शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

व्यक्तिगत द्वेषातून पाटील यांच्यावर टीका नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे ः भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व असून अनेक ब्राह्मण कुटुंबांशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे ः भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व असून अनेक ब्राह्मण कुटुंबांशी त्यांचा संपर्क आहे. जाहीर सभेतील त्यांचे भाष्य इतिहासात आक्रमक पद्धतीने झालेल्या धर्मांतरावरचे होते. ब्राह्मण समाजाबद्दल अवमान करण्याचा विचारदेखील त्यांच्या मनात येणे शक्य नाही. मात्र व्यक्तिगत विद्वेषातून त्यांच्यावर टीका केली जात आहे, असल्याचे मत ब्राह्मण समाजातून व्यक्त होत आहे.

सिंधुदुर्ग येथील सभेतील त्या कथित वादग्रस्त वक्तव्यामुळे ब्राह्मणांचा अवमान झाल्याची भूमिका घेत काहींनी पाटील यांच्यावर टीका सुुरु केली आहे. यावर “मुळातच पाटील यांनी ब्राह्मण समाजाचा अवमान केल्याचे आम्ही मानत नाही. पाटील यांचया हितशत्रूंनी वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करु नये,” अशी भूमिका राज्यभरातील अनेक ब्राह्मण संघटना आणि व्यक्तींनी घेतली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याचे भाजपाध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, चंद्रकांत पाटील हे सुसंस्कृत व्यक्तिमत्व आहे. ब्राम्हण समाजाचा मित्र म्हणून स्नेह आणि विश्वासाचे नाते ते नेहमी जपत असतात. सामाजिक जीवनात काम करत असताना त्यांनी अनेक ब्राह्मण कुटुंबियाकडे आपुलकीने वास्तव्य केले आहे. राहिले आहेत. तत्कालीन परिस्थितीत आक्रमक पद्धतीने झालेल्या धर्मांतराबद्दल त्यांनी सिंधुदुर्गातील सभेत भाष्य केले होते. कोणाचाही अवमान करण्याचा विचारही ते करु शकत नाहीत. भाषणातील वाक्यांचा विपर्यास करुन गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

“गोविंद कुलकर्णी नामक अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्षांनी पत्रकाद्वारे ब्राह्मण समाज भाजपाला धडा शिकवेल अशी वल्गना केली आहे. मुळात गोविंदरावांना ब्राह्मण समाजाचे नेतृत्व कोणी दिले,” असा प्रश्न संदीप खर्डेकर यांनी उपस्थित केला. खर्डेकर म्हणाले की, ब्राह्मण समाजाचे स्वयंघोषित नेते म्हणून वावरताना ब्राह्मण संघटन किंवा ब्राह्मणांच्या समस्या मांडणे सोडून हे महाशय राजकीय भूमिका घेतात यातच त्यांच्या हेतूंबद्दल शंका घेण्यास पुरेसा वाव आहे. पुण्याच्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातून अनेक कार्यकर्ते बाहेर पडले आहेत. मी देखील यापुढे आपल्या सोबत काम करु इच्छित नाही, असे खर्डेकर यांनी म्हटले आहे.

चौकट

षडयंत्राचा संशय

“चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यातून सोईस्कर अर्थ काढत निरर्थक वाद निर्माण करायचा याला सुनियोजित षडयंत्राचा वास आहे. या विषयाचे भांडवल करुन द्वेष निर्माण करण्याचा प्रकार निषेधार्ह आहे.” -आमदार मुक्ता टिळक