शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

अन्याय होऊ देणार नाही : पालकमंत्री

By admin | Updated: August 10, 2016 00:59 IST

मावळच्या जनतेवर आन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मावळ पवनानगर येथील श्रद्धांजली सभेत व्यक्त केले.

पवनानगर : मावळच्या जनतेवर आन्याय होऊ देणार नाही, असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी मावळ पवनानगर येथील श्रद्धांजली सभेत व्यक्त केले. पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला बंद जलवाहिनीने पाणी नेण्याला विरोध करण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावर ९ आॅगस्ट २०११ रोजी झालेल्या आंदोलनात तीन शेतकरी मरण पावले. या घटनेला पाच वर्षे पूर्ण झाली आहे. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंगळवारी पवनानगर येथे शोकसभेचे आयोजन केले होते. या वेळी बापट बोलत होते. तत्कालीन सरकारने बंद जलवाहिनीबाबत निर्णय घेताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतले नाही. यासह आंदोलनही चुकीच्या मार्गाने हाताळले. यामुळे शेतकऱ्यांचे बलिदान गेले. पण, आता आपण शासनाचा प्रतिनीधी असून, मावळचेच पुत्र आहोत. यामुळे मावळच्या जनतेवर अन्याय होऊ देणार नाही. पाण्यावर पहिला अधिकार शेतकऱ्यांचा आहे. हा प्रश्न मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवनमरणाचा असल्याची मला जाणीव आहे. हा प्रश्न सोडवताना शेतकऱ्यांना सोबत घेऊन त्यांच्या मनाप्रमाणेच प्रश्न सोडवू. शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, तर शहीद शेतकऱ्यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमासाठी गिरीष बापट, आमदार संजय भेगडे, केशव वाडेकर, माजी आमदार दिगंबर भेगडे, प्रशांत ढोरे, मच्छिंद्र खराडे, एकनाथ टिळे, भारत ठाकूर, सविता गावडे, दीपाली म्हाळस्कर, गणेश भेगडे, रवींद्र भेगडे, जितेंद्र बोत्रे, सचिन शेळके आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थित नागरिकांनी गोळीबार प्रकरणातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली. पवना जलवाहिनी रद्द करण्याबाबतचा निर्णय तातडीने घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.(वार्ताहर)श्रद्धांजली सभेनंतर शेतकरी नाराजचपवनानगर : पवना बंद जलवाहिनी आंदोलनात शहीद झालेल्या मोरेश्वर साठे, कांताबाई ठाकर, श्यामराव तुपे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट आले. मात्र, शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेऊ, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करण्याबाबत कसलीही घोषणा न केल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पवना बंदिस्त जलवाहिनीला विरोध दर्शविण्यासाठी केलेल्या आंदोलनात तीन शेतकरी शहीद झाले होते. त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केले होते. दरम्यान, भाजपा सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेऊ, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प कायमचा रद्द करू, अशी आश्वासने सत्तेत येण्यापूर्वी मावळ तालुक्यातील प्रचारावेळी भाजपाने दिली. मात्र, भाजपा व शिवसेना युतीचे सरकार येऊन दोन वर्षे झाली, पण या आंदोलनातील १९८ शेतककऱ्यांवरील गुन्हे अद्यापही मागे घेतले नाही. यामुळे मंगळवारच्या शोकसभेत पालकमंत्री पवना बंद जलवाहिनी प्रकल्प रद्दची घोषणा करावी व गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन द्यावे, अशी अपेक्षा होती. मात्र, याबाबत पालकमंत्री काहीही स्पष्ट न केल्याने सभा संपल्यानंतर नाराजीची चर्चा होती. वडगावमधील बाळासाहेब शिंदे या प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी व शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खांद्यावर भगवा झेंडा घेऊन गेली ४ वर्षे वडगाव ते पवनानगर हा परतीचा प्रवास ते करत आहेत. या वर्षीदेखील ते चालत या शोकसभेसाठी आले होते.