शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
2
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
3
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
4
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
6
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
7
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
8
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
9
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
10
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
11
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
13
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
14
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
15
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
16
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
17
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
18
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
19
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
20
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

कोट्यवधींचा खर्च नको, पर्यावरणीय प्रवाहासाठी स्वच्छ पाणी सोडा - सुशोभीकरणापेक्षा सांडपाणी स्वच्छ करायला हवे, श्रीकांत इंगळहळीकर यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:04 IST

पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांवर जलविद्युत प्रकल्प आहेत, त्यामुळे त्यातून किमान पाणी खडकवासला धरणात वाहते. खडकवासल्यातला सारा साठा मुख्यत: ...

पानशेत, वरसगाव आणि टेमघर धरणांवर जलविद्युत प्रकल्प आहेत, त्यामुळे त्यातून किमान पाणी खडकवासला धरणात वाहते. खडकवासल्यातला सारा साठा मुख्यत: पाईपमार्गे पुणे शहरासाठी आणि उरलेला कालव्यातून शेतीसाठी वापरला जातो. यातून मुठेला जीवित ठेवण्यासाठी बंधनकारक असलेल्या पर्यावरणीय प्रवाहासाठी एक थेंबही शिल्लक राहात नाही. मग मुठा नदीत प्रत्यक्ष काय वाहते आहे ? फक्त सांडपाणी.

----------------

पाण्याचा वापर १५० लिटर करावा

पुणे शहरासाठी १५०० एमएलडी (दशलक्ष लिटर्स दर दिवसाला) पाठवले जाते. पुण्याची लोकसंख्या ५० लाख धरली, तर ३०० लिटर दर माणशी दर दिवशी असा वापर होतो. लोकसंख्येनुसार हा वापर १५० लिटर असायला हवा. पुण्यालगतची अद्ययावत नांदेड सिटी आपली गरज केवळ ११० लिटरमध्ये भागवते. पुण्याचा वापर एवढा जास्त‌ का ? असे विचारल्यास (जुन्या गंजलेल्या पाईपमुळे) ४० टक्के तर गळतीच असते, असे सांगितले जाते. हे खरे मानले तर ६०० एमएलडी पाणी गळून विहिरी, भूजल किंवा मुठा नदी दुथडी भरून वाहताना दिसली असती. पाण्याचा वापर आंतरराष्ट्रीय मानकांप्रमाणे १५० लिटर केला, तर ७५० एमएलडी पाणी वाचेल किंवा नदी जीवित करण्यासाठी ते मुठेत सोडता येईल.

-----------------

हे १५० लिटर पाणी सांडपाण्यात कसे बदलते ?

सध्याची (एसटीपी) शुध्दीकरण क्षमता याच्या निम्मीच आहे. म्हणजे ७५० एमएलडी सांडपाणी थेट नदीत जाते. उरलेले सांडपाणी शुध्दीकरण प्रकल्पांच्या ८०% कार्यक्षमतेमधून नदीत जाते. म्हणजे आणखी १५० एमएलडी सांडपाणी साफ न होताच नदीत जाते. नदीतल्या पाण्याची शुध्दता पाहायची असेल तर (डबल मास्क घालून) मुंढवा जॅकवेलने उचललेले पाणी साडेसतरा नळीपाशी कॅनालमध्ये पाहावे.

-------------

एक थेंबही स्वच्छ पाणी नाही येत

नदीत एक थेंबही ताजे स्वच्छ पाणी येत नसताना, ६०% थेट सांडपाणी नदीत वाहत असताना आणि ४० % साफ (?) केलेले सांडपाणी नदीत वाहत असताना सर्व धडपड सांडपाणी प्रकल्पांची क्षमता १०० टक्के करण्यासाठी नको का? जायका प्रकल्प रखडलेला, खडकवासल्यात खडखडाट होईपर्यंत अतिरिक्त वापर, जुन्या गळक्या पाईपलाईन तश्याच आणि तरीही काळ्या सांडपाण्यावर ३००० कोटीच्या सुशोभीकरणाची घाई? कुछ तो गडबड है, कुछ तो गडबड है असे इंगळहळीकर म्हणाले.

----------