शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

व्यक्तिगत द्वेषातून पाटील यांच्यावर टीका नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे ः भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व असून अनेक ब्राह्मण कुटुंबांशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे ः भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व असून अनेक ब्राह्मण कुटुंबांशी त्यांचा संपर्क आहे. जाहीर सभेतील त्यांचे भाष्य इतिहासात आक्रमक पद्धतीने झालेल्या धर्मांतरावरचे होते. ब्राह्मण समाजाबद्दल अवमान करण्याचा विचारदेखील त्यांच्या मनात येणे शक्य नाही. मात्र व्यक्तिगत विद्वेषातून त्यांच्यावर टीका केली जात आहे, असल्याचे मत ब्राह्मण समाजातून व्यक्त होत आहे.

सिंधुदुर्ग येथील सभेतील त्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे ब्राह्मणांचा अवमान झाल्याची भूमिका घेत काहींनी पाटील यांच्यावर टीका सुुरु केली आहे. यावर “मुळातच पाटील यांनी ब्राह्मण समाजाचा अवमान केल्याचे आम्ही मानत नाही. पाटील यांचया हितशत्रूंनी वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करु नये,” अशी भूमिका राज्यभरातील अनेक ब्राह्मण संघटना आणि व्यक्तींनी घेतली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, चंद्रकांत पाटील हे सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे. ब्राम्हण समाजाचा मित्र म्हणून स्नेह आणि विश्वासाचे नाते ते नेहमी जपत असतात. सामाजिक जीवनात काम करत असताना त्यांनी अनेक ब्राह्मण कुटुंबियाकडे आपुलकीने वास्तव्य केले आहे. राहिले आहेत. तत्कालीन परिस्थितीत आक्रमक पद्धतीने झालेल्या धर्मांतराबद्दल त्यांनी सिंधुदुर्गातील सभेत भाष्य केले होते. कोणाचाही अवमान करण्याचा विचारही ते करु शकत नाहीत. भाषणातील वाक्यांचा विपर्यास करुन गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

“गोविंद कुलकर्णी नामक अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षांनी पत्रकाद्वारे ब्राह्मण समाज भाजपाला धडा शिकवेल अशी वल्गना केली आहे. मुळात गोविंदरावांना ब्राह्मण समाजाचे नेतृत्व कोणी दिले,” असा प्रश्न संदीप खर्डेकर यांनी उपस्थित केला. खर्डेकर म्हणाले की, ब्राह्मण समाजाचे स्वयंघोषित नेते म्हणून वावरताना ब्राह्मण संघटन किंवा ब्राह्मणांच्या समस्या मांडणे सोडून हे महाशय राजकीय भूमिका घेतात यातच त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेण्यास पुरेसा वाव आहे. पुण्याच्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातून अनेक कार्यकर्ते बाहेर पडले आहेत. मी देखील यापुढे आपल्या सोबत काम करु इच्छित नाही, असे खर्डेकर यांनी म्हटले आहे.

चौकट

षडयंत्राचा संशय

“चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यातून सोईस्कर अर्थ काढत निरर्थक वाद निर्माण करायचा याला सुनियोजित षडयंत्राचा वास आहे. या विषयाचे भांडवल करुन द्वेष निर्माण करण्याचा प्रकार निषेधार्ह आहे.” -आमदार मुक्ता टिळक