळा रस्ता दीड पदरी असून या रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाडेझुडपे वाढली आहेत. माळवाडी ते झेंडेमळा येथील बोर्डाच्या जकात नाका दरम्यान झाडांची छाटणी करण्याची गरज आहे. झेंडेमळा ते सीओडी डेपोदरम्यान, स्वच्छता आहे. डेपोच्यानजीक बोर्डाने बांधलेल्या पादचारी मार्गावर पडलेले बाभळीचे झाड हटविण्याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही. या भागात रस्त्याच्या दुतर्फा झाडाझुडपांची छाटणी केलेली नाही. झेंडेमळा हद्दीत तसेच सीओडी प्रवेशद्वाराजवळ मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी धोकादायक खड्डे पडले आहेत . पहिल्या विसाव्याला होणार गैरसोय संत तुकाराममहाराजांच्या पालखीचा चिंचोली येथील पहिल्या विसाव्याच्या ठिकाणी तसेच पालखी मार्गावर काही ठिकाणी एका ठेकेदाराने इंटरनेटची भूमिगत केबल टाकण्यासाठी खोदलेले मोठे चर अद्यापही बुजविलेले नाहीत. त्यामुळे आषाढी वारीतील वारकऱ्यांची चिंचोलीतील पहिल्याच विसाव्याला मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. लांबलचक चरामुळे चिंचोली, किन्हई , झेंडेमळा, काळोखेमळा, जाधवमळा, हगवणेमळा व पंचक्रोशीतून पालखीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही गैरसोय होणार आहे. चरात पडून अपघात होण्याची भीतीही आहे. परिसरात खोदकामाचा राडारोडा पसरला आहे. लाखो वारकरी थांबत असल्याने परिसर सफाई करण्याची गरज आहे. चिंचोली शनिमंदिर ते अशोकनगरदरम्यान झाडा-झुडपांची छाटणी करण्याची गरज आहे. धोकादायक गतिरोधक : वाटचाल असुरक्षित पालखीमार्गावर कॅन्टोन्मेंट हद्दीत लष्करच्या ताब्यातील झेंडेमळा ते देहूरोड दरम्यानच्या रस्त्यावर दहा गतिरोधक असून, सर्व गतिरोधक निकषानुसार बनविलेले नाहीत. गतिरोधकांच्या अगोदर पुढे गतिरोधक असल्याचा फलक कोठेही नाही. काही गतिरोधकांवर पांढरे पट्टे नाहीत तर काहींचे पुसट झाले आहेत. रात्री गतिरोधक दिसत नाहीत. मुख्य रस्ता व संरक्षक बाजूपट्टी यातील अंतर अधिक असल्याने चालतानाही अपघाताची शक्यता आहे. मुंबई-पुणे महामार्गाचे देहूरोड ते निगडीदरम्यान रुंदीकरण सुरू आहे. काही दिवसांपासून काम संथगतीने सुरू आहे. केंद्रीय विद्यालयाजवळ एकाच ठिकाणी काम सुरू आहे. रुंदीकरणात टाकण्यासाठी आणलेल्या जलवाहिन्या रस्त्यालगत पडून आहेत. देहू फाटा भागात विविध लष्करी आस्थापना व कॅन्टोन्मेन्टच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येते. त्या ठिकाणीच मोठे चर खोदलेले आहेत. देहूफाटा ते केंद्रीय विद्यालय क्रमांक एक दरम्यान विविध ठिकाणी महामार्गावर आडवे चर खोदल्यानंतर व्यवस्थित बुजविलेले नाहीत. केंद्रीय विद्यालयापासून निगडीतील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या व्यवस्थापन केंद्रापर्यंत काही ठिकाणी रस्ता अर्धवट स्थितीत तयार केला आहे. काही ठिकाणी खोदकाम करण्यात आलेले असतानाही काम बंद असल्याचे दिसून आले. खोदकाम करताना मूळ रस्त्यालगत लांबलचक चर खोदले असून वारकऱ्यांना चालताना विविध समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. चालताना ते पाय घसरून चरात पडण्याची शक्यता आहे. अर्धवट काम झालेल्या भागात चालताना अडथळे निर्माण झालेले आहेत.देहूरोडकडून निगडीकडे पालखी सोहळा मार्गस्थ होत असताना वारकरी मुख्य महामार्गासह डाव्या बाजूच्या मोकळ्या जागेतून चालत असतात. डाव्या बाजूच्या मोकळ्या जागेत खोदकाम केलेले असल्याने यावर्षी वारकऱ्यांना व्यवस्थित चालता येणार नसून मोठी गैरसोय होणार आहे. काही भागात अर्धवट तयार केलेला रस्ता तसेच बहुतांशी खोदलेल्या भागावर संबंधित ठेकेदाराने लक्ष केंद्रित करून याच भागातील कामे तातडीने पूर्ण करणे शक्य आहे. आगामी पंधरा दिवसांत इतर भागात व महामार्गाच्या उजव्या बाजूला सुरू असलेली कामे पूर्ण बंद ठेवून सर्व कामगार प्राधान्याने या भागातील कामांवर लावून कामे अधिकाधिक कामे पूर्ण केल्यास वारकऱ्यांची गैरसोय काही प्रमाणात कमी होऊ शकते. - दत्तात्रय तरस, विश्वस्थ, श्रीक्षेत्र भंडारा डोंगर दिंडी समाज (हवेली)