शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

सरकारच्या नियंत्रणात सांस्कृतिक केंद्रे आल्यावर त्यांची वाट लागते- परेश रावल

By श्रीकिशन काळे | Updated: September 11, 2023 15:22 IST

या वेळी ज्येष्ठ अभिनेेते डॉ. मोहन आगाशे, दीपा लागू आदी उपस्थित होते....

पुणे : नाटकासाठी रंगमंच, सांस्कृतिक केंद्रे तयार होणे आवश्यक आहेत. ही केंद्रे स्वतंत्र असतील तर बरे. कारण सरकारच्या नियंत्रणात ही सांस्कृतिक केंद्र आली की, त्यांची वाट लागते, अशा भावना ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांनी व्यक्त केल्या. महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या वतीने टिळक रोडवरील भागात ‘श्रीराम लागू रंगावकाश’ रंगमंचाची स्थापना करण्यात आली. त्याचा शुभारंभ रावल यांच्या हस्ते झाला. हिराबाग येथील महाराष्ट्र कल्चरल सेंटरच्या रंगालय इमारतीमध्ये हा रंगावकाश साकारला जात आहे. या वेळी ज्येष्ठ अभिनेेते डॉ. मोहन आगाशे, दीपा लागू आदी उपस्थित होते.

श्रीराम लागू रंगावकाश हा रंगमंच आधुनिक असणार आहे. त्यात तीन प्रकारे नाटक सादर करता येईल. त्यामुळे लेखक, अभिनेते, दिग्दर्शक अशा सर्वांना आपली कला वेगळ्या प्रकारे दाखवता येणार आहे.डॉ. आगाशे म्हणाले,‘‘एखाद्याला कला सादर करायची असेल तर त्याला जागा लागते. त्या जागेत त्याने कला सादर केली तर तो थिएटर होते. ही कल्पना मांडून श्रीराम लागू रंगावकाश साकारले जात आहे. जागेचा पुरेपूर वापर करता यावा, यासाठी हे तयार केले जात आहे. पूर्वी पुण्यात दोनच थिएटर होते. आता खूप झालेत. पण थिएटरपर्यंत पोचणे अवघड होऊन बसले आहे. नवनवीन समस्या नाटक करणाऱ्याला येत आहेत. त्यावर आपण मात करून कला सादर करू.’’

मराठी रंगभूमीत असतो तर...

मराठी रंगभूमी, साहित्य, संस्कृती अतिशय संपन्न आहे. मी जर मराठी रंगभूमीवर काम कर असतो, तर आतापेक्षा मी अधिक श्रीमंत झालो असतो. कारण मराठी साहित्य अप्रतिम आहे, इथली नाटकाची परंपरा खूप जुनी आणि उत्तम आहे. इथले लेखक, साहित्य मला जाणून घेता आले असते आणि मी समृध्द झालो असतो, असे मराठीचे कौतूक रावल यांनी केले.

मराठी माणसामुळे नाटक जीवंत-

नाटकावर जीएसटी लागू केला. तेव्हा मी ते रद्द करण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण काही झाले नाही. मग मी शरद पवार यांच्याकडे गेलो. त्यांनी लगेच अरूण जेटली यांच्याशी बोलायला सांगितले. त्यांना बोलून भेटी ठरली. जेटलींना भेटायला मी व पवार साहेब गेलो. तेव्हा पंधरा-वीस मिनिटे चर्चा झाली आणि लगेच जेटली यांनी आदेश काढला. हे पाहून मी पवारांना म्हणालो, तुमच्याकडे मेजॉरिटी नसली तरी देखील हे कसं शक्य झालं.’ त्यावर पवार साहेब म्हणाले, कला आणि संस्कृती जपण्यासाठी हे करणं आवश्यक आहे.’’ हे ऐकल्यानंतर मराठी माणूस जोपर्यंत आहे, तोपर्यंत नाटक जोपासले जाईल आणि महाराष्ट्रात बहरत राहील, अशी आठवण रावल यांनी सांगितली.

टॅग्स :Paresh Rawalपरेश रावलPuneपुणे