शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
2
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
3
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
4
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
5
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग
6
पुढच्या ५ वर्षांत इराण अणुबॉम्ब बनवेल! अमेरिकेच्या हल्ल्यानंतर औवेसी म्हणाले, "तिथले कोट्यवधी भारतीय..."
7
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
8
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
9
खोट्या बातम्यांवर बसणार आळा; कर्नाटक सरकारने आणला 'फेक न्यूज' कायदा, ७ वर्षांपर्यंतची शिक्षा
10
Iran Israel Conflict Explained: युद्धाच्या आगीत तेल पेटणार, भारतावर कसा परिणाम होणार?
11
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
12
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
13
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
14
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
15
NEET परीक्षा का बरे होत नसेल हो नीट?
16
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
17
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
18
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
19
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
20
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!

‘डावे’ असे लेबल लावू नये - सुनिल शानबाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 01:53 IST

सुनील शानबाग : ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गौरव

पुणे : कुणालाही सहजपणे ‘माओवादी’,‘देशद्रोही’,‘डावे’ अशी लेबल लावली जातात. बोलणं खूप सोपं आहे, कोणताही पुरावा आणि आधार नसताना कुणालाही आरोपी समजले जाते. कुणाला जरी पकडले गेले किंवा एखाद्याबद्दल काही जरी छापले गेले तरी आमच्यासारख्यांनाच प्रश्न विचारले जातात हे खूप बेजबाबदारपणाचे आहे, अशा शब्दांत विख्यात रंगकर्मी सुनील शानबाग यांनी सरकारवर टीका केली.

गेली चार दशके हिंदी, इंग्रजी व मराठी प्रायोगिक रंगभूमीवर अखंड आणि अथकपणे कार्यरत असणाऱ्या सुनील शानबाग यांना नाट्यक्षेत्रातील प्रदीर्घ कामगिरीसाठी यंदाचा ‘संगीत नाटक अकादमी’चा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्त साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानच्या वतीने शानबाग यांचा प्रसिद्ध लेखिका शांता गोखले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, ज्येष्ठ लेखिका अरुंधती घोष आणि प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय विश्वस्त अशोक कुलकर्णी उपस्थित होते. या सत्कार सोहळ्यानंतर ‘लोकमत’शी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, ऐतिहासिक काळापासून ही विचारांच्या विरोधाची लढाई चालत आली आहे, त्यात नवीन असे काहीच नाही. पण या विचारांना कशा पद्धतीने सामोरे जातो हे महत्त्वाचे आहे. त्या व्यक्तीबरोबर चर्चा करणार की नुसते त्या व्यक्तीच्या विचारांना दाबण्याचा प्रयत्न करणार हे पाहायले हवे. यासाठी अधिकाधिक संवाद घडण्याची गरज आहे. वर्षानुवर्षे कलाकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाले होतच आहेत, कधीतरी त्याची तीव्रता अधिक तर कधी कमी दिसली आहे. सध्याच्या काळात हे जास्त दिसत आहेत इतकेच आहे. मात्र याही परिस्थितीत आपण आपले काम आत्मविश्वास आणि प्रामाणिकपणे करीत राहिले पाहिजे असा कानमंत्रही त्यांनी कलाकारांना दिला.

सत्कारानंतर शानबाग यांनी ‘अवर थिएटर’ याविषयावर भाष्य केले. नाटक किंवा दिग्दर्शन करणे हे एकट्याचे काम नाही. हे एक टीम वर्क आहे. रंगभूमीला आज आधाराची गरज आहे. रंगभूमीकडे विकासाच्या प्रोजेक्टच्या रूपात पाहिले तर रंगभूमीचा विस्तार होऊ शकत नाही. काही मोठ्या कंपन्या रंगभूमीला सहकार्य करीत असल्या तरी त्या स्वत:चा ब्रँंड निर्माण करत आहेत. यातून रंगभूमी टिकू शकत नाही. कॉर्पोरेट कंपन्यांचा रस संपला की त्या अंग काढून घेतात तेव्हा नाटक कंपन्या काय करणार? अशा परिस्थितीत पैशांची आस न धरता नाटक करणाºया कलाकारांच्या छोट्या गटांना मोठ्या नाट्यसंस्थांनी सहकार्य करण्याची गरज आहे. अगदी माफक दरात रंगीत तालमीसाठी जागा उपलब्ध करून देण्यापासून ते मर्यादित प्रेक्षकसंख्येसमोर नाटक सादर करता येईल अशा रंगमंचापर्यंत ही मदत करता येईल. वेगवेगळ्या शहरांमध्ये अशा स्वरूपाची व्यवस्था उभी राहिली तरच त्यातून रंगभूमी जिवंत राहील.

घोष म्हणाल्या, संघर्ष आणि प्रयोगशीलता ही सुनीलच्या नाटकांची वैशिष्ट्ये आहेत. स्वत:चा विषय समजून घेण्यासाठी संशोधनाची वृत्ती त्याच्यात सापडते. त्याच्या नाटकातून अव्यक्त शब्द आणि ध्वनीसुद्धा अधोरेखित होतो. एखादे नाटक चालले नाहीतर अनेक कलाकारांच्या मनात अपयशाची भावना येते पण सुनील अपयशानंतर वेगळ्या दृष्टिकोनातून पाहातो. रूपाली वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Puneपुणे