शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

नदीसुधार नको; नदीसुरक्षा हवी

By admin | Updated: July 6, 2017 03:45 IST

मुळा व मुठा या नद्या पुण्याला निसर्गाकडून मिळालेली देणग्या आहेत. त्यांच्यासाठी आधुनिक पद्धतीने सुधार योजना राबवणे चुकीचे आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : मुळा व मुठा या नद्या पुण्याला निसर्गाकडून मिळालेली देणग्या आहेत. त्यांच्यासाठी आधुनिक पद्धतीने सुधार योजना राबवणे चुकीचे आहे. त्यात या नद्यांच्या नैसर्गिक सौंदर्याची हानी होण्याची भीती ख्यातनाम जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली. तत्पूर्वी त्यांनी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे महापालिकेच्या नदीसुधार प्रकल्पास असलेला विरोध नोंदवला.या बैठकीनंतर निवडक पत्रकारांशी बोलताना राजेंद्रसिंह यांनी या प्रकल्पाविषयी आपली नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, देशात सर्वत्र सध्या साबरमती नदीसुधार प्रकल्पाच्या धर्तीवर स्थानिक नद्यांच्या सुधारणेचे वारे वाहत आहे. त्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जात आहेत. मात्र, साबरमती व अन्य नद्या यांच्या नैसर्गिक स्थितीत फरक आहे ही गोष्ट लक्षात घेतली जात नाही. मुळा व मुठा या नद्यांमध्ये बांधकाम होणार नाही, पात्र लहान होणार नाही, पाणी वाहते राहील याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे आयुक्तांना सांगितले असल्याची माहिती राजेंद्रसिंह यांनी दिली.महाराष्ट्रातील नद्यांची काही वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे वाहणे, नदीकाठ, तेथील वसाहती या सर्वांमध्ये संस्कृती दडलेली आहे. स्थानिक प्रशासनाने त्यात सांडपाणी सोडून पुण्यातील नद्यांचे वैशिष्ट्य मोडीत काढले आहे. ते परत कसे मिळेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. नदीसुधार प्रकल्पात ते होणे शक्य नाही. पैशांना व नदीकाठी वेगळीच संस्कृती विकसित करण्याला या प्रकल्पात भर दिला आहे. त्यात नद्यांचे संवर्धन होण्याची शक्यता नाही, उलट स्थिती आणखी खराब होण्याची चिन्हे आहेत, असे मत राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केले. नदीपात्रातून मेट्रो जाणार आहे, त्यामुळे तर पात्राचे नुकसान होण्याची दाट शक्यता आहे, असे राजेंद्रसिंह म्हणाले. आयुक्तांना या सर्व गोष्टींची कल्पना दिली आहे. पुणेकर नागरिकांनी नद्या या आपल्या शहराच्या जीवनवाहिन्या आहेत हे लक्षात घेऊन त्यांची हानी होणार नाही याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन राजेंद्रसिंह यांनी केले.