शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

सरकारच्या नियंत्रणात सांस्कृतिक केंद्रे आल्यावर त्यांची वाट लागते- परेश रावल

By श्रीकिशन काळे | Updated: September 11, 2023 15:22 IST

या वेळी ज्येष्ठ अभिनेेते डॉ. मोहन आगाशे, दीपा लागू आदी उपस्थित होते....

पुणे : नाटकासाठी रंगमंच, सांस्कृतिक केंद्रे तयार होणे आवश्यक आहेत. ही केंद्रे स्वतंत्र असतील तर बरे. कारण सरकारच्या नियंत्रणात ही सांस्कृतिक केंद्र आली की, त्यांची वाट लागते, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने टिळक रोडवरील भागात ‘श्रीराम लागू रंगावकाश’ रंगमंचाची स्थापना करण्यात आली. त्याचा शुभारंभ रावल यांच्या हस्ते झाला. हिराबाग येथील महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या रंगालय इमारतीमध्ये हा रंगावकाश साकारला जात आहे. या वेळी ज्येष्ठ अभिनेेते डॉ. मोहन आगाशे, दीपा लागू आदी उपस्थित होते.

श्रीराम लागू रंगावकाश हा रंगमंच आधुनिक असणार आहे. त्यात तीन प्रकारे नाटक सादर करता येईल. त्यामुळे लेखक, अभिनेते, दिग्दर्शक अशा सर्वांना आपली कला वेगळ्या प्रकारे दाखवता येणार आहे.डॉ. आगाशे म्हणाले,‘‘एखाद्याला कला सादर करायची असेल तर त्याला जागा लागते. त्या जागेत त्याने कला सादर केली तर तो थिएटर होते. ही कल्पना मांडून श्रीराम लागू रंगावकाश साकारले जात आहे. जागेचा पुरेपूर वापर करता यावा, यासाठी हे तयार केले जात आहे. पूर्वी पुण्यात दोनच थिएटर होते. आता खूप झालेत. पण थिएटरपर्यंत पोचणे अवघड होऊन बसले आहे. नवनवीन समस्या नाटक करणाऱ्याला येत आहेत. त्यावर आपण मात करून कला सादर करू.’’

मराठी रंगभूमीत असतो तर...

मराठी रंगभूमी, साहित्य, संस्कृती अतिशय संपन्न आहे. मी जर मराठी रंगभूमीवर काम कर असतो, तर आतापेक्षा मी अधिक श्रीमंत झालो असतो. कारण मराठी साहित्य अप्रतिम आहे, इथली नाटकाची परंपरा खूप जुनी आणि उत्तम आहे. इथले लेखक, साहित्य मला जाणून घेता आले असते आणि मी समृध्द झालो असतो, असे मराठीचे कौतूक रावल यांनी केले.

मराठी माणसामुळे नाटक जीवंत-

नाटकावर जीएसटी लागू केला. तेव्हा मी ते रद्द करण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण काही झाले नाही. मग मी शरद पवार यांच्याकडे गेलो. त्यांनी लगेच अरूण जेटली यांच्याशी बोलायला सांगितले. त्यांना बोलून भेटी ठरली. जेटलींना भेटायला मी व पवार साहेब गेलो. तेव्हा पंधरा-वीस मिनिटे चर्चा झाली आणि लगेच जेटली यांनी आदेश काढला. हे पाहून मी पवारांना म्हणालो, तुमच्याकडे मेजॉरिटी नसली तरी देखील हे कसं शक्य झालं.’ त्यावर पवार साहेब म्हणाले, कला आणि संस्कृती जपण्यासाठी हे करणं आवश्यक आहे.’’ हे ऐकल्यानंतर मराठी माणूस जोपर्यंत आहे, तोपर्यंत नाटक जोपासले जाईल आणि महाराष्ट्रात बहरत राहील, अशी आठवण रावल यांनी सांगितली.

टॅग्स :Paresh Rawalपरेश रावलPuneपुणे