शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
4
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
5
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
6
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
7
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
8
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
9
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
10
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
11
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
12
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
13
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
14
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
15
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
16
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
17
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
18
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
19
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
20
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?

मराठा आरक्षणाबाबत सरकारचे ठोस नियोजन आहे की नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST

पुणे : मराठा आरक्षणप्रकरणी सरकारने ‘तुझं-माझं’ करण्यापेक्षा हा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे. आरक्षणाबाबत वेळोवेळी भूमिका बदलणा-या सरकारमध्ये सुरुवातीपासून समन्वयाचा ...

पुणे : मराठा आरक्षणप्रकरणी सरकारने ‘तुझं-माझं’ करण्यापेक्षा हा प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यावे. आरक्षणाबाबत वेळोवेळी भूमिका बदलणा-या सरकारमध्ये सुरुवातीपासून समन्वयाचा अभाव होता. आरक्षणाबाबत काही ठोस नियोजन आहे की नाही, असा सवाल छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला.

उच्च न्यायालयाने मराठा समाजाला सामाजिक मागास सिद्ध केल होतं. परंतु, सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. अंतिम सुनावणी मागील आठवड्यापासून सुरू झाली. शासनाने अन्य राज्यांचे दाखले दिल्यानंतर ती पुढे ढकलण्यात आली. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला १९०२ साली ५० टक्के आरक्षण दिले होते. त्यामध्ये मराठा समाजाचाही समावेश होता. स्वातंत्र्यानंतरही १९६७ पर्यंत एससी, एसटी, ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश होता, असे संभाजीराजे म्हणाले.

नारायण राणे समितीने दिलेले आरक्षण टिकले नव्हते. सरकारच्या भूमिकेत समन्वय नव्हता. त्यामुळे सरकारने ठोस भूमिका घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असे संभाजीराजे म्हणाले.

सरकारमध्ये समन्वय नाही की कोणता अ‍ॅक्शन प्लॅन नाही. अन्य राज्यांनी त्यांच्या अधिकारात ५० टक्क्यांच्यावर आरक्षण दिलेले आहे. इंदिरा साहनी अहवालात विशेष बाब म्हणून आरक्षण दिले जाऊ शकते असे नमूद करण्यात आलेले आहे. अपवादात्मक बाबीत राज्य सरकार आरक्षण देऊ शकते. सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकार अपवादात्मक परिस्थिती आहे, हे सिद्ध करू शकत नाही. मागासवर्गीय अहवाल समजून सांगणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

राज्यसभेने नेमलेल्या सिलेक्ट कमिटीनेही आरक्षणाबाबतचा राज्यांचा अधिकार काढला जाऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. तसे प्रतिज्ञापत्र केंद्र शासनाने सर्वोच्च न्यायालयात द्यावे. आरक्षणाबाबत येत्या सोमवारी केंद्रीय समाजकल्याण मंत्री, समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, सचिवांची भेट घेणार असून यावेळी मराठा समाजातील अभ्यासक, विद्वान उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

====

आरक्षण मिळाले नाही तर हा अन्याय मराठा समाजाचा माणूस यापुढे सहन करणार नाही,. सत्ताधारी असो वा विरोधक सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी. मंत्री अशोक चव्हाण यांनीही ‘इकडचे- तिकडचे’ करू नये. राज्य सरकारने १४ महिन्यांत प्रस्ताव का दिला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.