शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

व्यक्तिगत द्वेषातून पाटील यांच्यावर टीका नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे ः भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व असून अनेक ब्राह्मण कुटुंबांशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे ः भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व असून अनेक ब्राह्मण कुटुंबांशी त्यांचा संपर्क आहे. जाहीर सभेतील त्यांचे भाष्य इतिहासात आक्रमक पद्धतीने झालेल्या धर्मांतरावरचे होते. ब्राह्मण समाजाबद्दल अवमान करण्याचा विचारदेखील त्यांच्या मनात येणे शक्य नाही. मात्र व्यक्तिगत विद्वेषातून त्यांच्यावर टीका केली जात आहे, असल्याचे मत ब्राह्मण समाजातून व्यक्त होत आहे.

सिंधुदुर्ग येथील सभेतील त्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे ब्राह्मणांचा अवमान झाल्याची भूमिका घेत काहींनी पाटील यांच्यावर टीका सुुरु केली आहे. यावर “मुळातच पाटील यांनी ब्राह्मण समाजाचा अवमान केल्याचे आम्ही मानत नाही. पाटील यांचया हितशत्रूंनी वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करु नये,” अशी भूमिका राज्यभरातील अनेक ब्राह्मण संघटना आणि व्यक्तींनी घेतली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, चंद्रकांत पाटील हे सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे. ब्राम्हण समाजाचा मित्र म्हणून स्नेह आणि विश्वासाचे नाते ते नेहमी जपत असतात. सामाजिक जीवनात काम करत असताना त्यांनी अनेक ब्राह्मण कुटुंबियाकडे आपुलकीने वास्तव्य केले आहे. राहिले आहेत. तत्कालीन परिस्थितीत आक्रमक पद्धतीने झालेल्या धर्मांतराबद्दल त्यांनी सिंधुदुर्गातील सभेत भाष्य केले होते. कोणाचाही अवमान करण्याचा विचारही ते करु शकत नाहीत. भाषणातील वाक्यांचा विपर्यास करुन गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

“गोविंद कुलकर्णी नामक अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षांनी पत्रकाद्वारे ब्राह्मण समाज भाजपाला धडा शिकवेल अशी वल्गना केली आहे. मुळात गोविंदरावांना ब्राह्मण समाजाचे नेतृत्व कोणी दिले,” असा प्रश्न संदीप खर्डेकर यांनी उपस्थित केला. खर्डेकर म्हणाले की, ब्राह्मण समाजाचे स्वयंघोषित नेते म्हणून वावरताना ब्राह्मण संघटन किंवा ब्राह्मणांच्या समस्या मांडणे सोडून हे महाशय राजकीय भूमिका घेतात यातच त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेण्यास पुरेसा वाव आहे. पुण्याच्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातून अनेक कार्यकर्ते बाहेर पडले आहेत. मी देखील यापुढे आपल्या सोबत काम करु इच्छित नाही, असे खर्डेकर यांनी म्हटले आहे.

चौकट

षडयंत्राचा संशय

“चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यातून सोईस्कर अर्थ काढत निरर्थक वाद निर्माण करायचा याला सुनियोजित षडयंत्राचा वास आहे. या विषयाचे भांडवल करुन द्वेष निर्माण करण्याचा प्रकार निषेधार्ह आहे.” -आमदार मुक्ता टिळक